Thursday, June 2, 2022

 शेतकऱ्यांनी बियाणेखते व किटकनाशकांची

खरेदी करतांना काळजी घ्यावी

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे

 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- शेतकऱ्यांची खरीप हंगाम पेरणीचे कामे चालू असून खते बियाणे खरेदीची प्रक्रिया सुरु आहे. शेतकऱ्यांनी बियाणेखते व किटकनाशके खरेदी करतांना योग्य ती काळजी घेवून अधिकृत कृषि केंद्र परवाना धारकांकडुनच खरेदी करावीत. कृषि सेवा केंद्र धारकाकडुन बॅगवर नमुद केलेल्या एमआरपी किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारीकृषि अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्हा तक्रार निवारण कक्ष संपर्क क्रमांक 9673033085, 8856957686, 02462-284252 या क्रमांकावर संपर्क करावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

 

बाजारपेठेत डी.ए.पी खत मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेले आहे. सदयस्थितीत शेतकऱ्यांकडून एकाच कंपनीच्या किंवा ब्रँडच्या डी.ए.पी खताची मागणी वाढलेली आहे. परंतु बाजारात उपलब्ध होणाऱ्या सर्व कंपन्यांच्या डी.ए.पी खतामध्ये नत्र व स्फुरदचे प्रमाण सारख्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचा डी.ए.पी खताची खरेदी करावी. एकाच कंपनीच्या डी.ए.पी खताचा आग्रह धरु नये. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी करताना युरीया व सिंगल सुपर फॉस्पेट किंवा एनपीके 20:20:0:13 या खताचा वापर करावा. या खतामधुन सोयाबीन पिकासाठी गंधक युक्त खते मिळतात जे की सोयाबीन पिकांसाठी आवश्यक आहेत. तसेच बियाणेखते व किटकनाशके खरेदी करताना अधिकृत कृषि केंद्र परवाना धारकांकडुनच खरेदी करावी. खरेदीचे पक्के बिल पावती घ्यावी. पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठांचा संपुर्ण तपशिल असल्याची खात्री करावी. अनुदानीत रासायनिक खताची खरेदी करताना विक्रेत्यांकडुन इ-पॉस मशीनवरील बिल घ्यावे. खरेदी केल्यानंतर बॅगवर नमुद असलेली किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासुन घ्यावे. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग वेस्टनपिशवी व त्यातील थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावे. बियाण्याची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी. शेतकऱ्यानी घरचे तसेच बाजारातील खरेदी केलेले बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी . पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करुनच बियाण्याची पेरणी करावी. सलग तीन दिवस 100 मि.मि. पाऊस पडल्यावर व जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा असल्यावरच सोयाबीन बियाण्याची पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
0000

 बेरोजगारांना उद्योजकाचे स्वप्न साकारण्यासाठी

उद्यमिता यात्रा व प्रशिक्षणातून दिशा 

-   महापौर जयश्री पावडे

 

·       उद्यमिता यात्रेचे नांदेड मध्ये आगमन

·       सामाजिक न्याय भवन येथे प्रशिक्षण

·       गरजू व होतकरू लाभार्थ्यांनी घ्यावा लाभ

 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात अनेकांना रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले. अनेकांचे रोजगार बुडाले. त्यांना या परिस्थितीतून सावरण्यासाठी व नवा आत्मविश्वास देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ही उद्यमिता यात्रा महत्वाची असून या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रशिक्षणातून शहरी बेरोजगारांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास नांदेडच्या महापौर जयश्रीताई पावडे यांनी व्यक्त केला.

 

स्वयंरोजगार निर्मिती व उद्यमिता नवीन युवा-युवतींमध्ये रुजावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभाग, जिल्हा प्रशासन आणि युथएड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या उद्यमिता यात्रेचे आज नांदेड येथे आगमन झाले. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सविता बिरगे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची उपस्थिती होती.

 

राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ही उद्यमिता यात्रा जात असून 40 दिवसात 40 प्रशिक्षकांमार्फत 4 हजार  युवक-युवतींपर्यंत पोहोचून त्यांच्या व्यवसायाला आकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नांदेड येथे या यात्रेतील प्रशिक्षकांमार्फत 4 जुन 2022 पर्यंत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहील. इच्छुकांनी वेळेच्या आधी या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

उद्यमिता यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रशिक्षण शिबिरात व्यवसायाचे नियोजन, योजनांची माहिती, राज्य शासनाची ओळख, योजनांसाठी असलेल्या अटी, व्यवसायाचे पर्याय, डिजिटल साक्षरता, उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी, बीजभांडवल योजना, आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल.

 

इच्छुकांनी यात सहभाग घेण्यासाठी जिल्हा समन्वयक इरफान खान, शुभम शेवनकर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कैलासनगर नांदेड येथे दूरध्वनी क्रमांक 02462-251674 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

000000 






  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...