Wednesday, April 9, 2025

वृत्त क्रमांक 368

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 9 एप्रिल :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरूवार 10 एप्रिल रोजी दारव्हा येथून दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं 6.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं 7.30 वा. चि. मंदारजी जयंतवराव पत्की यांच्या शुभविवाह सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ भक्ती लॉन्स नांदेड. रात्री 8 वा. निवासस्थान यवतमाळकडे प्रयाण करतील. 

00000

वृत्त क्रमांक 367

शुक्रवारी ‘गुंतवणूक परिषदचे आयोजन

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

नांदेड, दि. ९ एप्रिल: जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2025’ दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल तुलसी कम्फर्ट, आनंदनगर रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्दिष्ट नांदेड जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देणे, स्थानिक गुंतवणूक आकर्षित करणे व रोजगार निर्मितीला बळकटी देणे आहे.

परिषदेचे प्रमुख उद्देश: जिल्हास्तरावर गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, उद्योजक व गुंतवणूकदारांना एकत्र आणणारे व्यासपीठ प्रदान करणे, जिल्ह्याच्या औद्योगिक क्षमतेचा विकास करणे, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे.

या परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांवरील चर्चासत्र, उद्योजकांचे अनुभव कथन, गुंतवणुकीच्या संधींची माहिती, इतर क्षमतावान क्षेत्रांमधील व्यवसाय संधींचा आढावा, तसेच सामंजस्य करार व स्वाक्षरीचे कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद पार पडणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, उद्योजक समूह, उद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, तसेच विविध शासकीय संस्था व विभागांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

तरी जिल्ह्यातील होतकरू व नवउद्योजक, उद्योजक संघटना, उद्योग समूह, व्यावसायिक व औद्योगिक संस्थां यांनी शुक्रवार 11 एप्रिल 2025 रोजी या गुंतवणूक परिषदेला उपस्थित राहून औद्योगिक विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 366

पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद नियमानुसार

समाज कल्याण सहायक आयुक्त यांचा खुलासा 

नांदेड, दि. 9 एप्रिल :- अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद आहे. सदरची योजना ही पिडीत नागरिकांसाठी कल्याणकारी योजना असल्याने कोणतीही व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. तसेच प्रसार माध्यमातुन अशा प्रकारच्या पुराव्याची शहानिशा न करता प्रशासनाविरुद्ध खोटी व असत्य माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

शासन निर्णय 23 डिसेंबर 2016 नुसार अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास 1.50 कोटी रुपये तरतुद प्राप्त झाली आहे. एकुण 275 पिडीतांना त्याचा लाभ देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अद्याप एकाही पिडीताची तक्रार समाज कल्याण कार्यालयास आली नाही.

गुन्हा क्र 105/2023 अॅट्रासिटी अंतर्गत पिडीत फिर्यादी जयराज केरबाजी गायकवाड यांना नियमानुसार अर्थसहाय्य अदा करण्यात आले आहे. परंतु कॉ. गंगाधर गायकवाड यांनी एफआयआरमध्ये नमुद सर्व नावाच्या व्यक्तींना जे अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हयांचे पिडीत नाहीत. सुभाषचंद्र गजभारे, ज्ञानेन्दर खडसे, विश्वजीत गजभारे, गोपीप्रसाद गायकवाड, पंढरी बुरुडे यांना देखील अर्थसहाय्य देण्यात यावा, असे निवेदन समाज कल्याण कार्यालयास सादर करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण धरुन खोटी माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती, जे नियमबाहय आहे.

गंगाधर गणपती खुणे यांना अर्थसहाय्य देण्यात आले नाही अशी देखील वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडुन पीएफएमएसद्वारे (ऑनलाईन) दोनवेळेस अर्थसहाय्य त्यांच्या खाती जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. तिसऱ्यांदा त्यांच्या बँकेत जाऊन शहानिशा केल्यानंतर असे निदर्शनास आले गंगाधर गणपती खुणे यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर केले खाते क्रमांक जुने व बंद खाते होते. त्यामुळे त्यांचे खाती अर्थसहाय्य जमा झाले नाही. त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडून दुसऱ्या बँकेचे खाते क्रमांक घेऊन 30 डिसेंबर 2024 रोजी 75 हजार रुपये जमा करण्यात आले आहे.

गुन्हा क्र 136/2024 मधील पिडीत लता गंगाधर गायकवाड, सुदरबाई बबन वाहुळकर, फकीरा राजाराम गायकवाड, मालनबाई साहेबराव गजभारे, अनिल रामा गायकवाड यांना अर्थसहाय्य मिळाले नाही अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरहु गुन्हा क्र 136/2024 मधील पिडीतांचे दस्ताऐवज अपुर्ण असल्याने त्यांना अर्थसहाय्य अदा करता आले नाही. याबाबत संबंधितास तोंडी तसेच या कार्यालयाचे पत्र क्र. 4520 दि. 31 डिसेंबर 2024 अन्वये कॉ. गंगाधर गायकवाड यांना दस्ताऐवज (जातीचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधारकार्ड) सादर करण्याचे कळविण्यात आले आहे. तरी त्यांनी वेळेत दस्ताऐवज सादर केले नव्हते, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी सांगितले आहे.

