Wednesday, January 2, 2019


हरवलेल्या इसमाबाबत शोध
नांदेड दि. 2 :-  मारोती विश्वनाथ इगवे वय 40 वर्ष व्यवसाय मजुरी रा. दिक्षानगर बळीरामपूर ता. जि. नांदेड (मो. 8806649145) यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांना अर्ज सादर केला आहे. त्यांची मुलगी नामे सौ. पुजा भ्र. गणेश गरुडे वय 24 वर्षे रा. दिक्षानगर , बळीरामपूर ता. जि. नांदेड ही दिनांक 31 डिसेंबर, 2018 रोजी संध्याकाळी 7-00 वाजता सोबत दिड वर्षाचा मुलगा अनुजसह निघून गेली परत न आल्याने त्याचा आम्ही नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळून आला नाही.
हरवलेल्या मुलाचे वर्णन रंग सावळा, उंची पाच फुट, केस काळे वेणी, पोशाख साडी ब्लाऊज, भाषा मराठी , बांधा सडपातळ सोबत दिड वर्षाचा मुलगा अनुज  आहे, असे पोलीस स्टेशन, नांदेड (ग्रामीण)चे पोलीस निरीक्षक यांनी कळविले आहे.


श्री खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 2 :- माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे. त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 2 ते 12 जानेवारीच्या मध्यरात्री पर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व माळाकोळीचे स्वाधीन अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत.
श्री खंडोबा यात्रेत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, इतर राज्यातून भाविकांची दर्शनासाठी व यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याअनुषंगाने रस्त्यावरील व रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे हे फर्मविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग अशा वेळा विहित करण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा-अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबद्दल. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये, घाटांत किंवा घाटांवर, सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवालये आणि सार्वजनिक स्थळी किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबाद्दल. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमवणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सुचना देण्यासंबंधी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राखणेकामी योग्य आदेश देण्याबाबत.
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक सुरेश मान्टे यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहीरसभा, मोर्चे, मिरवणूक, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेले आदेशाचे पालन करावेत. परवानगी दिलेल्या जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा यात समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असे आदेशही पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी जारी केले आहेत.
00000


भारत निवडणूक आयोगाचा
राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 
नांदेड दि. 2 :-   भारत निवडणूक आयोग यांनी सन 2012 ते सन 2018 दरम्यान मतदार शिक्षण व जनजागृतीच्या अनुषंगाने सर्वोत्कृष्ट मोहिम राबविण्यासंबंधाने राष्ट्रीय माध्यम पुरस्कार देण्यास्तव चार प्रकारच्या श्रेण्यांमध्ये नामांकने मागविली आहेत. यात प्रिंट मिडीया, ईलेक्ट्रॉनिक (टेलिव्हीजन) मिडीया, ईलेक्ट्रॉनिक (रेडिओ) मिडीया, ऑनलाईन (इंटरनेट) / सोशल मिडीया ही नामांकने विशेष योगदानाच्या संपूर्ण माहितीसह मा. निवडणूक आयोगाकडे सादर करावयाची आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
0000 



राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत
3 4 जानेवारी रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर
नांदेड दि. 2 :- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा दिनांक 3 4 जानेवारी, 2019 रोजीच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
गुरुवार, दि. 3 जानेवारी, 2019 रोजी दुपारी 2-30 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन . 3-45 वाजता शंकरराव चव्हाण स्मृती , नांदेड येथे आगमन. 4  ते 4-20 वाजता शंकरराव चव्हाण स्मृती, नांदेड येथे राखीव.  4-25 वाजता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयोजित आयटीआय येथील महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यास उपस्थिती.
6-00 वा. पत्रकार परिषद 6-45 वा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार . रात्री 8-30  वा.                       खा. अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भोजनासाठी राखीव व मुक्काम .
शुक्रवार, दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने जयपूरकडे प्रयाण करतील.


