Monday, September 29, 2025

एक हात मदतीचा पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी

भारतातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी आशेचा ऋतू असतो, पण त्याच पावसाचे रौद्ररूप धरणीमातेवर संकट कोसळवते. राज्यात यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, खेडी पाण्याखाली गेलीत, शेतमाल व जनावरांचे प्रचंड नुकसान झाले. या आपत्तीमुळे शेतकरी आणि त्यांची कुटुंबे मानसिक, आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडली आहेत.

पूरस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती

1. शेतीचे नुकसान – पिके पाण्याखाली गेल्याने हंगामभराचे श्रम वाया गेलेत.

2. जनावरांचा बळी – गायी, म्हशी, बकऱ्या, बैल यांचे जीवित वाचवणे कठीण झालेले आहे.

3. घरांची पडझड – मातीची घरे, झोपड्या वाहून गेलीत, अनेक कुटुंब बेघर झालेत. 

4. आरोग्य धोक्यात – पूरपाण्यामुळे, दूषित पाणी यामुळे साथीचे रोग पसरण्याची संभावना नाकारता येत नाही.

5. मानसिक ताण – उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्यामुळे शेतकरी नैराश्यच्या विळख्यात सापडण्याची  शक्यता नाकारता येत नाही.  

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...