000

वृत्त क्रमांक 365

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला मेळावा आणि निबंध स्पर्धा संपन्न

महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सशक्तीकरणावर विशेष भर

नांदेड, दि. ९ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी समाज कल्याण विभागाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याअंतर्गत आज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड कार्यालयाच्या वतीने महिला मेळावा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. कविता गंगाधर सोनकांबळे, डॉ. सुचिता संजय पेकमवार (स्त्रीरोगतज्ज्ञ), सुचित्रा भगत (समुपदेशक, महिला व बाल सहाय्यक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड), शकीला शब्बीर शेख (सदस्य, जिल्हा महिला सल्लागार समिती) यांनी महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता, सामाजिक भान आणि सशक्तीकरणाच्या विविध पैलूंवर प्रभावी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती लक्ष्मी गायके (वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक) यांनी केले. यानंतर डॉ. सुचिता पेकमवार यांनी महिलांच्या दैनंदिन आरोग्यविषयक सवयी, आरोग्य तपासण्या व आजारांबाबत सविस्तर माहिती दिली. प्रा. डॉ. कविता सोनकांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेतला.

सुचित्रा भगत यांनी कौटुंबिक हिंसाचार, सोशल मीडियाचा दुरुपयोग, सायबर सुरक्षेचे मुद्दे यावर महिलांना सजग राहण्याचे मार्ग सांगितले. शकीला शेख यांनी महिलांना शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावहारिक माहितीने सज्ज होण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमात स्वाधार योजनेचे धनादेश विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच नांदेड जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह व निवासी शाळांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर आधारित प्रभावी सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अंजली नरवाडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्रीमती गंगातीर ममता यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

या उपक्रमात समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध महामंडळांचे व्यवस्थापक, शासकीय वसतीगृहांच्या महिला गृहपाल व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

०००००

वृत्त क्रमांक 364

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन 

नांदेड दि. 9  एप्रिल :- शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबस चालक-मालकांनी त्यांच्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे. तसेच वाहनाचे सर्व कागदपत्रे वैध करुन घ्यावीत असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांनी केले.

 

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कुलबस चालक-मालकांनी शालेय शैक्षणिक सत्र 2024-25 संपत आलेला आहे. नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 माहे जूनपासून सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे व वाहनाचे सर्व कागदपत्रे वैध करुन घ्यावीत. तसेच वाहन तांत्रिकदृष्टया दोषमुक्त व सुस्थितीत ठेवावे. शैक्षणिक सत्र 2025-26 सुरु झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन या कार्यालयाच्या तपासणी दरम्यान दोषी आढळून आल्यास त्या वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही प्रादेशिक परिवहन विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्रमांक 363

 जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा

सर्व विभागांनी कालमर्यादेत कार्यवाही पूर्ण करावी-         जिल्हाधिकारी राहुल कर्डीले 

100 दिवसांच्या आराखड्यानुसार नांदेड जिल्हा अव्वल राहील यादृष्टीने कामे पूर्ण करावेत

नांदेड, दि. 9 एप्रिल :- राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व कार्यालयात आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला व प्रत्येक विभागाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत दिलेल्या उद्दिष्टांनुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले. 

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजुषा कापसे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव तसेच विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. 

या बैठकीत राज्य शासनाने प्रत्येक कार्यालयाला दिलेल्या 100 कृती आराखड्यानुसार दिलेल्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांनी आतापर्यत केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच शासनाने दिलेल्या कृती आराखड्यानुसार नांदेड जिल्हा राज्यात अव्वल राहील यादृष्टीने प्रत्येक विभागाने आपले काम विहित वेळेत पूर्ण करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. 

100 दिवसांच्या आराखड्यानुसार संकेतस्थळ व माहिती अद्ययावतकरण यामध्ये सर्व कार्यालयांनी त्यांच्या संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आवश्यक माहितीचे स्वयंप्रकटीकरण करावे. संकेतस्थळ नागरिकांसाठी उपयुक्त, सुलभ आणि माहितीपूर्ण असावे. 

नागरिकांना सेवा सुलभ करणे

नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कमीत कमी दोन सेवा सुलभ करण्याच्या दृष्टीने नव्या कार्यपद्धती राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. स्वच्छता व अभिलेख व्यवस्थापन यामध्ये कार्यालयातील स्वच्छता कायम राखण्यावर भर देत, निंदनीय व नष्ट करण्यायोग्य अभिलेखांचे वर्गीकरण आणि प्रक्रिया तात्काळ राबवण्याचे आदेश दिले. 

