Tuesday, December 18, 2018




 
बटालियन जलद कृती दल 99, (केंद्रीय राखीव पोलीस) यांचे जिल्हास्तरीय कवायत
 
 
नांदेड, दि. 18:- 99 बटालियन जलद कृती दल, (केंद्रिय राखिव पोलीस दल) हकीमपेठ, सिकंद्राबाद ( तेलंगाना राज्‍य) यांची एक तुकडी दिनांक 13 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2018 या एक आठवड्याच्‍या कालावधी दरम्‍यान नांदेड जिल्ह्याच्या (परिचय आणि माहीती सराव) फॅमिलियराईझेशन एक्‍सरसाइजसाठी नांदेड जिल्ह्याच्या भेटीवर आहे.

केंद्रिय गृहमंत्रालयाच्‍या आदेशानुसार नांदेड जिल्‍हयात दिनांक 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2018 या एक आठवडयाच्‍या कालावधी दरम्‍यान उक्‍त तुकडी नांदेड शहर आणि जिल्‍हयातील संवेदनशिल ठिकाणांना आणि या क्षेत्रांच्‍या भौगालिक मांडणीला भेट देतील तथा त्‍या ठिकाणांची भौगोलिक माहीती प्रत्‍यक्ष भेट देवुन उपलब्‍ध करुन घेतील. अंतर्गत कायदा आणि सुव्‍यवस्‍था भंग पडल्‍यास अश्‍या असंतोषाच्‍या वेळी  प्रशासनाला जर जलद कृती दल  (केंद्रिय राखिव पोलीस दल) यांच्‍या आणीबाणी तैनातीसाठी आवश्‍यकता भासल्‍यास केंद्रीय गृह मंत्रालयाच्‍या प्रमाणित कृती आराखडयांनुसार याची पध्‍दत विषद करतील.

      सदर पथकाचे नेतृत्‍व सहायक कमांडेट संतोष कुमार, डि.वाय.एस.पी. 99 बटालियन जलद कृती दल, (केंद्रिय राखिव पोलीस) हकीमपेठ, सिकंद्राबाद ( तेलंगाना राज्‍य) हे करीत असुन या एक प्‍लाटुनमध्‍ये पुरुष आणि महीला कर्मचारी तथा अधिकारी असे 60 सदस्‍य आहेत. या दरम्‍यान त्‍यांनी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे,   निवासी उपजिल्‍हाधिकारी संतोष वेणीकर आणि नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी यांना सदिच्‍छा भेट देवून त्‍यांच्‍याव्‍दारे करण्‍यात येत असलेल्‍या कवायतीसंबंधी विस्‍तृत प्रबंधनाची माहीती दिली. असे  जिल्‍हा प्रशासनाच्‍या जिल्‍हाधिकारी केंद्रीय नियंत्रण कक्षाने प्रसिध्‍दीपत्रकाव्‍दारे कळविले आहे.

 

0000

नॅशनल वॉटर अवॉर्ड 2018 साठी
                                                 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 18:-   जलसंसाधन, नदी विकास गंगा संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली मार्फत नॅशनल वॉटर अवॉर्ड 2018 देण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. सदर पुरस्कारामध्ये उत्कृष्ट राज्य, जिल्हा, नगरपालिका/पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, दुरचित्रवाहीनी वरील कार्यक्रम, वर्तमानपत्र (इंग्रजी) प्रस्ताव असे एकूण वेगवेगळ्या 13 घटकांसाठी हे वेगवेगळे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वसाधारणपणे प्रशस्तीपत्र प्रथम पुरस्कार रक्कम रु. 2.00 लाख, व्दीतीय पुरस्कार रक्कम रु. 1.50 लाख तृतीय पुरस्कार रक्कम रु. 1.00 लाख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करणेची अंतिम मुदत दि. 31 डिसेंबर, 2018 आहे. सदर पुरस्काराबाबत अधिक माहीती cgwb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार विहित नमुन्यात प्रस्ताव जलसंसाधन, नदी विकास गंगा संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांना सादर करावेत.

0000

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड, दि. 18:-   जिल्ह्यात बुधवार, दि 19 डिसेंबर, 2018 रोजी पासून शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी  माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. 
          आगामी काळातील सण,उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात दि. 19 डिसेंबर, 2018 ते दि. 31 डिसेंबर, 2018 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे.  त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याचा जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी , विवाह, अंत्ययात्रा,धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू राहणार नाही.

