Thursday, September 28, 2023

 गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ

  • नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात आज 28 सप्टेंबर 2023 रोजी 100 टक्के पाणीसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी चालू आहे. त्यामुळे बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे आज सायं. 5 वा. बंधाऱ्याचे एक द्वार उघडून 471 क्युमेक्स (16 हजार 632 cuscc) या वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पाण्याचा वेग सुध्दा वाढणार आहे. आज गणेश विसर्जन असल्यामुळे नदीकाठावरील घाटावर विसर्जनासाठी मोठया प्रमाणात गणेश भक्त आलेले असतात. कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होवू नये यासाठी सतर्कता बाळगावी तसेच विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचेजीविताचीपशुधनाचीवीटभट्टी साहित्य इतर कोणत्याही मालमत्तेची हानी होणार नाही यांची काळजी नागरिकांनी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000 

 प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत

पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम अदा करावी

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2023-24 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन ॲडव्हर्सिटी)  अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लागू केली आहे. या अधिसूचनेनुसार सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहित मुदतीत नुकसान भरपाईची आगाउ रक्कम अदा करण्याचे निर्देश त्यांनी विमा कंपनीस दिले आहेत.

 नांदेड जिल्ह्यामध्ये माहे जुलै मध्ये अतिवृष्टीमुळे व माहे ऑगस्ट मध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीनकापूसतूर व ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. अशा वेळी जिल्ह्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानेच्या 25 टक्के आगाउ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनास तात्काळ अधिसूचना काढणे बाबत सूचना होत्या. त्यानुसार जिल्ह्यामध्ये समितीमार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. तरी पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीमध्ये प्रतिकूल परिस्थिती उदा. पूरपावसातील खंडदुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 50 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.

समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याने सोयाबीनकापूसतूर व खरीप ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना लागू केली आहेअशी माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले  आहे.  

00000

आयुष्यमान भव कार्यक्रमांतर्गत 

जिल्‍ह्यातील नागरीकांनी आयुष्‍यमान कार्ड काढून घ्‍यावे


  –  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्‍ह्यात केंद्र शासनाची आयुष्‍यमान भव मोहिम 13 सप्‍टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्‍ये राबविली जात आहे. गावपातळीपर्यंत गुणवत्‍ता पुर्वक आरोग्‍य सेवा सुविधा पुरविणे व जनजागृती करणे हे या मोहिमेचे उदिष्‍ट आहे. या अंतर्गत सर्व आरोग्‍य संस्‍थांमधून आरोग्‍य मेळावे व आरोग्‍य सभांचे आयोजन करण्‍यात येत आहे.  ग्रामीण भागात 377 उपकेंद्र व 69 प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍तरावरील या आरोग्‍य मेळाव्‍यातून नागरीकांनी सहभागी होऊन आरोग्‍य विषयक सोई सुविधांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत व जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. 

जिल्ह्यात 1 ऑक्‍टोंबर 2023 रोजी *स्‍वच्‍छता ही सेवा* अंतर्गत सर्व आरोग्‍य संस्‍था व परिसर स्‍वच्‍छ व सुंदर केला जाणार आहे. 2 ऑक्‍टोंबर 2023 रोजी गाव पातळीवर ग्रामसभेमध्‍ये आयुष्‍यमान सभा आयोजित केली जाणार आहे. 100 टक्‍के आयुष्‍यमान कार्ड, आभा आयडी (ABHA ID) नोंदणी करुन आयुष्‍यमान कार्डचे (गोल्‍डन कार्ड ) वितरीत करण्‍यात येणार आहेत. तसेच असंसर्गजन्‍य आजारांची माहिती जसे की, हाय रिस्क फॅक्‍टर, योग्‍य आहार विहार, मानसिक आरोग्‍य, सिकलसेल आजार, लसीकरण, क्षयरोग, कुष्‍ठरोग इ. संसर्गजन्‍य रोग, टेली कन्‍सलटेशन, इ. माहिती ग्रामस्‍थांना देण्‍यात येणार आहे. 

दर शनिवारी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्‍य केंद्रात आयुष्‍यमान हेल्‍थ मेलाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. निरोगी आरोग्‍य तरुणाईचे,  वैभव महाराष्‍ट्राचे ही योजना राबविली जाणार आहे. आयुष्‍यमान भव मोहिमे अंतर्गत आरोग्‍यवर्धीनी उपकेंद्र व प्राथमिक आरोग्‍य केंद्र येथे मेळाव्‍यात 18 वर्षावरील सर्व नागरीकांचे आरोग्‍य तपासणी, बीपी, शुगर, वजन उंची तपासणी करण्‍यात येणार आहे. प्रामुख्‍याने स्‍त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, नाक, कान व घसा, त्‍वचारोग, मानसिक आजार, दंत शल्‍य चिकित्‍सक तपासणी इत्‍यादी तपासण्‍या करण्‍यात येणार असून गंभीर रुग्‍णांना संदर्भित करुन औषधोपचार व शस्‍त्रक्रिया मोफत करण्‍यात येणार आहेत. आजपर्यत जिल्‍ह्यात 85 हजार 263 जणांची तपासणी करण्‍यात आली असून, 9 हजार 54 रुग्‍णांना आयुष योजने अंतर्गत उपचार करण्‍यात येत आहेत. 

आयुष्‍यमान भारत योजने अंतर्गत सर्व नागरीकांना आरोग्‍य संरक्षणाचे कवच प्राप्‍त होणार असून आरोग्‍य संरक्षण प्रती कुटुंब प्रतीवर्ष 5 लाख रुपये आहे. या योजने अंतर्गत अंगीकृत रुग्‍णालंयामधून उपचाराचा लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान आयुष्यमान भारत विमा योजना यामध्ये प्रत्येकाला स्वतःचे 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा योजना असलेले आयुष्यमान कार्ड स्वतःचे स्वतः काढता येण्याची सोय आयुष्यमान ॲपद्वारे उपलब्ध झाली आहे. हे ॲप प्ले स्टोअर मधून डाऊनलोड केल्यानंतर त्यात बेनिफिशरी हा पर्याय वापरून त्यामध्ये आधार लिंक मोबाईल नंबर टाकून पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्‍हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. 

0000

 मतदार जागृतीसाठी

अभिव्यक्ती मताची स्पर्धेस 5 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अभिव्यक्ती मताची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अभिव्यक्ती मताची या विषयांतर्गत जाहिरात निर्मितीभित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नलिजम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये (Art collegs) येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेचा कालावधी ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2023 होता. आता या स्पर्धेस सहभाग घेण्यासाठी 5 ऑक्टोंबर 2023 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

तीनही स्पर्धांचे विषय आणि नियमावल्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये भाग घ्यावाअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

 

या स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत. युवा वर्ग आणि मताधिकारीमताधिकार लोकशाहीचा स्तंभएका मताचे सामर्थ्यसक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका / जबाबदारीलोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि मताधिकारतीनही स्पर्धाचे माध्यम मराठीहिंदी आणि इंग्रजी आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. जाहिरात निर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक लाख रुपयेदुसरे पारितोषिक 75 हजारतिसरे पारितोषिक 50 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक 10 हजार रुपयांची आहेत. भित्तिपत्रका (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 50 हजार रुपयेदुसरे पारितोषिक 25 हजार रुपये आणि तिसरे पारितोषिक 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी हजार रुपयांची आहेत. घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार रुपयेदुसरे पारितोषिक 15 हजार रुपयेतिसरे पारितोषिक 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी हजार रुपयांची आहेतअसे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...