Thursday, October 5, 2017

किटकनाशके, तणनाशके फवारताना
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 5 :-  शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये म्हणून किटकनाशके फवारतांना काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत शेतकऱ्यांना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
रासायनिक खत डीबीटी प्रकल्पाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. टी. एस. मोटे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे, एनआयसीचे सुनिल पोटेकर, तालुकास्तरीय कृषि अधिकारी, रासायनिक खत कंपनी प्रतिनिधी, व्हीजेन्टेक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हयास पुरवठा झालेले e-Pos मशिन, नोंदणी तसेच लागणाऱ्या अतिरिक्त e-Pos मशिन बाबतचा आढावा घेण्यात आला. जे खत विक्रेते अनुदानीत खताची विक्री करीत नाहीत त्यांनी त्यांच्या परवान्यातील अनुदानीत खत विक्रीची मान्यता रद्द करुन घ्यावी. तसेच खत विक्री केंद्राच्या दर्शनी भागावर येथे अनुदानीत खताची विक्री करण्यात येत नाही असे ठळक अक्षरात फ्लेक्स लावावेत. खत विक्रेत्याने परवाना घेतल्यानंतर खत खरेदी विक्री करणे आवश्यक आहे. जे खत विक्रेते परवाना घेऊन देखील खत विक्री करत नाहीत अशा खत विक्री केंद्राचे परवाने कार्यवाहीसाठी कृषि अधिकारी यांचेमार्फत सादर करण्यात यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या.
किटकनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी
किटकनाशक विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना किटकनाशक औषधी विक्री करतांना ना नफा ना तोटा या तत्वावर सुरक्षा किट देण्यात यावेत ती शेतकऱ्यांनी फवारणी करतांना वापरावी. किटकनाशके खाण्याचे पदार्थ सोबत ठेवू नयेत. शेतात किड, रोग नियंत्रणासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात. हेच रासायनिक औषधे शेतकरी शेतात, पिकावर फवारतांना मुख्यत: 3 प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. रासायनिक औषधांचे अत्यंत बारीक कण हवेबरोबर श्वासोच्छवासासोबत शरीरात जातात. फवारणी करीत असतांना त्चचेच्या संपर्कामधून तथा डोळयांद्वारे शरीरात जातात. फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खातांना शरीरात जाऊ शकतात.
किटकनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी
गळके फवारणी यंत्र वापरता ते दुरुस्त करुन वापरावे. किटकनाशके फवारणी यंत्रात भरतांना सांडू नये यासाठी नरसाळयाचा वापर करावा. तणनाशक फवारणीसाठी वेगळा पंप वापराव तो पंप किटकनाशक फवारणीसाठी वापरु नये. किटकनाशक वापरतांना संरक्षक कपडे वापरावेत. फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत. झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत. किटकनाशकला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे. फवारणीचे मिश्रण हाताने ढवळता लांब लाकडी दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा. किटकनाशक  पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करतांना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. फवारणीचे काम पुर्ण झाल्यानंतरच हात साबणाने स्वच्छ धुवून खाणे-पिणे करावे. फवारणीचे वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दुर ठेवावे. उपाशीपोटी फवारणी करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी. फवारणी करतांना वापरलेली भांडी आदी साहित्य नदी, नाला किंवा विहीरीजवळ धुवू नयेत. तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावे. किटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात. फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये त्यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणी वापरावी. किटकनाशके फवारण्याचे काम दर दिवशी आठ तासांपेक्षा जास्त वेळ करु नये. हे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ठराविक कालावधीने डॉक्टरांकडून स्वत:ला तपासून घ्यावे. किटकनाशके फवारण्याचे काम करतांना वापरण्याचे कपडे स्वतंत्र ठेवावेत वेळोवेळी स्वच्छ धुवून काढावेत. किटकनाशके अंगावर पडू नये म्हणून वाऱ्याच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये. किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान दोन आठवडे जावू देवू नये. जमिनीवर सांडलेले किटकनाशक  हातांनी पुसता त्यावर पाणी टाकता ती माती / चिखल यांच्या सहाय्याने शोषून घ्यावेत जमिनीत गाडून टाकावीत. डब्यांवरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपुर्वक लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह / खून असलेली औषधी सर्वात अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा हिरवा सा क्रम लागतो.
विषबाधा झाल्याची लक्षणे उपाययोजना
विषबाधा ही किटकनाशके / तणनाशके यांचा त्वचेशी संपर्क अथवा पोटात गेल्यास होते. विषबाधा इतर आजार यांचा लक्षणात बरेचदा साम्य राहू शकते.
विषबाधाची लक्षणे - अशक्तपणा चक्कर येणे. त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे. डोळयांची जळजळ होणे, पाणी येणे, अंधुक दिसणे. तोंडातून लाळ गळणे, तोंडाची आग हाणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे. डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जिभ लुळी पडणे, बेशुध्द होणे. धाप लागणे, छातीत दुखणे, खोकला येणे.
विषबाधेची शंका आल्यास खात्री करा - रोग्याचा किटकनाशकांसह संपर्क आला होता काय ? नेमके कोणते किटकनाशके वापरले ? शरीरात किती गेले ? ते केव्हा गेले? डॉक्टरांसाठी वरिल माहिती महत्वाची आहे.
विषबाधेनंतर तातडीने करावयाचे प्रथमोपचार - किटकनाशके / तणनाशके डोळयांत उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनिटापर्यंत पाण्याची धार सोडून धुवा. शरीररावर उडाले असल्यास 10 मिनीटे साबणाने स्वच्छ धुवा दवाखाण्यात न्या. विषबाधेनंतर रोगी जर संपुर्ण शुध्दीवर असेल तरच त्याला उलटी करण्यास प्रवृत्त कराव 3 चमचे बारीक लाकडी कोळसा भुकटी करुन अर्धा ग्लास पाण्यातून पाजा लगेच दवाखाण्यात घेऊ जावे. विषारी औषध कपडयांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखाण्यात पोहचवा, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...