Friday, January 23, 2026

विशेष लेख : 

हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी : मनाचे श्लोक

 

शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांना संपूर्ण भारतात "हिंद दी चादर" (भारताचे संरक्षक) म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्थान केवळ शीख इतिहासातच नाहीतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदराचे आहे. ते केवळ एक धार्मिक नेते नव्हतेतर मानवी सन्मानश्रद्धा स्वातंत्र्याचे सर्वोच्च रक्षक होते. त्यांचे जीवन आणि कृती आपल्याला स्वतःच्या धर्मापलीकडे जाऊन मानवतेची मूल्ये कशी जपावीतयाबाबत शिकवते.

 

श्री गुरू तेग बहादूरजी असे योद्धे होतेकी वयाच्या 14 व्या वर्षी मोगलांबरोबरच्या युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. तलवारीने शत्रूस कंठस्नान घातले. म्हणून त्यांचे नाव तेग बहादूर ठेवले गेले. तरीही पुढे अध्यात्मिक साधनेमुळे ते पूर्णपणे स्थिरमती बनले. सुखदु:खहर्षखेद यापासून मुक्तअसे मुक्तामा बनले. त्यांना ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यासही त्यांनी क्षमा केलीकेवढे हे त्यांचे औदार्य आणि मनाची ताकद.

 

श्री गुरू तेग बहादूरजी यांचे पुत्र शीख धर्मियांचे दहावे आणि अंतिम देहधारी गुरू श्री गुरू गोबिंद सिंग जी. त्यांनी नांदेड येथे देह त्यागण्यापूर्वी त्यांच्यानंतर देहधारी गुरू असणार नाहीअसे घोषित केले. पवित्र गुरू ग्रंथ साहिब यांना गुरूपद बहाल केले. या पवित्र गुरू ग्रंथ साहिबमध्ये श्री गुरू तेगबहादूर जी यांच्या 59 पद्यांचा व 57 श्लोकांचा अशा एकूण 116 रचनांचा समावेश आहे.

 

पवित्र ग्रंथ श्री गुरू ग्रंथ साहिबचा प्रारंभ श्री गुरू नानकदेवांच्या जपुजी साहिब वाणीने झाला. तर ‍हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या श्लोकांनी समारोप. पवित्र गुरू ग्रंथ साहिब एक हजार 430 पानांचा आहे. पान क्रमांक एक हजार 425 ते  एक हजार 428 यावर श्री गुरू तेगबहादूरजी यांचे मनाचे श्लोक अंकित आहेत. श्री गुरू तेगबहादूरजी (गुरूजी) यांच्या श्लोकांमध्ये साधकास परमेश्वर प्राप्तीसाठी मनाची कोणती अवस्था प्राप्त केली पाहिजेयाचे विवेचन आहे.

 

प्रस्तुत लेखात काही निवडक श्लोकांमधून मनास उपदेशमोहमायेपासून दूर जाणेसंस्कारित मन असणे अत्यावश्यक असल्याचे ज्ञान होते. आदर्श जीवन जगण्याची पद्धत समजते. गुरूजींच्या श्लोकांमधील विचार प्रत्येकाने आचरणात आणायलाच हवेत. त्यातून मानवाचे कल्याणच होणार. तसेच गुरूजींच्या वाणीतून जगाचे खरे स्वरूपशाश्वत सत्य समजते.

 

माया किंवा मोह आपल्याला बांधून ठेवतेयावर श्री गुरू तेग बहादूरजींनी भाष्य केले आहे. त्यांच्या मतेजग आणि त्यातील सुख-दुःखे क्षणभंगुर आहेत.

 

 जग रचना सभ झूठ हैजानि लेहु रे मीत ॥

 कहि नानक थिरु ना रहेजिउ बालू की भीत ॥ 49

 अर्थ : गुरू नानक म्हणतात, "मित्राहे जग नश्वर आणि अस्थिर आहे. ज्याप्रमाणे वाळूची भिंत टिकत नाहीतसेच हे जगही टिकणारे नाही." 

जेव्हा आपल्याला हे सत्य समजतेतेव्हा आपण भौतिक मोहातून मुक्त होतो. ही समज आपल्याला सेवा आणि निःस्वार्थ कामाकडे वळवते.

श्री गुरू तेग बहादूरजींनी मानवी दुःखाची कारणे शोधलीत्यावर मात करण्याचा मार्ग दाखवला. त्यांची शिकवण संपूर्ण मनुष्य जीवनाचे कल्याण करणारी आहे.

