Wednesday, June 21, 2023

 कागदावरच्या योजनांना गरिबांपर्यंत पोहोचवून

त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी
- कृषि मंत्री अब्दुल सत्तार
▪️जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची व्यापक बैठक
▪️शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत कृषि मंत्री सत्तार यांनी केल्या सूचना
▪️नांदेड येथे हा अभिनव उपक्रम ऐतिहासिक ठरेल
नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्यातील गोर-गरीब सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळावा, त्यांना विकासाची कास धरता यावी यासाठी शासन धरपडत असते. या योजना प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पूर्णत्व येत नाही. कागदावरच्या योजना प्रत्यक्ष गावकुसातील बांधावर राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. येत्या 25 जून रोजी नांदेड येथील अबचलनगर येथे होणाऱ्या या भव्य उपक्रमाबाबत आज त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
ज्यांच्यासाठी शासन योजना आखते, त्याला स्वरूप देते, त्यासाठी आर्थिक तरतूद करते त्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थीत पोहोचवणे ही त्या-त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी हाच या उपक्रमापाठिमागचा उद्देश असल्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. शासन आपल्या दारीच्या महामेळाव्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजनांचा विश्वास घेता येईल. प्रत्येक विभागाचे स्टॉल्स याठिकाणी असल्याने नागरिकांना ज्या योजना हव्या असतील त्या योजनांबाबतची परिपूर्ण माहिती 25 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात त्या-त्या विभाग प्रमुखांकडून, अधिकाऱ्यांकडून करून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यांच्या प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही, त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित विभागाने आपआपले जबाबदार कर्मचारी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. माझी मुलगी माझा अभिमान हा उपक्रम केवळ दारावर पाटी लावून चालणार नाही तर या पाठीमागचा जो मुळ उद्देश आहे तो जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुलीचे नाव केवळ पाटीपुरते नाही तर प्रॉपर्टी व शेतीच्या सातबारावर घेण्याचा हा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत त्यांनी प्रत्येक विभागनिहाय अधिकाऱ्यांकडून योजनांचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील 103 महसूल मंडळात आजवर शासन आपल्या दारीबाबत शिबीरे झाली आहेत. तालुका पातळीवरील अधिकारी या शिबरांमधून नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख टिमवर्कने काम करत असून या योजनेत सहभागी होणारा प्रत्येक लाभार्थी, नागरीक हा महत्त्वाचा व्यक्ती असेल असे समजून नियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
00000

छायाचित्र : सदा वडजे






शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागत नगरमालेगाव रोड नांदेड येथे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिकउच्च माध्यमिकपदवी व पदवीत्तर या पुनर/नुतन प्रवेशासाठी 15 जुलै 2023 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावीअसे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे. 

 

अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे गुणपत्रकसन 2022-23 या वर्षात उत्पन्न प्रमाणपत्र तहसिलदार कार्यालयाने अदा केलेले व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्ररहिवासी प्रमाणपत्राचे सत्यप्रती साक्षांकीत करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 27 जून ते 15 जुलै 2023 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील. या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील .विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रीया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल. या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 जुलै असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे. 

0000

 

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी बस संवर्गातील वाहनाची तपासणी सुरु

 योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी

बस संवर्गातील वाहनाची तपासणी सुरु

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी सर्व बसेसच्या वेग नियंत्रकाच्या (स्पीड गर्व्हनर) वेगाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी येणाऱ्या बसचालकांनी त्यांचे वाहन काळी 9 वाजेपर्यत असर्जन बायपास रोड येथील मैदानाजवळ रस्त्याच्या एकाबाजूला वाहन वेग मर्यादा तपासणीसाठी सादर करावे. सकाळी 10 वाजेनंतर येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार नाही यांची सर्व बस संवर्गातील चालक/मालक यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन   

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी 15 जुलै 2023 पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज करावेत. उशिराने आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे आवाहन जिल्हा कार्यालयाने केले आहे.  

  

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा ज्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील अशा मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्येष्ठता व गुण क्रमांकानुसार 3 ते 5 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.  

