Friday, March 31, 2017

कृपया सोबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्धी दयावी ही विनंती.

वृ.वि.5142                                                                              9 चैत्र, 1938 (रात्रौ.8.20)                                                                                                          दि. 30 मार्च 2017

मी मुख्यमंत्री बोलतोय...कार्यक्रमाच्या माध्यमातून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार जनतेशी संवाद

मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मी मुख्यमंत्री बोलतोय...या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. मुख्यमंत्र्याशी थेट संवाद साधणारा संकल्प शाश्वत शेतीचाया विषयावरील हा पहिला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम दूरचित्रवाणी वाहिनीवर नंतर प्रसारित करण्यात येईल.
            या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारता येणार आहेत. जनतेने विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री उत्तर देतील. यासाठी विचारण्यात येणारे प्रश्न विषयाशी निगडीत धोरणात्मक बाबींवर असावेत, वैयक्तिक नसावेत, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यासाठी दि. 3 एप्रिल, 2017 पर्यंत av.dgipr@maharashtra.gov.in या ई-मेलवर किंवा 8291528952 या मोबाईल क्रमांक तसेच व्हॉट्स अॅपवर पाठविता येतील.
०००००


आदिवासी शेतकऱ्यांनी पिकांचे
बिजोत्पादन घेऊन उत्पन्न वाढवावे
- कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू
जावरलातील आदिवासी शेतकऱ्यांना पीक संरक्षण उपकरणाचे वाटप

           नांदेड दि. 31 :- आदिवासी शेतक-यांनी आर्थिक फायदा व उत्पन्नातील सातत्य टिकविण्यासाठी विविध पीकांचे बिजोत्पादन करावे , असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केले. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये आदिवासी शेतकरी प्रशिक्षण व उपकर वाटप कार्यक्रम आज आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू बोलत होते.
       
नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामार्फत आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून मौजे जावरला ता. किनवट जि. नांदेड येथील आदिवासी शेतक-यांना पीक संरक्षण उपकरणांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य केदार साळुंके उपस्थित होते.
            कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू म्हणाले की, आदिवासी गावातील परिस्थिती जाणुन घेऊन त्यानुसार पीक रचनेबाबत विद्यापीठातील सर्व प्रमुख पीकांचे शास्त्रज्ञ आदिवासी गावांमध्ये येऊन मार्गदर्शन करतील. सध्या कांदा सारख्या पीकाच्या बिजोत्पादनातुन शेतक-यांना चांगला फायदा मिळत आहे. आदिवासी शेतक-यांनी नैसर्गीक संसाधन अधारीत कृषि व्यवसाय सुरू करावे. यामध्ये रेशीमपालन, शेळीपालन, कुक्कुट्पालन ईत्यादी कृषिपूरक जोडधंदे करण्यास आदिवासी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा.  
जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले की, कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक-यांनी स्वत:चा विकास साधावा व आपले गाव कृषि विकासाच्या दृष्टीकोनातून आदर्श गाव बनवावे. शासनाच्या विविध योजना एकात्मिकपणे राबवून गावाचा विकास साधावा, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. गावातील संसाधनांचा वापर करून उत्पादीत मधासारख्या पदार्थांचे विपणन अधिक नियोजन पूर्वक करावे असेही ते म्हणाले. कृषि विद्यापीठाद्वारे आदिवासी गावामध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत श्री. काकाणी यांनी समाधान व्यक्त केल.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतलेले नांदेड जिल्ह्यातील जावरला (ता. किनवट) या गावातील कृषि उत्पादन वाढविण्यासाठी विद्यापीठाने विवीध योजनांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिके, निवीष्ठा वाटप, प्रशिक्षण आदी कार्यक्रमाची माहिती संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी दिली. गावातील विंधन विहीरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी विद्यापीठाने विकसीत केल्याप्रमाणे विहीर पून:र्भरण करावे. त्यासाठी विद्यापीठाच्या वतीने विहीर पून:र्भरणाचे प्रात्यक्षिक जावरला गावामध्ये विद्यापीठाद्वारे घेण्यात येतील. त्याचप्रमाणे येत्या हंगामामध्ये ज्वारी, सोयाबीन, कोरडवाहू शेती ईत्यादी बाबतचे तंत्रज्ञान शेतक-यांच्या शेतावर प्रात्यक्षिकाद्वारे प्रदर्शीत करण्यात येईल. त्याप्रमाणे लागवड तंत्र शेतक-यांनी अवगत करावे असेही डॉ. वासकर म्हणाले.
कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आदिवासी गावामध्ये जावून प्रात्यक्षिके देण्याच्या आणि पीक संरक्षण उपकरणांच्या वाटपाबाबत विद्यापीठ कार्यकारी समिती सदस्य श्री. साळुंके यांनी कौतूक केले.
            कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. के. एस. बेग यांनी प्रास्ताविक केले. चालू हंगामामध्ये जावरला गावामध्ये कपूस पिकाच्यप्रात्यक्षिकाबाबतची माहिती त्यांनी दिली. यावेळी कापूस लागवडीबाबत विविध विषयांवर संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. खिजर बेग, प्रा. अरविंद पांडागळे, डॉ. शिवाजी तेलंग, डॉ. पवन ढोके, प्रा. अरुण गायकवाड यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. 
तालुका कृषि अधिकारी श्री कायंदे, श्रीमती ऐलवाड व आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री पटवे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रा. पांडागळे यांनी सूत्रसंचलन केले तसेच शेवटी आभार मानले.

0000000
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांच्या
फिरत्या वाहनाद्वारे प्रसिद्धी उपक्रमाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते वाहने मार्गस्थ

नांदेड दि. 31 :- विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देणासाठी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीच्या उपक्रमाचे आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, तसेच या वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. ही दोन वाहने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून वाहने उद्घाटनानंतर जिल्हा दौऱ्यासाठी मार्गस्थ करण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, समतादूत प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्पाधिकारी मुंजाजी कांबळे, समतादूत अविनाश जोंधळे, विनोद पाचंगे, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर आदींची उपस्थिती होती.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती या फिरत्या वाहनाद्वारे जिल्ह्यातील गावात पोहचविण्याचा प्रयत्न आहेत. वाहनांवरील श्राव्य ( ऑडियो ) ध्वनीफितीद्वारे योजनांची माहिती असणाऱ्या जींगल्स ऐकविण्यात येणार आहेत. गावा-गावात पोहचून  विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचीत जातींसाठीच्या विद्यार्थी, तरूण तसेच महिला, शेतकरी आदी घटकांसाठीच्या शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, विविध प्रकारची प्रशिक्षणे, महिला सक्षमीकरण, लाभार्थी व समूह योजनांची माहिती पोहचविण्याचा उद्देश आहे. या वाहनांना जिल्ह्यातील आठ-आठ तालुक्यांची विभागणी करून देण्यात आली असून, त्यासाठीचा मार्गही निश्चित करण्यात आला आहे. या उपक्रमात समतादूतही सहभागी होणार आहेत.
          
  जिल्हा माहिती अधिकारी गवळी यांनी फिरत्या वाहनाद्वारे प्रचार-प्रसिद्धीबाबतची संकल्पना विशद केली. जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते फित कापून वाहनांचे उद्घाटन करण्यात आले व वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. याप्रसंगी किसान बिरादरीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव पाटील- इजळीकर, गुंडेगावचे दासराव हंबर्डे आदींचीही उपस्थिती होती.

0000000

वृत्त क्र. 283

  वृत्त क्र.   283 निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ; खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड, दि. 28 : लोकसभा निवडणूक ही अतिशय गं...