Monday, May 22, 2023

वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणारे 1 हजार 383 ग्रामपंचायत उमेदवार अनर्ह

 वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणारे

हजार 383 ग्रामपंचायत उमेदवार अनर्ह 

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- आरक्षित जागेतून निवडून आलेले जिल्ह्यातील हजार 383 उमेदवार आपले जातीचे वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करु न शकल्याने त्यांना अनर्ह ठरविण्यात आले. महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1-अ) अन्वये जे उमेदवार आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर करतील त्या उमेदवारांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची तरतूद आहे. या उमेदवारांना संधी देवूनही ते आपल्या प्रमाणपत्राची वैधता सादर करू न शकल्यामुळे अशा हजार 383 उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रद्द केली.   

 

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी पार पडली होती. माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेतून निवडणूक लढवून आल्यानंतर शासनाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 17 जानेवारी 2023 पर्यत अंतिम मुदतवाढ दिली होती. अखेर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 18 मे 2023 रोजीच्या आदेशान्वये हजार 383 उमेदवार अनर्ह केले आहे.

 

अनर्ह केलेल्या तालुकानिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड 15, अर्धापूर 54, भोकर 138, मुदखेड 53, हदगाव 108, हिमायतनगर 70, किनवट 34, माहूर 19, धर्माबाद 99, उमरी 142, बिलोली 61, नायगांव 112, देगलूर 121, मुखेड 139, कंधार 91, लोहा 127 अशी एकूण हजार 383 अनर्ह उमेदवार आहेत.

0000

 खरीप हंगामासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- शेतकऱ्यांनी एचटीबीटी बियाणाबाबत जागरूक राहून अशा कुठल्याही अनधिकृत बियाणांची पेरणी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. खरीप हंगाम चांगला होण्याच्या दृष्टीने त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

 

या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे,  जिल्हा पोलीस अधिक्षक  प्रतिनिधी ए.जी. सातपुते, उपविभागीय कृषि अधिकारी पी.ए. गायके, तंत्र अधिकारी बी.बी. गिरी, जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक जी.एन. हुंडेकर, मोहीम अधिकारी विपिन कासलीवाल, सचिव माफदा सदाशिव पुंड जिल्हा अध्यक्ष कृषि निविष्ठा धारक, तालुका कृषि अधिकारी पी.आर. माने, खत कंपनी प्रतिनिधी, बियाणे कंपनी प्रतिनिधी, कामगार आयुक्त प्रतिनिधी पाठक, प्रकल्प संचालक आत्मा अनिल प्रमोद गवळी आदी उपस्थित होते.

 

एचटीबीटी बियाणाबाबत शेतकऱ्यांनी जागरूक असले पाहिजे. शेतकऱ्यांनी कुठल्याही अनधिकृत बियाण्याची पेरणी करता कामा नये. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी 1 जूननंतर पाण्याचा अंदाज घेवून कापूसाची पेरणी केली पाहिजे. सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासणी करुन 100 मि.मि. पेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतरच पेरणी केली करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

कृषी विभागातर्गत असलेल्या सर्व जिल्हास्तरीय  तालुकास्तरीय भरारी पथकामार्फत कृषि सेवा केंद्राची खरीप हंगामात वेळोवेळी तपासणी करुन शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

कृषि विकास अधिकारी यांनी जिल्हयातील रासायनिक खते  बियाणे यांच्या खरीप हंगाम दृष्टीने मागणी आवंटन  शिल्लक बाबतीत सादरीकरण केले. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकीचे सादरीकरण करून खरीप हंगामामधील विषयावर सविस्तर माहिती दिली.

0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...