तक्रारींचे जलद निराकरण यामध्ये आपले सरकार, पीजी पोर्टल आदी माध्यमांतून प्राप्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारींचा पूर्ण निपटारा करावा. तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी उपाय यात नागरिकांसाठी कार्यालयात दर्शनी भागात अभ्यागत भेटीच्या वेळेची माहिती फलकावर असावी.            

ग्रामस्तरावरील कामकाजावर लक्ष याबाबीत अधिकारी वर्गाने आठवड्यातून किमान एकदा क्षेत्रीय कार्यालयांना भेट देवून ग्रामपंचायती, आरोग्य केंद्र, शाळा व अंगणवाड्यांच्या कामकाजाची पाहणी करावी. 100 दिवसांचा कृती आराखडा म्हणजे केवळ औपचारिकता न राहता, त्यातून नागरिकांना फायदा होईल याची प्रत्येक विभागाने काळजी घ्यावी. प्रशासन हे नागरिकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम असावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर याबाबतचे  पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले.

00000







विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे आज सकाळी गुरु गोविंद सिंह जी नांदेड विमानतळावर स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,मनपा आयुक्त डॉ.महेश डोईफोडे उपस्थित होते.












वृत्त क्रमांक 362

 गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक– जिल्हाधिकारी 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

नांदेड दि. 9  एप्रिल :- “AI हे सध्याच्या काळात प्रशासन, आरोग्य, शिक्षण, महसूल, नागरी सेवा आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरत आहे. कर्मचाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापराबाबत माहिती करून त्यांचा शासकीय कामकाजात प्रभावीपणे वापर करावा. तंत्रज्ञानाच्या मदतीने शासकीय कामकाजात आधुनिक कार्यक्षमता, अचूकता आणि पारदर्शकता येईल. गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. 

मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या नियोजनांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून हे प्रशिक्षण घेण्यात आले. नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज नियोजन भवन येथे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचा उद्देश कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे त्यासोबतच प्रशासनाच्या कामकाजात AI चा प्रभावी वापर कसा करता येईल हे समजावणे हा आहे.

आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, सहाय्यक जिल्हा माहिती व सूचना अधिकारी प्रदीप डुमणे, तहसिलदार विपीन पाटील, माहिती तंत्रज्ञ निलावार तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.  

या प्रशिक्षणात सहभागी कर्मचाऱ्यांना AI म्हणजे काय, त्याची कार्यप्रणाली, विविध सरकारी विभागांतील कामकाजात वापर, डेटा विश्लेषण, डिजिटल कागदपत्रांचे व्यवस्थापन, नागरी सेवा सुधारणा अशा विविध बाबीची माहिती व सादरीकरण उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी नाविन्यपूर्ण प्रशिक्षण अंतर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून एनआयसीचे सहाय्यक जिल्हा माहिती सूचना अधिकारी प्रदीप डुमणे व संतोष निलावार यांनी विशेष मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण सत्रात प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांनीही याचा सकारात्मक अनुभव व्यक्त केला आणि भविष्यात त्यांच्या विभागातील कामात AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी दर्शवली.

AI तंत्रज्ञानाची मुलभूत माहिती, शासकीय कामकाजातील उपयोग, चार्टजीपीटी सारख्या सहाय्यक प्लॅटफार्मचा वापर, डेटा विश्लेषण आणि निर्णय या प्रक्रीयेतील मदत याबाबींवर सखोल मार्गदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले. तसेच या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि गतिमान होईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी  व्यक्त केला.

00000





 विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद

11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ‘संवाद मराठवाडयाशी’ उपक्रम

आठही जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत नागरिकांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर दि.9: मराठवाडा विभागातील आठही  जिल्हयातील नागरिक आपल्या विविध कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. आपल्या प्रशासकीय समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिक येत असतात, मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा ‘संवाद मराठवाडयाशी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ येत्या 11 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत विभागीय आयुक्त श्री गावडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

विभागीय आयुक्त श्री गावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’  या उपक्रमाची सुरूवात झाली आणि संपूर्ण प्रशासन थेट गावात पोचले. या उपक्रमाच्या यशानंतर विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातून छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकीय कामानिमित्त येण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे ‘संवाद मराठवाडयाशी’ या उपक्रमाची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत विभागीय आयुक्त श्री गावडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत संवाद साधणार आहेत. श्री. गावडे यांच्यासमवेत यावेळी विभागीय पातळीवरील प्रशासकीय अधिकारीही उपस्थित असणार आहेत. प्रत्येक आठवडयात दर बुधवारी 4 ते 6 यावेळेत आयुक्त नागरिकांशी संवाद साधतील. प्रत्येक संवादावेळी प्रशासकीय विभाग व विषय ठरविण्यात येणार असून यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी सबंधित विषयावर विभागीय आयुक्त श्री गावडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 

नागरिकांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी सबंधित योजना, प्रश्न, असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच याबाबत असलेल्या अडचणीबाबत थेट विभागीय आयुक्त यांच्याशी संवाद साधता येणार आहे.  नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे अवाहन विभागीय उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले आहे.

