Tuesday, April 30, 2019

महाराष्ट्र दिन ध्वजवंदनाचा शानदार समारंभ उत्साहात संपन्न
संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न केलेल्या
हुतात्म्यांना वंदन करणारा दिवस
-         पालकमंत्री रामदास कदम
नांदेड, दि. 1 :- संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक हुतात्म्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांचे आपण ऋणी असून या हुतात्म्यांना वंदन करणारा हा दिवस आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर शानदार संचलन आणि उत्साहात समारंभ संपन्न झाला. या समारंभासाठी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलीस महानिरिक्षक प्रकाश मुत्याळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी आर. के. परदेशी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती. 
ध्वजवंदनानंतर आपल्या शुभेच्छापर संदेशात पालकमंत्री श्री कदम म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस असून 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली. भाषावाद, प्रांतरचना झाल्यानंतर गुजरात व महाराष्ट्र ही दोन राज्य वेगळी झाली. देशात जवळपास 29 राज्य अशी भाषावाद, प्रांतरचनेनुसार स्थापन झालीत. राज्याच्या सिमेवरील अनेक मराठी बांधव आजही संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी सातत्याने मागणी करत असून निश्चितपणे मराठी बांधवांना न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.  
आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. कामगारांना त्यांचे न्याय हक्क सन 1889 ला मिळाले आणि त्या दिवसापासून जवळपास 100 देशात हा कामगार दिवस साजरा केला जातो, असे सांगून त्यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
समारंभात सुरवातीला पालकमंत्री श्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तसेच राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री कदम यांनी संचलन पथकांचे निरीक्षणही केले. परेड कमांडर पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील आणि सेकंड परेड कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक शहादेव पोकळे यांच्या नेतृत्वात राज्य राखीव पोलीस बल हिंगोली, सशस्त्र पोलीस पथक नांदेड प्लाटूनसह, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, सशस्त्र पोलीस पथक साधना प्रशिक्षण विभाग नांदेड,  शहर वाहतूक शाखा, गृहरक्षक दलाच्या पुरूष व महिलांचे पथक, अग्नीशमन दल, पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, मार्क्स मॅन, वज्र वाहन, मिनी रेस्क्यू फायर टेंडर संचलनात सहभागी झाले.
पालकमंत्री रामदास कदम यांचे हस्ते अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात आदर्श तलाठी पुरस्कार मनोजकुमार जाधव (तलाठी सज्जा हातणी ता. लोहा), पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेतील पोलीस महासंचालक यांनी सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी, कर्मचारी नांदेड ग्रामीणचे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चॉदखान जब्बार खान, चालक दहशतवाद विरोधी पथकाचे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्रसिंघ हिरासिंघ, वाचक शाखेचे पोलीस हवलदार वामन कोकाटे, पोलीस स्टेशन अर्धापुरचे नईमखान मैनोद्यीन खान, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे मिर्झा ईब्राहिम बेग, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे नथू भोसले, दशहतवाद विरोधी पथकाचे महम्मद तय्यब म. अब्बास, काझी महम्मद अदिलोद्यीन, गुन्हे अन्वेषण विभागाचे संजय राखेवार, पो. स्टे. वजिराबादचे पोलीस नायक उमाकांत दामेकर, दहशतवाद विरोधी पथकाचे सतीश मुधोळकर, राज्य गुप्तवार्ताचे विलास शिंदे, नागरी हक्क संरक्षण विभागाचे महिला पोलीस नायक सविता केळगद्रे यांचा समावेश होता. त्यानंतर पालकमंत्री कदम यांनी उपस्थित स्वातंत्र्यसेनानी यांच्याशीही संवाद साधला, तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून, त्यांनाही शुभेच्छा दिल्या. शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
0000000