पशुसवंर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा  
नांदेड दि. 2 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास ,मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
रविवार, दि. 6 जानवारी,  2019 रोजी जालना येथून रेल्वेने सकाळी 3.05 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह , नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता मल्हारगड कला महोत्सव मैदान माळेगाव ता. लोहा येथील धनगर समाज विकास परिषद आयोजित धनगर आरक्षण जागर महामेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6-00 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000


पशुसवंर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा  
नांदेड दि. 2 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास ,मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
रविवार, दि. 6 जानवारी,  2019 रोजी जालना येथून रेल्वेने सकाळी 3.05 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह , नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता मल्हारगड कला महोत्सव मैदान माळेगाव ता. लोहा येथील धनगर समाज विकास परिषद आयोजित धनगर आरक्षण जागर महामेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6-00 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000


पशुसवंर्धन मंत्री महादेव जानकर यांचा दौरा  
नांदेड दि. 2 :-  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास ,मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
रविवार, दि. 6 जानवारी,  2019 रोजी जालना येथून रेल्वेने सकाळी 3.05 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृह , नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता मल्हारगड कला महोत्सव मैदान माळेगाव ता. लोहा येथील धनगर समाज विकास परिषद आयोजित धनगर आरक्षण जागर महामेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6-00 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000


दरेसरसम साठवण तलावाचे घळभरणी कामात
शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण करु नये
जलसंपदा विभागाचे आवाहन  
नांदेड, दि. 2 :- दरेसरसम साठवण तलावाचे घळभरणीचे धरणामध्ये पाणीसाठा निर्माण करण्याचे काम प्रगत असतांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे काम बंद केले आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कामात अडथळा निर्माण करु नये असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना संपादीत जमिनीचा मावेजा वाढीव रक्कमेसह वाटप करण्यात आला असून संपादीत जमिनीची खरेदी खाजगी वाटाघाटीने सन 2011 मध्ये पूर्ण झाली आहे. संपादीत जमिनीचा सातबारा शासनाच्या नावे असून शेतकऱ्यांचा त्या क्षेत्रावर कुठलाही अधिकार नाही. तसेच चालू दराने जमिनीचे दर मागणे पूर्णत: नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. कारण या जमिनीची खरेदी शासनाने 2011 मध्ये केली आहे. उर्वरीत जमिनीची सांडवा व पूच्छ कालवा तसेच संरक्षक बांधासाठी आवश्यक अतिरिक्त जमिनीचे संपादन 11.54 हेक्टर सद्य:स्थितीत प्रगत असून त्यासाठी चालू दराने खरेदी करणे चालू आहे. हे दर यापुर्वी खरेदी केलेल्या सन 2011 मधील जमिनीस लागू करणे नियमबाह्य आहे. याबाबत कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांनी शेतकऱ्यांची मागणी अमान्य केली असून प्रकल्पाचे काम त्वरीत चालू करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामामध्ये कोणी अडथळा निर्माण केल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे किनवट येथील मध्यम प्रकल्प उपविभाग क्र. 2 चे उपविभागीय अभियंता अ. कि. कलवले यांनी केले आहे.  
00000


महाडीबीटी पोर्टलवर प्रलंबीत अर्ज त्वरीत पाठवावे
 - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 2 :- महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती, फ्री-शीप आदी अर्ज त्वरीत त्यांच्या लॉगीन आयडी वरुन वरिष्ठ कार्यालयास सोमवार 7 जानेवारी पर्यंत पाठवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील "भारत सरकार शिष्यवृत्ती" योजनेच्या अनुषंगाने  जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली महाडीबीटी पोर्टल संदर्भात कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस समाज कल्याण अधिकारी  सतेंद्र आऊलवार यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे याबाबत सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या. शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने असलेल्या अडीअडचणीबाबत देखील चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी अचूक अर्ज भरण्यापासून ते मंजूर करणारे संबंधित घटकांना देखील गांभीर्य अवगत करावे व प्रशिक्षित करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
000000


