Saturday, February 15, 2020


पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत
बँक शाखास्तररावर मेळाव्याचे आयोजन
नांदेड, दि. 15:- जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या पी. एम. किसान योजनेद्वारे सर्व खातेदार शेतकऱ्यांना उत्पन्न सहाय (Imcome Support) येत आहे. तसेच किसान क्रेडीट योजनेंतर्गत बँकांमार्फत शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात आवश्यक त्या वेळी एकाच कर्जखात्यामधून सुलभ सोप्या कार्यपद्धतीद्वारे शेती अनुषंगीक गरजांसाठी भांडवली कर्ज पुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे किसान क्रेडीट कार्डद्वारे मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परंतू अद्यापही अनेक शेतकरी किसान क्रेडीट कार्ड वाटप झाल्यामुळे सुलभ कर्जाच्या सोयी सुविधा फायद्यापासून वंचित असल्याचे केंद्र शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी दि. 8 फेब्रुवारी, 2020 ते दि. 23 फेब्रुवारी, 2020 या पंधरवाड्यात मोहिम राबवून पी. एम. किसान योजनेत ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड अद्यापपर्यत वाटप झालेले नाही, अशा सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना नवीन किसान क्रेडीट कार्ड वाटप करावे अशा सूचना केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.
 ज्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड आहेत, त्यांना आवश्यकतेनुसार मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धनासाठी वाढीव कर्ज मर्यादा मंजूर करणे, अक्रियाशील कार्ड असल्यास क्रियाशील करणेसाठी प्रोत्साहीत करणे तसेच कार्ड धारक शेतकऱ्यांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यामध्ये सहभागासाठी प्रोत्साहीत करणे या बाबीचा देखील सदर मोहिमेत समावेश करण्यात आलेला आहे.
सदर मोहिमेतंर्गत पी. एम. किसान पोर्टलवरील माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात 420141 इतके शेतकरी पात्र आहेत. त्यामुळे जलद गतीने पात्र वंचित शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी बँक शाखास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी आदेशीत केलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये बँकांनी पात्र शेतकऱ्याद्वारे एक पानी सुलभ अर्जाद्वारे माहिती घेणे व संबंधित तलाठी / महसूल अधिकारी यांनी मेळाव्यात उपस्थित राहून शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे किसान क्रेडीट कार्ड वाटप व कर्जमागणी अर्जावर कार्यवाही करतांना शेतकऱ्यांना प्रक्रिया खर्च, कागदपत्राचा खर्च, तपासणी फी, इतर आकार तथा सेवाशुल्क बँकांनी माफ करणेबाबत देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यात दि. 17 फेब्रुवारी, 2020 व दि. 18 फेब्रुवारी, 2020या दोन दिवशी बँक शाखास्तरावर किसान क्रेडीट कार्ड वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड अद्यापपर्यत वाटप झालेले नाही, अशा सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी सदर मेळाव्यास उपस्थित राहणेबाबत आवाहन जिल्हाधिकारी,अरुण डोंगरे व जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.

00000

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी
प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

        मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019 ते 31 डिसेंबर, 2019 पर्यंतच्या कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्यासाठी अंतिम दिनांक 28 फेब्रुवारी, 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती
अ.क्र
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
1
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
5हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
2
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये
(मानचिन्ह वप्रशस्तीपत्र)
3
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
4
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
5
यशवंतराव चव्हाण पुरस्कार
शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
6
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
7
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
8
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क(राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
9
समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
10
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
11
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)


विभागीय पुरस्कार

12
दादासाहेब पोतनीस पुरस्कार,
नाशिक विभाग

5हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र,
या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)
13
अनंतराव भालेराव पुरस्कार,
औरंगाबाद आणि लातूर विभाग
5हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
14
आचार्य अत्रे पुरस्कार,
मुंबई विभाग
5हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
15

नानासाहेब परूळेकर पुरस्कार,
पुणे विभाग
5हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
16
शि.म.परांजपे पुरस्कार,
कोकण विभाग
5हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
17
ग.गो.जाधव पुरस्कार,
कोल्हापूर विभाग
5हजाररुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
18
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार,
अमरावती विभाग
5हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
19
ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,
नागपूर विभाग
5हजार रुपये
(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)
नियम व अटी
राज्य / विभागीय पुरस्कार
        पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरीत्यांची सामाजिक बांधिलकीशासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठीजनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठीइंग्रजीहिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजीहिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिध्द झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.
            पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            अर्जदाराने राज्य व विभागीय पताळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती)अमरावतीनाशिकपुणेकोल्हापूरकोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
मराठीहिंदीइंग्रजीउर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीयपातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.
            ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
            जे पत्रकार बृहन्मुंबईनवी मुंबई(कोकण)कोल्हापूरनागपूरअमरावतीनाशिकपुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिध्द झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
            गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 पाठविता येतील.
            शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधी विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.
            2019 या वर्षात दैनिक वृत्तपत्रातनियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्तखाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
            प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
विकास योजना संदर्भातील
समाज माध्यम (सोशल मीडिया) पुरस्कार
            ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषतशासकीय मजकुरासाठी आहेया दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात.  विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
            केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.
स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखन केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक योजनांची प्रसिध्दी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.
इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा
        इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
            प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता, उपंसचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला,  हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तचित्रकथा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून, पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यात येईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती  करण्यात येईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील. 
                              छायाचित्रकार पुरस्कार
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा, ही मराठीइंग्रजीहिंदीउर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहेयात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रेसमाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रेशासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पूरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.
            महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईलमात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावेफोटो प्रत नसावीपुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरीत्यांची सामाजिक बांधिलकीशासनाच्या विकासविषयक कामाच्या प्रसिध्दीसाठी जाणिव जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी यांचा विचार केला जाईलएकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास, तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाहीपुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीतज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिध्द झाले असेलत्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखलातारीख, नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावेअन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कारशासकीय गट (मावज)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोअीफोडे यांनी त्यांच्या लेखणीद्वारे समाजातील अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा यावर सातत्याने आसूड ओढले. आपल्या अग्रलेखांद्वारे प्रभावीरीत्या सामाजिक जाणीव जागृती करणारे संपादक म्हणून सुधाकर डोअीफोडे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. विविध विकासकामांची विशेषत: शासकीय विकासकामांची त्यांनी आपल्या अग्रलेखाद्वारे सकारात्मक प्रसिद्धी केली. विविध विकासकामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांनापत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल.
या स्पर्धेसाठी मराठीहिंदीइंग्रजीउर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे.
            प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.
            इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.
उपरोक्त सर्व स्पर्धेविषयीची माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेतजिल्हा माहिती अधिकारीउपसंचालकविभागीय माहिती कार्यालयसंचालकनागपूर-अमरावती व संचालकऔरंगाबादमहाराष्ट्र परिचय केंद्रपणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त शाखामाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई -32 येथे उपलब्धआहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
0000


  वृत्‍त क्र. 344   उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी शाळा ,   महाविद्यालयांनी उपाययोजना करण्यात : जिल्हाधिकारी नांदेड दि....