Monday, April 29, 2019


                        उष्मघातापासून बचाव करण्याचे उपाय

   लातूर,दि. 29 :-  तहान लागलेली नसली तरीसुध्‍दा जास्तीत जास्‍त पाणी पिण्‍यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत; बाहेर जातांना गॉगल्‍स, टोपी, छत्री/बुट व चपलाचा वापर करण्‍यात यावा, प्रवास करताना पाण्‍याची बाटली सोबत घ्‍यावी. उन्‍हात काम करीत असलेल्‍या व्‍यक्‍तींनी डोक्‍यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्‍यात यावा तसेच ओल्‍या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्‍यात यावा. शरीरातील पाण्‍याचा प्रमाण कमी होत असल्‍यास ओआरएस, घरी बनविण्‍यात आलेली लस्‍सी, तोरणी, लिंबू पाणी, ताख इत्‍यांदीचा नियमीत वापर करण्‍यात यावा.
           अशक्‍तपणा, स्‍थुलपणा, डोकेदुखी. सतत येणारा घाम इत्‍यादी उन्‍हाचा झटका बसण्‍याची चिन्‍हे ओळखावित व चक्‍कर येत असल्‍यास तात्‍काळ डॉक्‍टरांचा सल्‍ला घेण्‍यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्‍यात यावे. तसेच त्‍यांना पुरेसे पिण्‍याचे पाणी दयावे. घरे थंड ठेवण्‍यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्‍यात यावा. रात्री खिडक्‍या उघाडया ठेवण्‍यात याव्‍यात.  पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्‍यात यावा. तसेच थंड पाण्‍याने वेळोवेळी स्‍नान करण्‍यात यावे.  कामाच्‍या ठिकाणी जवळच थंड पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.
        सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्‍यासाठी कामगारांना सुचित करण्‍यात यावे.पहाटेच्‍या वेळी जास्‍तीत जास्‍त कामाचा निपटारा करण्‍यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्‍ये मध्‍ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्‍यात यावा. गरोदर, कामागार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्‍यात यावी. रस्‍ताच्‍या कडेला उन्‍हापासून संरक्षणाकरीता शेट उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्‍यात यावी.
काय करू नये –   
        लहान मुले किंवा पाळीव प्राण्‍यांना बंद असलेल्‍या व पार्क केलेल्‍या वाहनात ठेऊ नये.   दुपारी  १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. गडत, घटृ व जाड कपडे घालण्‍याचे टाळावे बाहेर तापमान अधिक असल्‍यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.
      उन्‍हाच्‍या कालावधीत स्‍वयंपाक करण्‍याचे टाळण्‍यात यावे. तसेच मोकळया हवेसाठी स्‍वयंपाक घराची दारे व खिडक्‍या उघडी ठेवण्‍यात यावी. आपल्‍या घराममध्‍ये, कामाच्‍या ठिकाणी अथवा इमारतीमधून बाहेर पडण्‍याचे मार्ग (Escape      Route) जाणून व समजून घ्‍या.आग लागल्‍यास’ लगेच अग्निशमन दलाला फोन (101) करा. जमिनीवर लोळून आग विझविण्‍याचा प्रयत्‍न करा.  आग लागलेल्‍या ठिकाणी असल्‍यास उभे न राहता गुडघ्‍याच्‍या मदतीने निकासा सरकावा.  तोंडावर ओला रुमाल/कपडा ठेवून धुरापासून दूर राहण्‍याचा प्रयत्‍न करा. 
        स्‍वयंपाक घरामध्‍ये विशेष काळजी घ्‍यावी. रात्री गॅस सिलेंडरचा रेग्‍युलेटर बंद करावा. दर सहा  महिन्‍यांनी गॅस नळी बदलावी, स्‍टोव्‍ह, मेणबत्‍ती इत्‍यादी ज्‍वालाग्रही वस्‍तू गॅसपासून दूर ठेवाव्‍यात. विजेच्‍या उपकरणांचा उपयोग करताना Amper ची तपासणी करावी व योग्‍य सॉकेटमध्‍ये वापर करावा. गोदामे, घरातील कोठीघर इत्‍यादी ठिकाणी कचरा तेलकट पदार्थ अथवा जळावू पदार्थ जमा करु नका, निकास मार्ग नेहमी अडथळे विरहित ठेवावे. आगीच्‍या वेळी शांत रहा, तसेच इतरांना शांत करा, आगीपासून विजेचे उपकरणे दूर ठेवा. छोटया आगी पासून संरक्षण करण्‍यासाठी पाणी व वाळूचे बकेट तयार करुन ठेवा.

