विशेष लेख परीक्षेला जाताना....
प्रिय, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो परीक्षा' सुरु होणार तुमची, खूप खूप शुभेच्छा प्रथम तुम्हा सर्वांना. बारावीचे वर्ष, बारावीची परीक्षा सगळं वातावरण वेगळ असत. परीक्षा' ही काही वेळापुरती, काही प्रश्नापुरती असली तरी त्यामागे वर्षभर केलेली मेहनत, अभ्यास असतो.
परीक्षेला जाताना..
*परीक्षा* कोणतीही परीक्षा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असते. त्यातल्या त्यात 12 वीची परीक्षा सर्वांनाच महत्वाची असते. पालक व विदयार्थी यासाठी तयारी करत असतात. 1. नियोजन परीक्षेचे नियोजन अभ्यासाचे सातत्य, नियोजन पूर्वक केलेला अभ्यास, प्रत्येकाची समजून घेण्याची विषयानुसार आवड, ग्रहणशक्ती, वातावरण इ. यात येतात.
टाईम टेबल.. वेळापत्रक आल्यापासूनच नियोजन करायला हवे. हॉल तिकीट जपून ठेवणे परीक्षा केंद्र व घर,हॉस्टेल,रूम यातील अंतर यानुसार परीक्षा केंद्रावर वेळेआधी पोहचण्याचे नियोजन करणे . त्यासाठी योग्य वाहनाचे नियोजन करने किंवा कशाप्रकारे जायचे ते ठरवणे परीक्षेला घरून निघताना प्रोटोकॉल नियमां नुसार ड्रेसिंग -कपडे परिधान करणे इतरही नियम पाळणे. हॉल टिकिट सोबत ठेवणे पानी, घड्याळ नियमानुसार असणे वेळे आधी परीक्षा केंद्रावर आल्याने घाई गडबड होत नाही.
महत्वाचे म्हणजे रात्रीची झोप शांत होणे आवश्यक आहे. जास्त जागरण करू नये. सकाळी जेवण करावे काहीतरी पोषक खावे, परीक्षेला जाताना उपाशी राहू नये पाणी व्यवस्थित प्यावे. परीक्षा काळात साधेपण पोषक आहार घ्यावे, अतितिखट, मसाले, आंबवलेले, बाहेरचे पॉकेटमधील अन्न खाऊ नये. परीक्षा काळात आहार साधा, पोषक, सहज पचणारे असावा. परीक्षा केंद्रावर आल्यानंतर वातावरण हलकफुलक असाव . उगाचच टेंशन घेऊ नये, आपण अभ्यास केलेला आहे, त्यामुळे कोणताही प्रश्न आपण सोडवू शकतो हा आत्मविश्वास असावा.
परीक्षा केंद्रावर आल्यानंतर तसेच समोर पेपर पाहून नविन वातावरण पाहून घाबरु नये. शांत रहावे. जर घबराहट वाटले, धडधड वाटली थरथर वाटली तर मनाला स्वतः सांगावे. शांत रहा सर्व छान होईल घाबरु नका रिलॅक्स रहा, रडू नका. या वेळी फक्त श्वासावर लक्ष्य द्यावे. थोडा वेळ श्वास घ्या श्वास सोडा असे दीर्घश्वसन करावे. श्वास मोकळा घ्यावा. साधारणतः आत घेताना, श्वास 4 सेकंद व श्वास सोडताना सहा सेकंद असे प्रमाण असावे. असे 2 ते 5 वेळा करावे. किंवा मोकळा श्वास आत घेऊन सोडताना मेणबत्ती फुंकल्यासारखे फू करून श्वास सोडावा असे श्वासावर लक्ष्य दिल्याने ताण कमी होतो व परीक्षेवर लक्ष्य केंद्रित करावे. पेपर हाती आल्यानंतर उत्तरपत्रिका यावर आपला नंबर इ. व्यवस्थित लिहावे उपस्थित शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे, चुका करू नयेत. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे. प्रश्न स्वतःला जसे येतात तसे सोडवावे इतरांना काही विचारून डिस्टर्ब करू नये, शंका असल्यास गारडींगला असलेल्या सर मॅडमशी संपर्क साधावा.
*कॉपी करू नये*
स्वतःच्या हिंमतीने अभ्यास करून मिळवलेले मार्कस - आयुष्यभर उपयोगी पडतात, त्यामुळे आपला पेपर सोडवताना शांत राहून मन एकाग्र करून उत्तरे लिहावीत. अस्वस्थता कोणताही प्रश्न वाचून अस्वस्थ होऊ नये. घाबरु नये, वाटल्यास थोडा वेळ दीर्घ श्वसन करावे, आपणास जे प्रश्न सोपे वाटतात ते आधी सोडवावे नंतर कठिण प्रश्न सोडवावे, मन आनंदी ठेवावे. वेळेचे नियोजन प्रश्नांच्या मार्कानुसार उत्तरे लिहिताना वेळेचे नियोजन असावे त्यामुळे वेळ पुरतो अन्यथा एकाच प्रश्नात वेळ जास्त गेल्याने वेळेचे गणित बिघडू शकते म्हणून वेळेकडे लक्ष्य असावे. हस्ताक्षर हस्ताक्षर सुवाच्य , सुंदर वाचता येण्या सारखे असावे. घाईघाईत खराब अक्षर असू नये. सुटसुटीत ,मुद्देसूद लिहावे. एक पेपर झाल्यावर परीक्षा काळात ज्या दिवशी जो पेपर असेल त्या पेपर झाल्यानंतर उगाचच त्याबद्दल चर्चा करत वेळ वाया घालवू नये, दुसरा पेपरची लगेच तयारी सुरु करावी सगळ्यात शेवटी संपूर्ण विषयांचे पेपर्स झाल्यानंतर त्यावर चर्चा करावी. यशस्वी व्हा आनंदी वातावरणात, हसत खेळत परीक्षा द्यावी, काळजी, चिंता करू नये. पालकांनी घरातील वातावरण शांत व उत्साही असावे उगाचच परीक्षेचा बाऊ करू नये, अवास्तव अपेक्षांचे ओझे देऊ नये, घाबरून जाऊ नये. स्ट्रेस न घेता शांत चित्ताने पेपर सोडवावा व यशस्वी व्हावे, सर्वांना खूप खूप शुभेच्छा यशस्वी भव.
डॉ. पुष्पा गायकवाड,
वैद्यकीय अधिकारी
जिल्हा रुग्णालय नांदेड
मो- 9422862625
टीप- परीक्षा काळात काही अडचण आल्यास विद्यार्थी विद्यार्थिनी पालक कधी ही फोन करू शकतात.