Wednesday, December 16, 2020

 

कौडगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातील

अवैध रेती उपसा करणाऱ्या 13 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल

गुन्हेगारामध्ये 12 व्यक्ती उत्तरप्रदेशातील   

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- उमरी तालुक्यातील कौडगाव शिवारात बाबुराव येताळे यांच्या शेतामध्ये गोदावरी नदी पात्राच्या काठावर काही व्यक्ती तराफे घेऊन गोदावरी पात्रातील अवैध रेती उपसा करण्यासाठी जमा झाले होते. याची माहिती मिळाल्यानुसार भोकर व धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. या छाप्यामध्ये 12 व्यक्तींना थर्माकोलच्या दोन तराफ्यासह पकडण्यात आले. या आरोपी विरुद्ध कलम महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 क्र. 48 सह कलम 188, 379, 511, 34 भादवी प्रमाणे कायदेशीर फिर्यादीनुसार उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.   

 

कौडगा येथील माधव येताळे, उत्तर प्रदेश राज्यातील केदार वर्मा, अजितसहा फागुसाहा, शंभु महतो, सुनिल बबन प्रसाद, केदार सतन यादव, रविंद्र कुमार रघुवर यादव, सुंदर कुमार यादव, जोगिंद्र यादव, रुदल श्यामलालसाह, विश्वनाथ कन्हैया साह, जीतन राजावशी साह, राजेश कन्हैया गौर यांना ताब्यात घेऊन पोलीस पुढील तपास करीत आहेत. यात माधव येताळे या व्यक्तीचा पोलीस तपास करीत आहेत.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध कठोर पाऊले उचले असून प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांना दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोळेगाव येथील मंडळ अधिकारी मयुर शेळके यांच्या पथकात अशोक गंगासागरे, संतोष मंगरुळे, प्रकाश तायवाडे, हनमंत गायकवाड, मलुकमळे यांनी छापा टाकून करवाई केली.

*****

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे

मानवी हक्क दिवस साजरा 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्रीराम आर. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त चर्चासत्र व परिसंवाद, कायदेविषयक शिबिराचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड येथे गुरुवारी 10 डिसेंबरला करण्यात आले होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश-1  एस. एस. खरात व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेद्र रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

मानवी हक्क दिनाबाबत जिल्हा न्यायाधीश-1 एस. एस. खरात यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल कल्याण कक्ष नांदेड, स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेड, नेहरु युवा केंद्र नांदेड, एसबीसी सेंटर फॉर सोशल बिहेवियर चेंज कम्यूनिकेशन चाईल्ड लाईन 1098 नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र, परिसंवाद कार्यक्रम व कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिकदृष्ट्या जनजागृतीपर विविध विषयांचे पोस्टर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात लावण्यात आले होते. बाल-विवाह सारख्या समाज विघातक प्रथावर जनजागृतीपर कविता सादर केल्या.  

यावेळी सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे सामाजिक शास्त्र संकुलचे प्रा. उषा सरोदे, नेहरु युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, जिल्हा बाल संरक्षण आधिकारी श्रीमती विद्या आळने, चाईल्ड लाईनचे डॉ. पी. डी. जोशी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी कल्पना राठोड, रिटेनर लॉयरचे अॅड. नय्युमखान पठाण, अॅड.  सुभाष बंडे, अॅड. आर. जी. कोनोटे, विधीज्ञ उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. उषा सरोदे यांनी तर सुत्रसंचालन अॅड. नय्युमखान पठाण केले. शेवटी आभार श्रीमती राठोड यांनी मानले.     

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...