****


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 29 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.  
दरवर्षी 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
00000


पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
नांदेड, दि. 29 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
मंगळवार 30 एप्रिल 2019 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने रात्री 9.30 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
बुधवार 1 मे 2019 रोजी सकाळी 8 वा. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- पोलीस कवायत मैदान पोलिस मुख्यालय वजिराबाद नांदेड. सकाळी 10 वा. नांदेड येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
000000


महाराष्ट्र दिनानिमित्त
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन
वजिराबाद पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभ
नांदेड, दि. 29 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त बुधवार 1 मे 2019 रोजी येथील वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नयेत. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000


उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे
बिगरसिंचन पाणी वापराबाबत आवाहन
नांदेड, दि. 29 :- उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात (इसापूर धरण)  सन 2018-19 साठी नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी टंचाई कालावधीसाठी नांदेड जिल्हा परिषदेतर्फे ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी 35 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. दरवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभागाकडून जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार बिगर सिंचन पाणी सोडण्यात येते.
आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याची पाणीपट्टी नांदेड जिल्हा परिषद कार्यालयाकडून पूर्णपणे भरणा केली जात नाही. जुन 2018 अखेर नांदेड जिल्हा परिषदेकडे 55 कोटी 82 लाख रुपये तसेच सन 2018-19 साठी आरक्षित पाण्याची 50 टक्के अग्रीम पाणीपट्टी  63 लाख रुपये अशी एकूण 56 कोटी 45 लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यापैकी 16 लाख रुपये इतका भरणा करण्यात आला आहे.
शासन निर्णय क्र. संकीर्ण-1002 / (208/02) / सिं.व्य.(धो) दिनांक 10 डिसेंबर 2003 अन्वये आरक्षित पाण्याची अग्रीम पाणीपट्टी जलसंपदा विभागाकडे भरणे आवश्यक असतानाही संबंधित कार्यालयाने थकीत व अग्रीम पाणीपट्टीची रक्कम भरणा न केल्यामुळे यापुढे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र 1 नांदेड या कार्यालयाकडून पाणीपुरवठा केला जाणार नाही. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0000000

Friday, April 26, 2019





मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 26 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 एप्रिल 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 एप्रिल 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000


विष्णुपूरी जलाशयाच्या दोन्ही तिरावरील
एक्सप्रेस फिडर बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
नांदेड, दि. 26 :- विष्णूपुरी जलाशयातील 30 दलघमी पाणी नांदेड वाघाळा महानगरपालिकेसाठी पिण्याकरीता आरक्षीत ठेवण्यात आला आहे. शहरात पाण्याची बिकट परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायद्यातील तरतुदी नुसार वीज पुरवठा खंडीत करता येऊ शकतो. त्यासाठी विष्णुपूरी जलाशयाच्या दोन्ही तिरावरील तात्काळ एक्सप्रेस फिडर बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अधीक्षक अभियंता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी नांदेड यांना निर्देश दिले आहे.
सन 2018-19 साठी पाणी आरक्षण समितीच्या बैठक घेण्यात आली. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असून जलाशयातील पाणीसाठा पुर्णपणे सुरक्षीत करण्याची गरज आहे. जलाशयातील अनाधिकृत बागायतदाराकडून उचलला जाणारा पाणीसाठी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने व आवश्यक सनियंत्रण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी चार, तहसीलदार लोहा, पालम व पुर्णा यांनी प्रत्येकी एक असे एकूण सात पथकांची निर्मिती केली. या पथकामध्ये विद्युत वितरण कंपनीच्या प्रतिनिधींची भुमिका महत्वाची आहे.
            विष्णुपूरी जलयाशयातील दोन्ही तिरावर शेतकऱ्यांनी बसविलेल्या पंपाची अश्वशक्ती अंदाजे 12 हजार एवढी असून या पंपाचा विज पुरवठा तात्काळ खंडीत केला तरच उपशावर प्रभावी नियंत्रण मिळविता येणार आहे. विष्णुपूरी प्रकल्पात 25 एप्रिल 2019 रोजी 8.57 दलघमी पाणीसाठा असून दररोजचा उपसा 0.57 दलघमी एवढा आहे. याप्रमाणे उपसा चालू राहिल्यास उपलब्ध पाणीसाठा 30 मे 2019 पर्यंत संपेल ही बाब लक्षात घेऊन नांदेड शहरात पाण्याची बिकट परिस्थिती उदभवणार नाही यासाठी  कायद्यातील तरतुदीच्या आधीन राहून वीज पुरवठा खंडीत करता येतो, असेही निर्देश दिले आहे.   
000000


नवीन वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक
नांदेड, दि.26 :- रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने नवी उत्पादीत होणाऱ्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट 1 एप्रिल 2019 पासून बसविण्याबाबत अधिसूचना निर्गमीत केली आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2019 नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे.
1 एप्रिल 2019 नंतर उत्पादी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट संबंधीत वाहन वितरकाद्वारे बसविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट वाहन वितरकाकडून बसवून घ्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
0000

Wednesday, April 24, 2019


    हरवलेल्या व्यक्तीचा शोध 
नांदेड दि. 24 :-  बळीरामपूर नांदेड येथील सुरेश विठ्ठलराव लांडगे (वय 65 वर्षे) हे 18 एप्रिल 2019 दुपारी 4 वा. त्यांचे घरुन काही न सांगता निघून गेले.  त्यांचा नातेवाईकाकडे शोध घेतला असता मिळाले नाही. त्यांचा रंग गोरा, उंची 5 फूट 5 इंच, निळ्या पट्ट्याचा फिकट निळा पॅन्ट, भाषा मराठी येते, सडपातळ बांधा आहे. या इसमाची माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन नांदेड (ग्रामीण) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
0000000

Tuesday, April 23, 2019


जागतिक ग्रंथ दिनानिमित्त
ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
नांदेड दि. 23 :- जागतिक ग्रंथ दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आज करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक जगदीश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी जागतिक ग्रंथ दिन हा  23 एप्रिला का साजरा करण्यात येतो, वाचनाचे व ग्रंथाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. निर्मल प्रकाशनचे निर्मलकुमार सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, प्रताप सुर्यवंशी, संजय पाटील, संजय कर्वे,  कोंडीबा गाडेवाड,  ग्रंथालय कार्यकर्ते, विद्यार्थी व वाचकवर्ग उपस्थित होते. उत्साहात नांदेड येथे जागतिक ग्रंथ दिन साजरा करण्यात आला. 
00000


स्ट्रॉग रुम परिसरात 144 कलम लागू 
नांदेड, दि. 23 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडच्या बाबानगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारतीच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.  
आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड लोकसभा मतदानाची प्रक्रिया गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी पार पाडली आहे. या मतदानाशी संबंधीत मतदान यंत्रे व अभिलेखे नांदेड शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारत येथील स्ट्रॉग रुममध्ये शिलबंद करुन सुरुक्षेच्यादृष्टिने संबंधीत सुरक्षा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. 
या स्ट्रॉग रुम परिसरात बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशामुळे काही अनूचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नांदेडच्या बाबानगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारती पासून 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणने ऐकून घेणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत. याठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, कर्मचारी यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तीस 19 एप्रिल 2019 ते 23 मे 2019 रोजी सकाळी 6 या कालावधीत प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यात 7 मे 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 23 एप्रिल ते 7 मे 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


वाळू उपसा करणारे दोन बोट स्फोटकाद्वारे नष्ट
नांदेड दि. 23 :- मुदखेड तालुक्यातील मौजे वासरी येथील गट नंबर 418 लगत गोदावरी नदीमध्ये दोन सक्शन पंप बोर्ड वारे वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्याने येथील उपस्थित असलेल्या नागरिकांना कोणाची बोट आहे याबाबत विचारणा केली तेंव्हा माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांचे मार्गदर्शनाखाली दोन्ही सक्शन पंप बोट जिलेटिन स्फोटकाद्वारे नष्ट करण्यात आल्या. या कार्यवाहीत मुखेडचे तहसीलदार दिनेश दामले, नायब तहसीलदार  संजय सोलंकर, श्री भोसीकर, पोलीस निरीक्षक श्री. मांजरे, सपोनि नितीन खंडागळे, मंडळाधिकारी बी. डी. कुराडे, अनिल धुळगुंडे, तलाठी दत्ता कटारे, प्रवीण होडे, संदीप केंद्रे आणि कोतवाल श्रीधर पाटील सुलतान पठाण, राजू गुंतले सहभागी होते.   
00000


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 23 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.  
दरवर्षी 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
00000

Saturday, April 20, 2019

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील
स्ट्रॉग रुम परिसरात 144 कलम लागू  
नांदेड, दि. 20 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडच्या बाबानगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारतीच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.  
आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड लोकसभा मतदानाची प्रक्रिया गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी पार पाडली आहे. या मतदानाशी संबंधीत मतदान यंत्रे व अभिलेखे नांदेड शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारत येथील स्ट्रॉग रुममध्ये शिलबंद करुन सुरुक्षेच्यादृष्टिने संबंधीत सुरक्षा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे.  
या स्ट्रॉग रुम परिसरात बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशामुळे काही अनूचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नांदेडच्या बाबानगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारती पासून 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणने ऐकून घेणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत. याठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, कर्मचारी यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तीस 19 एप्रिल 2019 ते 23 मे 2019 रोजी सकाळी 6 या कालावधीत प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000

Friday, April 19, 2019


नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेत
एकूण 65.15 टक्‍के मतदान
नांदेड, दि. 18 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण 65.15 टक्के मतदान झाले.          
       16- नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 17 हजार 830 मतदार होते. यात पुरुष मतदार संख्‍या 8 लाख 91 हजार 105 तर महिला मतदार संख्‍या  8 लाख 26 हजार 662 तसेच इतर 63 मतदारांचा समावेश होता. त्‍यापैकी 11 लाख 19 हजार 116 मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला आहे. यात पुरुष मतदार संख्‍या 5 लाख 94 हजार 614, स्‍त्री मतदार संख्‍या 5 लाख 24 हजार 490, इतर 12 असे एकूण  11 लाख 19 हजार 116 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे.
           
जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी मतदानाचा टक्‍का वाढविण्‍यासाठी मतदारसंघात विविध उपक्रम राबविले होते. तसेच व्‍होट फॉर वॉक पदयात्रा काढून मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी त्‍यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी निर्भयपणे मतदान केले. प्रशासनाने केलेल्‍या मतदान जनजागृतीमुळे पाच टक्‍क्‍यांनी मतदानाचा टक्‍का वाढला आहे. 
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 2 हजार 28 मतदान केंद्रातून मतदान प्रकिया पार पडली. 16- नांदेड लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानिहाय माहिती पुढील प्रमाणे.
85-भोकर-  स्त्री मतदार संख्‍या 91 हजार 389, पुरुष मतदार संख्‍या  1 लाख 4 हजार 419 , इतर एक असे एकूण झालेले मतदान 1 लाख 95 हजार 809 (टक्‍केवारी 70.71),
86-नांदेड उत्‍तर-  स्त्री मतदार संख्‍या 90 हजार 268 , पुरुष मतदार संख्‍या 1 लाख 2 हजार 997 इतर 10  असे एकूण झालेले मतदान 1 लाख 93 हजार 275 (टक्‍केवारी 62.73),
87-नांदेड दक्षिण-  स्त्री मतदार संख्‍या 83 हजार 181, पुरुष मतदार संख्‍या 97 हजार 284 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 80 हजार 465 (टक्‍केवारी 64.17),
89-नायगाव खै.-  स्त्री मतदार संख्‍या 92 हजार 882, पुरुष मतदार संख्‍या 1 लाख 4 हजार 539 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 97 हजार 421 (टक्‍केवारी 69.79),
90-देगलूर-  स्त्री मतदार संख्‍या 86 हजार 733, पुरुष मतदार संख्‍या 96 हजार 793 असे एकूण झालेले मतदान 1 लाख 83 हजार 526 (टक्‍केवारी 63.31),
91-मुखेड-  स्त्री मतदार संख्‍या 80 हजार 37 , पुरुष मतदार संख्‍या 88 हजार 582, इतर एक असे एकूण झालेले मतदान 1 लाख 68 हजार 620 (टक्‍केवारी 60.48) एवढे आहे.
0000

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...