सद्यपरिस्थितीत नांदेड जिल्ह्यास दुपारी ०१:०० वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट असून सद्यस्थितीत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू आहे. आज सकाळी १० वाजता जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव या चार तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. निझामसागर धरणातून सकाळी १० वाजता २४ गेट उघडून १,९९,२४४ क्युसेक्स वेगाने विसर्ग चालू आहे. तसेच श्रीराम सागर प्रकल्पातून सुद्धा ३९ दरवाजे उघडून २,७६,००० क्युसेक्स वेगाने गोदावरी नदीत विसर्ग चालू आहे. तरी धर्माबाद, बिलोली, देगलूर या गावातील नदीकाठच्या गावातील लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे व सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी पूल, नाल्यावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.
000000

No comments:
Post a Comment