0000

विधान परिषद विरोधी पक्षनेता
                                                    धनंजय मुंडे यांचा दौरा
 
नांदेड, दि. 18:-  महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील.
            बुधवार, दि. 19 डिसेंबर, 2018 रोजी सकाळी 8-00 वा. पंढरी निवासस्थान परळी येथून नांदेडकडे प्रयाण. 10-00 वाजता श्री गुरु गोबिंद सिंगजी विमानतळ , नांदेड येथे आगमन व राखीव. 10-50 वा. श्री गुरु गोबिंद सिंगजी विमानतळ, नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000  

अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस साजरा
 
नांदेड, दि. 18:- दि. 18 डिसेंबर हा दिवस अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस म्‍हणून जगभरात साजरा केला जातो. याअनुषंगाने आज जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली बचत भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस साजरा करण्‍यात आला.
            या कार्यक्रमासाठी जिल्‍हा सत्र न्‍यायालय, नांदेड अॅड.श्री विजय गोणारकर, मुव्‍हमेंट फॅार पिस अॅड जस्‍टीस  जिल्‍हाध्‍यक्ष फेराज खान गाझी हे व्‍याख्‍याते म्‍हणून लाभले.
            कार्यक्रमाच्‍या सुरवातीस श्री.अनीस शेख, सदस्‍य, जिल्‍हा अल्‍पसंख्‍यांक कल्‍याण समिती, नांदेड यांचे स्‍वागत जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने उपजिल्‍हधिकारी तथा अल्‍पसंख्‍यांक विकास अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले. तसेच व्‍यख्‍यातांचे स्‍वागत जिल्‍हा नियोजन अधिकारी  एस.बी.कोलगणे यांनी केले.
      अल्‍पसंख्‍यांकरिता जिल्‍हास्‍तरावर संबंधित विभागांकडून राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची माहिती जिल्‍हा नियोजन अधिकारी यांनी पी.पी.टीच्‍या माध्‍यमातून उपस्थितांना दिली.
            व्‍याख्‍याता म्‍हणून बोलताना अॅड.गोणारकर यांनी अल्‍पसंख्‍याच्‍या शैक्षणिक सा?माजिक सुरक्षेच्‍या हक्‍काबाबत  संविधानात नमूद असलेल्‍या कलमांची माहिती देवून अल्‍पसंख्‍यांच्‍या प्रगतीशिवाय देशाच्या प्रगतीचे मोजमाप करणे अशक्‍य असल्‍याचे नमूद करून अल्‍पसंख्‍याक समुदायातील लोकांकरिता असलेल्‍या संविधानातील बाबी सामान्‍य माणसापर्यंत पोहचविण्‍याचे आवाहन केले.
            प्रमूख वक्‍ते म्‍हणून लाभलेले श्री.फेरोज खान काझी यांनी अल्‍पसंख्‍यांकांना समाजाच्‍या मूख्‍य प्रवाहात आणण्‍यासाठी त्‍यांना आवश्‍यक ते शिक्षण देवून रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करून देण्‍यासंदर्भात मत व्‍यक्‍त केले. तसेच अल्‍पसंख्‍याक समाजातील महिलाकरिता विशेष योजना शासनस्‍तरावर राबविल्‍यास त्‍याचा फायदा महिलांच्‍या जीवनामानाचा दर्जा उंचाविण्‍यासाठी होईल असे नमूद करून अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थ्‍यांकरिता शासनामार्फत देण्‍यात येणा-या शिष्‍यवृत्‍यांचा समाजातील विद्यार्थ्‍यांना उपयोग होत असल्‍याचे सांगितले. तसेच जिल्‍हास्‍तरावर अल्‍पसंख्‍यांकाकरिता राबविण्‍यात येणा-या योजनांसाठी शासनस्‍तरावरून एक अधिकारी नियुक्‍त करण्‍याची गरज असल्‍याचे बोलले.
            जिल्‍हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुरेश थोरात  बोलतांना म्‍हणाले की, जो पर्यंत तळागाळातील वंचित समुदाय स्‍वतः शासकीय योजनांच्‍या संदर्भात जागरूक राहणार नाही तो पर्यंत त्‍या समुदायाचा विकास होणार नाही. यावेळी उपस्थित एम.पी.जे या सामाजिक संस्‍थेनी सुध्‍दा शासनाच्‍या सर्व योजनांसंदर्भात अल्‍पसंख्‍यांक समुदायास त्‍यांचे मार्फत जनजागृती करण्‍याचे अवाहन केले.
            या कार्यक्रमास कार्यालयीन कर्मचारी, अल्‍पसंख्‍यांक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या शेवटी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने सहा.जिल्‍हा नियोजन अधिकारी, मानव विकास जी.बी.सुपेकर यांनी उपस्थितांचे आभार माणून कार्यक्रम संपल्‍याचे जाहीर केले.
 
0000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...