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला लोकसंवादमधून राज्यातील लाभार्थ्यांशी थेट संवाद
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी
पाच ब्रास वाळू मोफत
नांदेड, दि. 2 :- प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीलोकसंवादकार्यक्रमात केली.
शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आजपासून लोकसंवादकार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी संवाद सुरू केला. या कार्याक्रमाच्या पहिल्या भागात आज राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनेच्या चांदा ते बांदापर्यंतच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांबरोबरच विविध आवास योजनेतून बांधलेल्या घरातील प्रत्यक्ष लाभार्थ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजनेचा लाभ घेताना कोणत्या अडचणी आल्या, अनुदान वेळेत मिळाले का, शौचालयाचे बांधकाम केले का, अनेक प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडून जाणून घेतली. यावेळी, अनुदान थेट बँकेतून मिळत असल्यामुळे राज्य शासनाच्या योजना जलदगतीने सर्वसामान्यांपर्यंत पोचले असल्याच्या व त्या पारदर्शकपणे राबवित असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. राज्य शासनाने राबविलेल्या योजनांमुळे पक्क्या व सुंदर घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचेही या लाभार्थ्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. घरकुलाबरोबरच उज्ज्वला योजना, शौचालय योजनांचा लाभही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्धा येथील आरती कोट्टेवार व गडचिरोली जिल्ह्यातील फुलेवाडा येथील जावेद शेख यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधताना रेती मिळण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या बांधकामासाठी पाच ब्रासपर्यंत रेती मोफत देण्याची घोषणा केली. तसेच यासंबंधी सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना सूचना देण्यात येणार असल्याचेही सांगितले.
या योजनेतील घरांच्या आराखड्यासाठी घेण्यात येणारे शुल्क माफ करण्यासंदर्भात केंद्र शासनाशी चर्चा सुरू असून लवकरच त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे अमरावतीतील आशा जामजोड यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनाचा लाभ मिळालेल्या वर्धा जिल्ह्यातील सुनंदा चौधरी यांनी या योजनेमुळे जागा मिळाली आणि प्रधानमंत्री आवास योजनेमुळे घराचे बांधकाम झाल्याचे सांगितले. तर वर्ध्यातीलच सविता श्रीशैल गायकवाड या घरकाम करणाऱ्या महिलेने प्रधानमंत्री आवास योजनेमुळे आपलं घर झाल्याचे सांगून प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
नांदेड मधील अर्धापूर तालुक्यातील लहान या गावातील अस्मिता राजेश वाहेवळ म्हणाल्या, कुडाचे घर असल्यामुळे इतर पाहुण्यांचे पक्के घर पाहून मुले वारंवार आपले घर चांगले का नाही, असा प्रश्न विचारत होती. घर नसल्यामुळे चांगले घर व्हावे, यासाठी मुले जोमाने अभ्यासाला लागली. त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेमुळे घर मंजूर झाले आणि यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदाच थेट संवाद साधता आला असल्याची भावना व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यातील सुजाता दिगंबर सावंत यांनी रमाई आवास योजनेतून घर मिळाल्यामुळे मुले आनंदी असून ते आपल्या मित्रमैत्रिणींना घरी आवर्जून आणत असल्याचे सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील दहिवलीचे कैलास धुळे, लातूरमधील बाबूराव साधू कांबळे, नागपूर जिल्ह्यातील खैरी पिंजेवाड येथील दर्शना सोलंकी, नाशिकमधील नंदा पाडेकर या लाभार्थ्यांशी त्यांच्या नव्या घराच्या ठिकाणी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला व घराच्या सुंदर बांधकामाबद्दल लाभार्थ्यांचे कौतुक केले. या लाभार्थ्यांनी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विष्णू राऊत यांनी राज्य व केंद्र शासनामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याच्या भावना व्यक्त करून आपल्या नव्या घरात भेट देण्याचे थेट निमंत्रणच मुख्यमंत्र्यांना दिले.
