Monday, September 4, 2017

नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक
पातळीवरच निराकरण करावे
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 4 :- नागरिकांना तक्रारींचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनामध्ये यावे लागू नये यासाठी त्यांचे तक्रारीचे स्थानिक पातळीवरच संबंधीत अधिकाऱ्यांने निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, कृषि उपसंचालक सौ. एम. आर. सोनवणे, जिल्हा अग्रणी बँकेचे दिलीप शिरपुरकर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. डोंगरे म्हणाले की, जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये नागरिकांना सातत्याने यावे लागू नये यासाठी तालुका किंवा स्थानिक पातळीवर त्यांचे तक्रारीचे निराकरण झाले पाहिजे. "आपले सरकार" वेबपोर्टल अधिकाऱ्यांनी नियमित पहावे. त्यावर दाखल तक्रारीचे अधिकाऱ्यांनी त्वरीत निराकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या लोकशाही दिनी दाखल नागरिकांचे अर्ज, निवेदनावर प्रत्यक्ष चर्चा करुन संबंधीत अधिकाऱ्यांना अनुषंगीक कार्यवाही करण्यासंबंधी निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.
000000


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या
पूर्वतयारीची आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 4 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 69 वा वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात आयोजित बैठकीत सर्व संबंधीत अधिकाऱ्यांकडून घेतला.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, तसेच क्रीडा, शिक्षण, पोलीस, मनपा, सार्वजनिक बांधकाम, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 69 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम 17 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथील हुतात्मा स्मारकाजवळ करण्यात येणार आहे. सर्व विभागांना नेमुन देण्यात आलेली कामे यशस्वीपणे व जबाबदारीने पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.

भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लॉस्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या.
000000  
सोयाबीन, कपाशीवरील
किड संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 4 :- जिल्हयात  सोयाबीन / कापुस पिकासाठी कि रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे.  शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे  किडीपासुन संरक्षणासाठी संदेश देण्यात येत आहे.
सोयाबीनवरील चक्री भुंगा, उंटअळी, पाने खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी स्पानोटोरोम 11.7 एस.सी. 9 मिली  किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 एस.सी. 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीवरील गुलाबी  बोंडअळीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. यासाठी फेरोमनट्रप्स (पेक्टीनो लुर्स) एकरी 5 लावावेत. कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी फलोनीकमाइड 50 डब्लु. जी  2 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
गणेश मंडळ, नागरीकांनी गोदावरी नदीसह
जलसाठ्यांच्या ठिकाणी दक्षता घ्यावी
नांदेड, दि. 4 :- श्री गणेश मुर्तीं विसर्जन दरम्‍यान जिल्ह्यातील गणेश मंडळ व नागरीकांनी गोदावरी नदीसह सर्व जलसाठ्यांच्‍या ठिकाणी सावधगिरीची दक्षता घ्‍यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  
      मंगळवार 5 सप्‍टेंबर 2017 रोजी नांदेड शहर व जिल्‍हयातील श्रीमुर्तींचे विसर्जन होत आहे. या दरम्‍यान सर्व गणेश मंडळ व सहभागी भाविकांनी विसर्जन स्‍थळी गोदावरी नदीसह इतर सर्व जलसाठ्यांच्‍या ठिकाणी कुठल्‍याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सावधगिरी बाळगावी.  
सध्‍या हवामान खात्‍याने राज्‍यासह मराठवाड्यात पर्जन्‍यमानाचा इशारा वर्तविला आहे. जिल्‍हयातील गोदावरी नदीची पाणी पातळी उंचावलेली आहे. जायकवाडी प्रकल्‍प 78  टक्‍के व शंकरराव चव्‍हाण विष्‍णुपुरी प्रकल्‍प जवळपास शंभर टक्‍के भरला आहे. पाण्‍याचा येवा सुरु झाल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा या प्रकल्‍पांद्वारे केंव्‍हाही विसर्जित करण्‍यात येऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व गणेश भक्‍तांनी श्री मुर्तीचे विसर्जन सुरक्षितपणे करावे. याबाबत भाविक, गणेश मंडळ व स्‍थानीक प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे.   
000000


गणेश मंडळ, नागरीकांनी गोदावरी नदीसह
जलसाठ्यांच्या ठिकाणी दक्षता घ्यावी
नांदेड, दि. 4 :- श्री गणेश मुर्तीं विसर्जन दरम्‍यान जिल्ह्यातील गणेश मंडळ व नागरीकांनी गोदावरी नदीसह सर्व जलसाठ्यांच्‍या ठिकाणी सावधगिरीची दक्षता घ्‍यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  
      मंगळवार 5 सप्‍टेंबर 2017 रोजी नांदेड शहर व जिल्‍हयातील श्रीमुर्तींचे विसर्जन होत आहे. या दरम्‍यान सर्व गणेश मंडळ व सहभागी भाविकांनी विसर्जन स्‍थळी गोदावरी नदीसह इतर सर्व जलसाठ्यांच्‍या ठिकाणी कुठल्‍याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सावधगिरी बाळगावी.  
सध्‍या हवामान खात्‍याने राज्‍यासह मराठवाड्यात पर्जन्‍यमानाचा इशारा वर्तविला आहे. जिल्‍हयातील गोदावरी नदीची पाणी पातळी उंचावलेली आहे. जायकवाडी प्रकल्‍प 78  टक्‍के व शंकरराव चव्‍हाण विष्‍णुपुरी प्रकल्‍प जवळपास शंभर टक्‍के भरला आहे. पाण्‍याचा येवा सुरु झाल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा या प्रकल्‍पांद्वारे केंव्‍हाही विसर्जित करण्‍यात येऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व गणेश भक्‍तांनी श्री मुर्तीचे विसर्जन सुरक्षितपणे करावे. याबाबत भाविक, गणेश मंडळ व स्‍थानीक प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे.   
000000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...