Monday, December 10, 2018


अल्पसंख्यांकासाठी शासनाच्या चांगल्या योजना  
- हाजी अराफत शेख
नांदेड, दि. 10 :-  शासन अल्पसंख्याकांसाठी चांगल्या योजना राबवित आहे. योजनांची दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन आढावा घेण्याच्या सूचनाही  राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केली.  
जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या केंद्राच्या पंधरा कलमी कार्यक्रमाच्या अमलबजावणीचा आढावा  येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक संजय जाधव आदि विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
उर्दू घराबाबत तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून उर्दू घराचे काम कार्यान्वित करण्यात येईल.  त्यांनी शहरातील उर्दू घराला प्रत्यक्ष भेट देखील दिली. त्यापूर्वी त्यांनी शीख समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सचखंड गुरुद्वाराला प्रत्यक्ष भेट दिली.
देशभरातून येणाऱ्या शिख भाविकांसाठी  रेल्वेने रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक एकवर उतरण्याची आणि पुन्हा परत जाणाऱ्या प्रवाशांना ही फलाट क्रमांक एक वरच रेल्वेत सोडण्याची व्यवस्था करून द्यावी. यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करु असेही त्यांनी गुरुद्वाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.पी सिंग यांना सांगितले. गुरुद्वाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. पी. सिंग यांनी हाजी अराफत शेख यांच्यासमोर आपल्या काही मागण्या सादर केल्या. त्यामध्ये शीख धर्माचे धर्मगुरू गुरुगोबिंद सिंघजी तीनशे वर्षापूर्वी ज्या मालटेकडी परिसरात थांबले होते. त्या परिसरातील गुरुद्वाराच्या जागेला अधिकची गायरान जमिनीची जागा शासनाने उपलब्ध करून द्यावे, ही मागणीही त्यांच्याकडे केली.  कौशल्य विकास योजनेअंतर्गत होणाऱ्या प्रशिक्षण मेळाव्यासाठी प्रचार, प्रसार व्हावा. विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत पाठपुरावा करावा. घरकुल योजना पारदर्शक पद्धतीने राबवा, असेही त्यांनी सांगितले.  
0000


मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील  
                                          - डॉ. भागवत कराड

नांदेड, दि. 10 :-  मराठवाड्यातील सिंचन, शैक्षणिक, आरोग्य तसेच इतर क्षेत्रातील अनुशेष दूर करणार असून अधिकाधिक निधी आणून सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचविणार असून मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. मराठवाडा विकास कामांना गती देण्यासाठी पाणी प्रश्न आणि इतर अनुशेष निर्मुलन व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनेबाबतच्या बैठकीत ते बोलत होते.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार हेमत पाटील, महापौर शिलाताई भवरे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अभिवन गोयल, मनपा आयुक्त लहुराज माळी, म.वि.म.औरंगाबाद सहसंचालक रविंद्र जगताप, तज्ज्ञ सदस्य कृष्णा लव्हेकर, मुकूंद कुलकर्णी, डॉ. अशोक बेलखोडे, भैरवनाथ ठोंबरे, डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रा. बालाजी कोंपलवार, हर्षद शहा आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            तालुकानिहाय पडलेल्या पर्जन्यमानाचा तालुकानिहाय अहवाल, जलाशयातील पाणीसाठा,  जलाशयातील पाणी आरक्षण मागणी, ग्रामीण पाणी टंचाई आराखडा , ग्रामीण व नागरी भागातील पाणीटंचाई, दुष्काळ निवारण कामांचा आढावा, चारा टंचाई, खरीप 2018-2019 हंगामातील दुष्काळी तालुक्यांची माहिती, मग्रारोहयो कामांचा आढावा आदि विविध विभागांचाही यावेळी आढावा मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड  यांनी घेतला.
000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...