 

मोह आणि अहंकारावर विजय

माणसाचा स्वार्थअहंकार त्याला सत्यापासून दूर नेतो. यावर विजय मिळवणारा माणूस स्वतःसोबत इतरांनाही तारतो.

 

जो प्राणी ममता तजैलोभ मोह अहंकार ॥

कहु नानक आपन तरैअउरन लेत उधार ॥22

अर्थ : गुरू नानक म्हणतात,  जो माणूस लोभमोहमायाममता आणि अहंकार या विकारांचा त्याग केला तो स्वत: तर भवसागर तरून जातोचएवढेच नव्हे तर इतरांचाही  तो उद्धार करतो.

 

2. लोभक्रोधाचा त्याग

लोभ आणि राग नातेसंबंधांना तडा देतात. ज्याला सुख-दुःखाचा स्पर्श होत नाहीतो साक्षात ईश्वराचे रूप असतो.

 सुख दुखु जिह परसै नहीलोभु मोहु अभिमानु ॥

कहु नानक सुनु रे मनासो मुरति भगवान ॥13

 अर्थ : गुरू नानक म्हणतातज्याला सुख-दुःख स्पर्शही करू शकत नाहीजो लोभमोहअभिमान आदी विकारांपासून मुक्त आहेतो जीव साक्षात ईश्वर स्वरूप आहे.

 

3. सुख-दुःखात स्थिर मन

आयुष्यात चढ-उतार येणारच. पण जो शत्रू आणि मित्र दोघांना समान मानतो आणि दुःखात खचत नाहीतोच खरा ज्ञानी.

 

हरखु सोगु जा कै नहीबैरी मीत समानि ॥

कहु नानक सुनि रे मनामुकति ताहि तै जानि ॥15

अर्थ : गुरू नानक सांगतातज्याला हर्षशोक वेगळे वाटत नाहीतजो शत्रू मित्र यांना समान मानतोजो जीव मुक्त झाला आहेअसे समज.

 

4. भक्ती आणि नामस्मरण

सर्व संकटांतून मुक्त होण्यासाठी गुरूजींनी ईश्वराच्या नावाचे स्मरण करण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे.

 

राम नामु उरि मैं गहिओजा कै सम नहि कोइ ॥

जिह सिमरत संकट मिटैदरसु तुहारो होइ ॥57

अर्थ :  अंत समयी  गुरू नानकजी म्हणतात "अरे मित्रा ! नामस्मरणमात्रे संकटे नष्ट होतातआणि परमेश्वराचे- दर्शन होते ते रामनाम हृद्यात धारण कर. त्याच्या तोडीचे जगात अन्य काहीही नाही."

 

हिंद-दी-चादर श्री. गुरू तेग बहादूरजींनी त्यांच्या कृती आणि आचरणातून सर्वांना अनमोल विचार दिला. त्यांचा विचार अंगीकारणेआचरणात आणणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहेच. ‘कहु नानक सुन रे मना’ या वाक्यांद्वारे गुरूजी मनाला वारंवार अनेक दुष्कार्यापासून आपणास परावृत करून सत्कार्याशी जोडण्याचा संदेश देतात. असे गोड अमृत सर्व मानवाने चाखावे.  

 

कामक्रोधलोभमोहअहंकारमत्सर यापासून मुक्तता म्हणजेच आत्मशुद्धीसत्संग प्रधानताजीवननिष्ठेत विधायकतेबरोबर अनाग्रही निवृत्तीप्रपंच आणि परमार्थनामस्मरण यांचा सुमेळ ही गुरूजींच्या वाणीतील वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे विचार एका समाजापुरते नाहीत. तर ते सर्व मानव कल्याणाचे आहेत. मनाला संस्कारित करणारे आहेत. गुरूजींची वाणी सर्वांपर्यंत पोहोचावी. आजच्या काळात त्यांच्या विचारांचेशिकवणीचे अनुकरण ही काळाची गरज आहे. ते अमृत प्रत्येकाने चाखल्यास जीवनाचे नक्की सार्थक होईल.

 

-   डॉ. श्याम टरके,  सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालयलातूर


संदर्भ-

गुरू नानकांची वाणी जपुजी साहिब. (2006). मध्ये त. ग. विनायक लिमये. पुणे : तारासिंह गोरोवाडासिख धर्मप्रचार कमिटीपुणे. 01 16, 2026 प्राप्त

 

ऐक रे मना ! (‍ तिसरी आ.). (2013).  (त. ग. विनायक लिमयेअनु.) पुणे: तारासिंह गोरोवाडासिख धर्मप्रचार कमिटीपुणे. 01 16, 2026 प्राप्त

***




No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...