Wednesday, September 17, 2025

वृत्त क्रमांक 973

"सेवा पंधरवडा"चा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ 

नांदेडदि. 17 सप्टेंबर :- राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील या कार्यक्रमाचा शुभारंभ  राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणदुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जादिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते येथील जिल्हा नियोजन भवन येथे आज संपन्न झाला.   

यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणखासदार डॉ. अजित गोपछडेआमदार डॉ. तुषार राठोडजिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावलीपोलीस अधिक्षक अबिनाश कुमारमनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडेनिवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकरमहसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी आदींची उपस्थिती होती. 

या सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम हे मोहिम स्वरुपात राबविण्यात येणार आहेत. या कालावधीत सामान्य नागरिकांसाठी शासनाच्या विविध सेवा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तीन टप्यात साजरा करण्यात येत आहे. पहिला टप्पा 17 ते 22 सप्टेंबरदुसरा टप्पा 23 ते 27 सप्टेंबर तर तिसरा टप्पा 28 सप्टेंबर ते ऑक्टोबर हा कालावधीत राहणार आहे. पहिल्या टप्यात रस्ते सर्वेक्षणदुसऱ्या टप्यात अतिक्रमणे नियमित करणे तर तिसऱ्या टप्यात नाविन्यपूर्ण उपक्रमात गाव तिथे दफन भूमीगायरान जमिनीची जिओ फेन्सिंग लॅण्ड बँक तयार करणेव्हॉटसॲपद्वारे तक्रार संकलन व निवारण करण्यात येणार आहे. 

व्हॉटसॲपद्वारे तक्रार संकलन व निवारण

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांच्या सोयीसाठी व्हॉटसॲप चॅटबॉट ॲटोमेशन (WhatsApp Chatbot Automation) सेवा सुरू केली आहे. या सेवेचे उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज नियोजन भवन येथे करण्यात आले. या सेवेमुळे नागरिकांना शासकीय माहिती व सेवा सहजसोप्या आणि वेगवान पद्धतीने उपलब्ध होत आहेत. चॅटबॉट Chatbot च्या मदतीने नागरिक 24 तास कोणत्याही वेळी कार्यालयीन कामकाजाबाबतची माहिती मिळवू शकतात. शासकीय योजनाप्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची यादीऑनलाइन अर्जाच्या लिंकअर्जाची सद्यस्थितीतसेच तक्रार नोंदविणे अशा अनेक सुविधा मोबाईलवरून थेट उपलब्ध होत आहेत.  

या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचतोकार्यालयातील गर्दी टाळली जाते आणि पारदर्शक व विश्वासार्ह माहिती सर्वांना मिळते. व्हॉटसॲप हे सर्वसामान्य नागरिकांना परिचित व सहज वापरता येणारे माध्यम असल्यामुळे ही सेवा अधिक परिणामकारक ठरते. मराठीहिंदीइंग्रजी अशा विविध भाषांमध्ये सेवा देण्याची क्षमता असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनाही या सुविधेचा लाभ सहज मिळतो. ही सुविधा नागरिक-केंद्रित प्रशासनाचा उत्तम नमुना ठरत असून ‘डिजिटल इंडिया’च्या उद्दिष्टपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरतेअशी माहिती यावेळी देण्यात आली. 

याप्रसंगी शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आलेले सन्मानपत्र पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. 

00000








No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...