Tuesday, February 12, 2019


रेशीम शेतीसाठी महाराष्ट्राचा गौरव
नांदेड दि. 12 :- महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगीरीसाठी महाराष्ट्राला उ्‌द्योन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तसेच वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. केंद्रीय रेशीम मंडळाने दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात रेशीम संचलनालयाचा गौरव करण्यात आला. सदरचा पुरस्कार रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी स्वीकारला.
 राज्यात तसेच जिल्हयात नगदी पिक म्हणुन शेतक-याकडुन रेशीम शेतीला पसंती मिळत आहे. त्यामुळेच उदिष्टापेक्षा अधिक क्षेत्रावर तुती लागवड होत आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात सन 2019-20 साठी 400 एकरचा लक्षांक असतांना शेतक-यांनी 1 हजार 600 एकरची नोंदणी केली आहे, अशी माहिती नांदेडच्या जिल्हा रेशीम कार्यालयाने दिली आहे.
00000000

        ईपिलेप्सी (फेफरे/फिट्स) शिबीरास मिळाला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ईपिलेप्सी फाऊडेशन मुंबई व श्री. गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड यांच्या सयुंक्त विद्यमाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विठ्ठल मेकाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच.आर. गुंटूरकर, व वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. ऐ.पी. वाघमारे, यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१० फेब्रुवारी २०१९ घेण्यात आलेल्या  ईपिलेप्सी (फेफरे/फिट्स/आकडी) शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदरील शिबिरात तज्ञ न्युरोलॉंजिस्ट  डॉ. निर्मल सूर्या व त्यांची टीम यांच्यामार्फत एकूण ३८७ रुग्णांची मोफत  तपासणी करण्यात आली त्यापैकी ४१ रुग्णांची ईईजी चाचणी, २८ रुग्णांची  फिजीओथेरपी, २० रुग्णांची स्पीच थेरपी, व २८ रुग्णांचे समुपदेशन  करण्यात आले.
तसेच रुग्णांना या उपचार पद्धतीसह औषधांचा मोफत लाभ देण्यात आला. सदरील शिबिरास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.एन. हजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. के. साखरे, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. शिरसीकर, डॉ. लोकडे, डॉ. माने, डॉ कुलदीपक, डॉ. सोनकांबळे, यांनी  ईपिलेप्सी फाऊडेशन टीमच्या तज्ञ डॉक्टरांशी समन्वय साधून शिबिराचे नियोजन केले. व सदरील नियोजनाप्रमाणे प्रभारी अधीसेविका एस.एस.चरडे, परीसेविका एस. बी. राठोड, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम  समन्वयक अनिल कांबळे, अर्थसंकल्पीय व वित्त अधिकारी दत्ता सवादे, व समुपदेशक सुवर्णकार सदाशिव यांनी सदरील शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.                                                   


    वृत्त क्र. 417 अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर दोन बालविवाह थांबविले   ·     जिल्हाधिकाऱ्यांनी केले संपूर्ण यंत्रणेचे कौतुक नांदेड दि....