Wednesday, July 5, 2023

 यशकथा                                                                                                       दि. 5 जुलै2023

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून नव उद्योजकाची भरारी !

राज्याच्या विकासाला चालना मिळवी यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी युवकांना व्यापक संधी निर्माण करुन देण्यासाठी भर देण्यात येत आहे. राज्यातील सुक्षिशित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा व उद्योग उभारणीतून ते स्वावलंबी व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने मागील एक वर्षाच्या कालावधीत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य शासनाच्यावतीने सर्वाना रोजगार यामध्ये राज्यात 75 हजार पदांसाठी भरती वेगाने सुरु आहे. तसेच शासन सेवेत पदभरतीसाठी टीसीएसआयबीपीएसमार्फत परीक्षामुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून 12 हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूरएक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना कामआता असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळकरोडो कामगारांना दिलासा असे अनेक विविध कल्याणकारी निर्णय घेवून सर्वांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होवून ते आत्मनिर्भर व्हावेत. त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प शासनाच्या आर्थिक सहाय्यातून उभारणीसाठी  आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाची  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना लाभदायक आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात 12 हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर करण्यात आले आहेत. याच योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील कलावतीनगर वाडी (बु) नांदेड येथे शुभ्रा इंडस्ट्रीज लाकडी घाणा खाद्यतेल उत्पादन उद्योग विस्तारीकरण करण्यात आला आहे. फार्म्स ओशन या नावाने खाद्य तेलाचे ब्रॅड तयार करण्याचा व्यवसाय संदीप प्रल्हाद बेहरे यांनी उभारला आहे. रिफाइंड तेलाचे आरोग्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दुष्पपरिणाम होत असल्याने त्यांना लाकडी घाणा तेल तयार करण्याची कल्पना सुचली. त्यांच्या प्रकल्पाची किंमत 10 लाख 54 हजार एवढी आहे. या व्यवसायातून ते वर्षाला 30 लाख रुपयांची उलाढाल करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी 1 पुरुष व तीन महिलांना अर्धवेळ काम देवून रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

 

सुरूवातीला लातूरसातारा व कोल्हापूर येथील लाकडी घाण्याचे तेल उत्पादकासाठी प्रसिध्द असलेल्या उद्योजकांसोबत त्यांनी समन्वय साधला. यात त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी रचिता बेहरे यांचा कृतिशील सहभाग आहे.  संदीप बेहरे यांनी प्रथमत: स्वखर्चाने कोयम्बतूर येथून 2 लाख 90 हजार रुपयांना एक लाकडी घाणा मशिन विकत घेवून हा व्यवसाय पारंपारिक पध्दतीने सुरु केला. लाकडी घाण्यातून ते खोबरेशेंगदानाकरडीसुर्यफूलजवसमोहरीबदामतिळाचे असे विविध प्रकारचे तेल काढतात. हा उद्योग उभारताना सुरवातीला त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी सर्वेक्षण करुन संबंधित तंत्रज्ञानाबाबत जाणून घेतले. तेलाचा घाणा मशिन कोणते घ्यावेकुठून घ्यावे याबाबत माहिती मिळविली. कच्चा माल दर्जेदार उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांना भेटी घेतल्या. शेतकऱ्यांचा कच्चा माल जागेवरच खरेदी केला. व्यापाऱ्याची मध्यस्थी न ठेवता थेट शेतकऱ्यांपासून कच्चा माल खरेदी केल्यामूळे शेतकऱ्यांला फायदा झाला. उद्योग उभारताना जागेच्या उपलब्धतेसाठी आलेल्या अडचणीवर मात करून बेहरे यांनी आपला हा उद्योग उभा केला.     

 

संदीप बेहरे यांनी अगोदरच व्यवसायात स्वत: जवळचे पैसे गुंतविलेले असल्यामुळेत्यांना व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक चणचण भासत होती. यात त्यांनी हार मानली नाही. यातून मार्ग काढत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड कार्यालयास त्यांनी संपर्क साधला. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया, गुरुद्वारा शाखानांदेड यांच्याकडून व्यवसाय विस्तारीकरणासाठी कर्ज घेतले. या रकमेतून चार यंत्र खरेदी केले. त्यामुळे त्यांचा आर्थिक प्रश्न सुटला. या रकमेतून त्यांनी व्यवसायासाठी कच्चा घाणाकरडी दाळ मशिनऑईल फिल्टरबॉयलर इ. यंत्र खरेदी केले.

 

शुभ्रा इंडस्ट्रिज मार्फत त्यांनी फार्म्स ओश नावाचा बँन्ड त्यांनी विकसित केला. नांदेड व नांदेड बाहेरील अनेक कुटूंब या लाकडी घाण्याच्या तेलास प्राधान्य देत आहेत. तेल निर्मिती कशी करताप्रमाण काय असते याबाबत  संदीप बेहरे सांगतात कीघाण्यातून तेल काढण्यासाठी 15 किलो शेंगदाने 110 रुपये प्रमाणे विकत घेतले तर त्यापासून जवळपास 7 किलो शेंगदाना तेल तयार होते. शेंगदाना तेल ते 290 रुपयेप्रमाणे विक्री करतो. तेलबियांपासून तेल बनविल्यानंतर उर्वरित राहिलेल्या पदार्थापासून ते जनावरांना खाण्यासाठी खल्ली (पेंड) तयार करतात. ही जनावरांना खाण्यासाठी पेंड 40  रुपये किलोप्रमाणे विक्री करतात. त्यापासूनही त्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. या सर्व उत्पादनापासून मासिक उलाढाल अंदाजे 1 लाख 25 हजार रुपये आहे असे ते सांगतात. या व्यवसायाच्या माध्यमातून इतर 4 जणांना रोजगार देत आहोत याबाबत बेहरे यांनी समाधान व्यक्त केले.  जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून लघुउद्योजकांना चालना देवून लोकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून बळ दिले जात आहे. संदीप प्रल्हाद बेहरे यांनी उद्योग उभारणीसाठी यशाचे श्रेय हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेस देवून महाराष्ट्र शासनाचे त्यांनी आभारही मानले आहेत.

 

अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालयनांदेड

00000  






  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...