Thursday, November 16, 2017

जिल्हास्तरीय महसुल क्रीडा स्पर्धेचे
जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
            नांदेड दि. 16 :- विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा या 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत जालना येथे होणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेचे 16 व 17 नोव्हेंबर रोजी यशवंत महाविद्यालय येथील क्रीडांगणावर आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.  
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव, पिपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, महेश वडदकर, श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी सचीन खल्लाळ, श्रीमती दिपाली मोतियेळे, निवृत्ती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही स्पर्धा शंभर मीटर धावणे या खेळाने सुरुवात करण्यात आली. क्रीकेट, हॉलीबॉल, बॅडमिंटन, थ्रो बॉल तसेच खो-खो आदी सामने आयोजित करण्यात आले. विभागीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करण्यासाठी 18 ते 29 नोव्हेंबर या दरम्यान सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. कारभारी यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
000000


जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते लातूर येथे  
"जलयुक्त शिवार अभियान" पुरस्काराचे आज वितरण
            नांदेड दि. 16 :- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2015-16 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गावांचा सन्मान मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कै. दणकोजीराव (दादा) देशमुख सभागृह लातुर येथे शुक्रवार 17 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3 ते 5 यावेळेत विभागस्तरावरील तसेच जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
            विभागस्तरावर कंधार तालुका अव्वल आला असुन या तालुक्यास 10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवुन सन्मान केला जाणार आहे. याचबरोबर भोकर तालुक्यातील मौ. बेंबर या गावाने विभागामध्ये प्रथम पुरस्कार पटकावला असुन या गावाला साडेसात लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाची उत्कृष्ट प्रचार प्रसिध्दी केल्या बद्दल पत्रकारांसाठी दिला जाणारा विभाग स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार माधव संताजी अटकोरे यांना दिला जाणार आहे.
            विभागाबरोबरच जिल्हास्तरावरील पुरस्कारपण याठिकाणी दिले जाणार आहेत. नांदेड जिल्हयामध्ये कंधार व लोहा तालुक्याला प्रथम व द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दिला जाणार आहे. लोहा तालुक्याला रुपये 3 लाख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत केले जाणार आहे. नांदेड जिल्हयातील ज्या गावांनी जल व मृद संधारणाचे उत्कृष्ट काम केले आहे अशा 5 गावांनापण जिल्हास्तरीय पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये भोकर तालुक्यातील मौ. बेंबर (प्रथम), कंधार तालुक्यातील मौ. उस्माननगर (द्वितीय, 75 हजार) व मौ. गऊळ (तृतीय, 50 हजार), नायगाव तालुक्यातील मौ. मांजरम (चौथा, 30 हजार) व देगलुर तालुक्यातील मौ. नागराळ (पाचवा, 20 हजार) या गावांची पुरस्कारासाठी निवडी झाली आहे. जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट अधिकाऱ्याचा पुरस्कार डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
000000


प्रामाणिक पत्रकारिता काळाची गरज
- जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम
नांदेड , दि. 16 :- देशाच्या विकासात माध्यमांचा मोठा सहभाग लक्षात घेता प्रामाणिक पत्रकारिता करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी केले.
भारतीय प्रेस परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात "माध्यमासमोरील आव्हाने" या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. कदम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी हे होते.  
डॉ. कदम पुढे म्हणाले की, माध्यमांनी कर्तव्य पार पाडत असतांना समाजात चांगले बदल घडविण्याची पत्रकारिता केली पाहिजे. पत्रकारितेत विश्वासार्हता असावी. माध्यमांची गती वाढली असून संदर्भासाठी इंटरनेटवरुन माहितीची पडताळणी करुन घेण्याची जबाबदारी वाढली आहे. घटनेसंबंधी लिखाण करतांना नेमकी माहिती घेऊन तसेच सत्यता पाहून लिखाण केले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.   
जेष्ठ पत्रकार श्री. जोशी म्हणाले, पत्रकारिता ही स्वत:पुर्ती मर्यादीत न राहता भारतीय घटनेशी बांधील तसेच समाजाला न्याय देणारी पत्रकारीता असावी. स्वातंत्र्यापुर्वीपेक्षा स्वातंत्र्यानंतरची आजची पत्रकारीता वेगाने पुढे जात आहे, हे लक्षात घेऊन पत्रकारांनी लिखाण करावे, असेही ते म्हणाले.  
प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजनकरुन तसेच पुष्पहार अर्पणकरुन अभिवादन करण्यात आले.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वसाधारण सहायक के. आर. आरेवार यांनी केले तर शेवटी दुरमुद्रक चालक विवेक डावरे यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे, संपादक तथा माजी आमदार गंगाधर पटणे, संपादक जी. के. मांजरमकर, रमेश कंधारकर, दै. सकाळचे पत्रकार शिवचरण वावळे, दै. लोकपत्रचे प्रशांत गवळे, पत्रकार स्वप्नील भालेराव, विलास वाघमारे, राजकुमार शितळे, सुनिल गोदणे, छायाचित्रकार पुरुषोत्तम जोशी, सेवानिवृत्त माहिती सहाय्यक रमाकांत ताटीकोंडलवार, लिपीक टंकलेखक अलका पाटील, प्रविण बिदरकर, बालनरस्या अंगली आदींची उपस्थिती होती.  

00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...