Wednesday, September 28, 2022

 सामोपचाराने मिटविलेल्या वादात केव्हाही अधिक सकारात्मकता

- प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर
नांदेड (जिमाका) दि. 28 :- नांदेड जिल्हा न्यायालय अंतर्गत मध्यस्थी केंद्र व लोक न्यायालयाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली निघावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सामोपचाराने मिटविलेल्या वादात केव्हाही अधिक पावित्र्य असते. यात एकमेकांची मने, दुरावलेली मने, वेळेचा अपव्यय, होणारा खर्च या साऱ्या बाबीपासून सुटका होवू शकते. ज्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, जी प्रकरणे सामोपचाराने सुटू शकतात, अशा सर्व संबंधित व्यक्तींनी यासाठी खुल्या मनाने पुढे झाले पाहिजे, असे आवाहन प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी केले.
मोटार अपघात नुकसान भरपाई अर्ज निर्मला विरुध्द कपील व तर्थद जिल्हा न्यायालय नांदेड या न्यायालयातील मोटार अपघात नुकसान भरपाई अर्ज शिवकुमार विरुध्द कपील हे दोन्ही प्रकरण नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील मध्यस्थ केंद्राकडे मध्यस्थीसाठी ठेवण्यात आले होते. यावर अर्जदार निर्मलाबाई व इतर आणि क्रुजरची विमा कंपनी इफको टोकिओ इन्सुरन्स यांच्यात तडजोड होऊन सदरील प्रकरण रुपये 37 लाख 50 हजार मध्ये मिटविण्यात आले. याचबरोबर शिवकुमार पांचाळ यांचे प्रकरण रुपये 80 हजारामध्ये तडजोड होऊन मिटविण्यात आले. या प्रकरणात मध्यस्थी केंद्रामार्फत तडजोड होण्यासाठी प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर यांच्यामार्फत व मार्गदर्शनाखाली मध्यस्थी करण्यात आली. यावेळी त्यांनी आपले मनोगत व लोकन्यायालय, मध्यस्थ केंद्र याचे महत्व विशद करून सांगितले.
न्यायालयीन खटल्यात दिवाणी, फौजदारी, एन.आय.ॲक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणाचा व विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दखल पूर्व प्रकरणे न्यायालयात येतात. यात लागणारा वेळ व इतर बाबी लक्षात घेता संबंधितांनी लोकन्यायालयाचा व मध्यस्थी केंद्राचा अधिक लाभ घ्यावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव डी. एम. जज यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन खटल्यांना सौहार्दपूर्ण पर्याय हा सुसंवाद, समेट व लवाद यात दडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
0000


 नांदेड जिल्ह्यात 160 गायवर्ग पशुधन लम्पी बाधित   

 

लाख 87 हजार 858 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 160 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. बुधवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन आज रोजी 38 हजार 675 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण लाख 87 हजार 858 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छतापशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 42 गावे लम्पी बाधित आहेत. या 42 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 19 हजार 957 एवढे आहे. यातील 160 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या किमी परिघातील गावांची संख्या 270 एवढी आहे. एकुण गावे 312 झाली आहेत. या बाधित 42 गावांच्या किमी परिघातील 312 गावातील (बाधित 42 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 87 हजार 980 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 10 एवढी झाली आहे. उपलब्ध लस मात्रा लाख 78 हजार एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छतागोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.

 

000000

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 3 ऑक्टोंबर 2022 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित केला आहे. 


यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 


या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 


न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 3.70 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 28 :- जिल्ह्यात बुधवार 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 3.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 1041.70 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात बुधवार 28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 8 (1029.80), बिलोली-1.60 (1042.10), मुखेड- 2.20 (948.90), कंधार-0.10 (900.50), लोहा-0.40 (908.90), हदगाव-1.10 (925.10), भोकर-00 (1155.50), देगलूर-6.10 (864.80), किनवट-5.90 (1262.90), मुदखेड- 00 (1175.40), हिमायतनगर-00 (1282.70), माहूर- 00 (1117.60), धर्माबाद- 13.10 (1313.30), उमरी- 1.60(1206.10), अर्धापूर- 9.70 (951.90), नायगाव-7.90(916.70) मिलीमीटर आहे.

0000


  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...