Friday, March 10, 2017

यशवंतराव चव्हाण जन्मदिनानिमित्त
12 मार्च रोजी समता दिन
नांदेड दि. 10 :-  भारताचे उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवगंत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म दिनानिमित्त 12 मार्च हा दिवस "समता दिन" म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन शासन परिपत्रकान्वये जिल्हा प्रशासनाने केले आहे
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार 12 मार्च 2017 रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवगंत यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस अभिवादन करण्यात येईल व त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे

*******

No comments:

Post a Comment

‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’मधील शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५० हजार रुपय...