याबाबतचा क्युआर कोडही प्रसिदध करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलव्दारे या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

00000



 

Monday, April 7, 2025

वृत्त क्रमांक 361

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन

8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

 

नांदेड दि. 7  एप्रिल :- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्यावतीने 1 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन उद्या 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते समाज कल्याण कार्यालयात होणार आहे.

 

या सामाजिक सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत विभागाच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी तसेच नागरिकामध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने 8 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रम सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय व त्यांच्या अधिनस्त नांदेड जिल्ह्यातील कार्यरत अनु. जाती मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात सामाजिक सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 360

 अंगणवाडी मदतनिस मानधनी पदासाठी 24 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 7  एप्रिल :- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येणार आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती याबाबत सविस्तर जाहिरात  https://nanded.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी 24 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर व्हि.एस.बोराटे यांनी केले आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत पात्र स्थानिक रहीवासी असलेल्या महिला उमेदवारांकडून 8 ते 24 एप्रिल 2025 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागणी करण्यात येत आहे. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर, हौसिंग सोसायटी, घर क्र. 114, शासकीय विश्रामगृह ते पावडेवाडी नाका रोड, गणेश नगर, नांदेड कार्यालयात अर्ज करावेत.

00000

वृत्त क्रमांक 359

 विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा दौरा

                                                                                          

नांदेड दि. 7  एप्रिल :-  महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती हे 9 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

                                                                                                                                      बुधवार 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईहून नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 8.45 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने सेलूजि. परभणीकडे प्रयाण. सायंकाळी 5.10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.

0000

वृत्त क्रमांक 358

 जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे

"समता पंधरवडा " विशेष मोहिमेचे आयोजन

नांदेड दि.  एप्रिल :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे"समता पंधरवडा" आयोजित केला आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने एप्रिल ते 14 एप्रिल, 2025 या कालावधीत विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या समता पंधरवड्यात विशेष मोहिमेतंर्गत जिल्हयातील इ.11 व 12 विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थीसीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन भरलेला परिपूर्ण अर्ज जमा करुन जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत. तसेच सर्व कनिष्ठ विज्ञान शाखेच्या महाविद्यालयानी देखील या मोहिमेचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुं. कुलाल यांनी केले आहे.
                                                                                                                               

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समतास्वातंत्र्यबंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  राज्यघटनेच्या कलम 46 मध्ये घटनेने समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केली आहे.  त्याअनुषंगाने राज्यातील अनुसूचित जातीवंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत.  यासर्व योजनांची जनतेला माहिती व्हावी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य यांचा प्रचारप्रसिध्दी व्हावीयासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध"समता पंधरवडा"कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे.


समता पंधरवडयात सन 2024-25 मधील विज्ञान शाखेतील प्रवेशित अनुसूचित जातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विहित मुदतीत समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान संपूर्ण नांदेड जिल्हयातील विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रकरणे तालुका व महाविद्यालय निहाय संख्यात्मक माहिती महाविद्यालयस्तरावर स्थापन केलेल्या समान संधी केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालय व तसेच जिल्हास्तरावर संकलित करण्यात येणार आहेत. 

समता पंधरवडयात सन 2024-25 मधील इ. 11 व 12 विज्ञान शाखेतील तसेच सीईटी देणारे विद्यार्थीडिप्लोमाच्या तृतीय वर्षातील प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पावेतो जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाविद्यालयामार्फत जातप्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज समितीकडे दाखल केलेले नाहीतअशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विशेष मोहिमेतंर्गत त्यांचे ऑनलाईन अर्ज संबंधित महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत भरुन महाविद्यालयाकडे दाखल करावेत.  त्याच बरोबर अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत विशेष मोहिमेतंर्गत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.  तसेच संबंधित महाविद्यालयाच्या समान संधी केंद्रामार्फत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जमा करुन घेण्यात आलेले ऑनलाईन भरलेले एकत्रित अर्ज प्रवर्गनिहाय समितीकडे प्राप्त झाल्यानंतर अशा सर्व अर्जावर समितीच्यावतीने तात्काळ कार्यवाही करुन वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरुन समितीचे कामकाज अधिक पारदर्शकलोकाभिमुख व गतिमान होऊन विद्यार्थ्यांना विहीत वेळेत वैधता प्रमाणपत्र मिळू शकेल.

00000

वृत्त क्रमांक 36 8 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा  नांदेड, दि. 9 एप्रिल :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे...