Tuesday, June 26, 2018

कृषि विभागाच्यावतीने
1 जुलै रोजी कृषि दिनाचे आयोजन
        नांदेड , दि. 26:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त कृषि विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कै . यशवंतराव चव्हाण सभागृह , जिल्हा परिषद, नांदेड येथे दिनांक 1 जुलै, 2018 रोजी सकाळी 11- 00 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            तरी या कार्यक्रमास शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
****
सामाजिक न्यायासाठी प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव असावी
-- प्रा.किरण सगर
नांदेड दि. २६:- दिनदुबळ्या व वंचित घटकांच्या सामाजिक न्यायासाठी प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावीअसे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस व मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर यांनी केले आहे. 
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवनात आयोजित राजर्षी शाहू महाराज यांच्या 144 व्या जयंती निमित्त व्याख्यान प्रसंगी प्रा. सगर बोलत होते. अध्यक्षस्थानी समाज कल्याण उपायुक्त शेख जलील हे होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवारबापू दासरी रामचंद्र देठे यांची उपस्थिती होती.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी समतेचा पाया रचला असे सांगून प्रा.किरण सगर पुढे म्हणाले कीराजर्षी शाहू महाराज कृतीशील विचारवंत असल्याने त्यांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षण जाहीर केलेत्यामुळे त्यांच्यावर टिकाही झाली. जातीनिहाय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढलीघोड्याच्या तबेल्यात जसे सशक्त घोडे दुर्बल घोड्याना चारा खाऊ देत नाहीत तशीच स्थिती बहुजन समाजातील उपेक्षित घटकांची झाली होती हे चित्र राजर्षी शाहूनी बदलून दाखवले होतेया उपेक्षित समाजासाठी त्यांनी उन्नतीच्या योजना राबवल्या. 
राजर्षी शाहू महाराजांच्या राजवटीत शेतकरी सुखी होतातो आत्महत्या करत नव्हतासमाजाचे हक्क व कर्तव्याप्रती योग्य समुपदेशन झाले पाहिजेसद्सदविवेक पध्दतीने न्याय मिळवता आला पाहिजे असेही ते म्हणाले.
अध्यक्षपदावरून बोलतांना समाज कल्याण उपायुक्त शेख जलील म्हणाले की,  शासनाकडून आवश्यक त्या योजना राबवून सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जात असून राजर्षी शाहू महारांजाचे विचार अंमलात आणले जात आहेत 
समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी प्रास्ताविकात राजर्षी शाहू महाराजांवर प्रकाश टाकून व्याखानाचा विषय "राजर्षी शाहू महाराज  यांचा शैक्षणिक व समतावादी दृष्टिकोण " हा असल्याचे सांगितले.
जयंती निमित्त आयोजित निबंध आणि वक्तत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली.
प्रारंभी दीप प्रज्वलित करून महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराजडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन बापू दासरी यांनी केलेव्याखानास शहरातील नागरिकविद्यार्थीसमतादूत उपस्थित होते. 
****
मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथे आयोजन
नांदेड, दि. 26:- मा. मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांच्यावतीने व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायाधीश तथा अध्यक्ष प्रमुख जिल्हा श्री. एस. पी. कुलकर्णी यांचे आदेशान्वये दि. 26 जुन 2018 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अध्यक्षास्थानी न्या.श्री. डी. टी. वसावे हे होते.
न्या.श्री. डी. टी. वसावे अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की, प्रत्येकाने आपले प्रकरण मध्यस्थी व तडजोड करणे महत्वाचे आहे, कारण कोर्टामध्ये प्रकरणांसाठी वेळ व पैसा जात असतो. त्यासाठी मध्यस्थीने वाद मोकळया मनाने मिटविण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर आपले आयष्य भांडणात जाईल.
जो माणुस माफ करतो, तोच मोठा होतो. मध्यस्थीसाठी जे प्रकरण तडजोड करण्यासाठी येतात त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत करण्याचे आश्वासनही दिले. तसेच पक्षकारानी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या व त्यांच्या शंकाचे निरसन न्या. वसावे यांनी केले.
दिनांक 14 जुलै 2018 रोजी होणऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त तडजोड पात्र प्रकरणे
मध्यस्थीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच लोकअदालतीच्या पॅनलवर काम करीत असतांना नियमांचे, वेळेचे पालन करणे आवश्यक आहे. पॅनल सदस्यांनी वेळेवर हजर राहुन लोकअदालत यशस्वी करण्यात सहकार्य करणे आवश्यक आहे.
यावेळी न्यायाधीश श्री. डी. टी. वसावे यांनी सहयोग योजनेबाबत उपस्थित विधीज्ञांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण केले. तसेच विधी सेवा प्राधिकरणतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरजू घटकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपल्या हातून समाजसेवा करण्याची ही एक संधी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी विधीज्ञ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे कर्मचारी उपस्थित होते.
****


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...