 

अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, उत्पनाचा दाखला, छायाचित्र दोन, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्रासह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज आदी कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर (दूरध्वनी क्रमांक 02462-220088) मो. नं. 9309151060 नांदेड येथे मुदतीत प्रत्यक्ष अर्ज करता येतील, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टि.आर. शिंदे यांनी केले आहे.

0000000

 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

                                                अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बी.एस.दासरी यांनी केले आहे.

 

अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, तसेच पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणीपत्र, अर्जदाराचा जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र, कंपन्यांनी केलेल्या मागणी व पुरवठा आदेश प्रती व प्रकल्पासाठी एकुण प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के बँकेने कर्ज मंजुर केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 डिसेंबर, 2020  16 मार्च 2020, 26 मार्च, 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

0000

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

                                               अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बी.एस.दासरी यांनी केले आहे.

 

अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, तसेच पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणीपत्र, अर्जदाराचा जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र, कंपन्यांनी केलेल्या मागणी व पुरवठा आदेश प्रती व प्रकल्पासाठी एकुण प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के बँकेने कर्ज मंजुर केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 डिसेंबर, 2020  16 मार्च 2020, 26 मार्च, 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

00000

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत रविवारी महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत रविवारी

महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रविवार दिनांक 25 जून रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा नांदेड यांच्यावतीने अबचलनगर मैदान, नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयाच्यावतीने महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थिताचे उच्च रक्तदाब, मधुमेह, मौखिक आरोग्य तपासणी, स्त्री रोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी व प्रेरणा प्रकल्पातर्गंत शेतकरी आत्महत्या संदर्भात समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच थायरॉईड व एचबी 1सी यासारख्या आवश्यक त्या रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी जन सामान्यांचे आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून योजनेतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड हे मोफत तयार करुन देण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत हे कार्ड तयार करुन घेण्यासाठी लाभार्थ्यांनी पीएम कार्ड किंवा रेशन कार्ड, आधार कार्ड, लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेवून यावा. वरील आरोग्य विषयक योजनांचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.

00000

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत 25 जून रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

 शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत

25 जून रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत  रविवार 25 जून रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन अबचलनगर मैदान येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

या शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरात सहभाग घेण्यासाठी अर्जदारांनी sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड व जन्मतारखेचा पुराव्यासह (पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी प्रमाणपत्र यापैकी एक) वर शिबिराच्या ठिकाणी सकाळी 11 वा. चाचणीसाठी उपस्थित राहून फेसलेस व नॉन फेसलेस शिकाऊ अनुज्ञप्ती सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत 25 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत

25 जून रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 21 :- शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातर्गंत जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी रविवार दिनांक 25 जून रोजी अबचल नगर मैदान, नांदेड येथे  रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी  वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या, सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. काही अडचण असल्यास दुरध्वनी क्रमांक (02462) 251674 किंवा ई-मेल nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.

0000

शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात

प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागत नगरमालेगाव रोड नांदेड येथे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिकउच्च माध्यमिकपदवी व पदवीत्तर या पुनर/नुतन प्रवेशासाठी 15 जुलै 2023 पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत. यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही. अचूक व परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील यांची पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावीअसे आवाहन मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृहाचे गृहप्रमुख यांनी केले आहे. 

 

अर्जासोबत वार्षिक परीक्षेचे गुणपत्रकसन 2022-23 या वर्षात उत्पन्न प्रमाणपत्र तहसिलदार कार्यालयाने अदा केलेले व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्ररहिवासी प्रमाणपत्राचे सत्यप्रती साक्षांकीत करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयात कार्यालयीन वेळेत 27 जून ते 15 जुलै 2023 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून मिळतील. या कालावधीत परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रासह स्विकारले जातील .विद्यार्थ्यांनी प्रवेशाची निवड प्रक्रीया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमित सुरु होईल. या वसतीगृहात शासनाकडून निवासाची व भोजनाची विनामुल्य सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 जुलै असून यानंतर आलेल्या अर्जाचा स्विकार केला जाणार नाही असे मातोश्री शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे. 

0000

 

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...