अन् देवेंद्रच्या रुपात देव धावून आला
इचलकरंजी येथील ज्योत्स्ना दशरथ घोडके म्हणाल्या, माझे कच्चे घर होते. मात्र, घराची पडझड झाली होती. त्याचवेळी मुलीचे बाळंतपण आले होते. त्या विवंचनेत असतानाच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल मंजूर झाल्याचा निरोप अधिकाऱ्यांनी स्वतःहून दिला अन् देवेंद्रच्या रुपात देवभेटल्याचा आनंद झाला. घराचे बांधकाम झाल्यामुळे मुलीचे बाळंतपणाचे दिवस सुखरुप झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णात पांडुरंग निकम यांनी सांगितले, पक्के घर बांधल्यामुळे आनंद झाला असून माझ्या मित्रांनी घरावर लावलेल्या कृ.पा. निकम या नावाच्या पाटीवर बदल करूनदेवेंद्र मोदीजी कृ पाअसा बोर्ड लावला असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सन 2022 मध्ये सारा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रत्येक बेघर कुटुंबाकडे आपला हक्काचा निवारा असावा, असा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यासाठी या कार्यक्रमाला त्यांनी गती दिली आहे. देशातील लाखो कुटुंबे स्वत:च्या घराचे स्वप्न पाहत आहेत. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या चार वर्षात देशात सव्वा कोटी घरांची निर्मिती करण्यात आली आहे. या घरांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात भरीव वाढ करण्यात आल्याने आता तुलनेने मोठ्या आकाराची आणि सोईसुविधायुक्त घरे दिली जाणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेने करण्यात येत असून अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात 12 लाख घरांची निर्मिती करण्याचे नियोजन केले असून 6 लाख घरांचे काम सुरू आहे. पुढील वर्षी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील एकही गरजू कुटुंब घराविना वंचित राहू नये, याचा निर्धार केला आहे. नुकतेच प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे राज्यातील अडीच लाख घरकुलांचे वितरण करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची संपूर्ण कार्यवाही योग्य पद्धतीने होऊन पात्र लाभार्थ्यालाच तिचा लाभ मिळावा हा प्रयत्न आहे. या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मजबूत भारताचे व गरिबीतून देशाला बाहेर काढण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
आधुनिक माध्यमाद्वारे एकाच वेळी राज्यातील सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले. लाभार्थ्यांशी संवादाचे थेट प्रक्षेपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या devendra.fadnavis या फेसबुक पेजवर, @Dev_Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर आणि DevendraFadnavis या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणि youtube.com/maharashtradgipr यूट्यूब चॅनलवरून आणि पार्थ इन्फोटेकच्या http://elearning.parthinfotech.in/ या लिंकवरून करण्यात आले होते.
नांदेडच्या लाभार्थ्यांशीही
मुख्यमंत्री फडणवीस यांनी साधला संवाद
जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना (नागरी व ग्रामीण) चा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून त्यांनी घेतलेल्या योजनेच्या लाभाबाबत माहिती घेतली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्स कक्षात त्यांनी विविध लाभार्थ्यांशी हा लाईव्ह संवाद साधला.
यावेळी अर्धापूर तालुक्यातील लहान या गावातील अस्मिता राजेश वाहेवळे, सुजाता दिगांबर सावंत, विशाखा राजू लोणे, विजया दिगांबर वाहेवळे तसेच नांदेड येथील माया विजय धुतराज, पंढीरानाथ पाबळे, सुदर्शन वाडेकर या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधून घरासाठी लाभ घेतलेल्या योजनेविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत घराचा लाभ घेतलेले पार्वतीबाई देशमाने, खंडू डाके, संभा बरकमकर, शांताबाई जाधव, जिजाबाई बरडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
000000

वृत्‍त क्र. 345

आतापर्यत आचारसंहिता भंगच्‍या सात तक्रारी ;  एका महिन्‍यात एकूण 60 लाखांचा ऐवज जप्‍त  नांदेड दि.१६ :- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून एक म...