Friday, December 28, 2018

लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..!
बुधवारी ‘लोकसंवाद’
मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार

नांदेडदि. 28 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभत्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोक संवाद’ साधून जाणून घेणार आहेत. बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थीआणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे.
हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याdevendra.fadnavis या फेसबुक पेजवर, DevFadnavis या ट्विटर हॅण्डलवर आणिDevendra.Fadanavis या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणिyoutube.com/maharashtradgipr यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण)उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनाछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाप्रधानमंत्री पीक विमा योजनामागेल त्याला शेततळेगाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवारस्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनासूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे.
0000

प्रेस नोट


नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणूक 2018
मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडल्‍याबाबत.  

जिल्‍हाधिकारी, नांदेड यांची अधिसूचना दिनांक-26 नोव्‍हेंबर 2018 अन्‍वये नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍य निवडणूकीसाठी जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार  दिनांक 28 डिसेंबर 2018 शुक्रवार रोजी नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्‍ह्यातील एकुण 71 मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत व शांततेत पार पडले. निवडणुकी दरम्‍यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
सदर निवडणूकीसाठी एकुण 26 मतदार निवडणूक लढवित आहेत. एकुण 12 हजार 714 मतदार होते. सर्वात जास्‍त 8 हजार 207 मतदार नांदेड जिल्‍ह्यात होते तर सर्वात कमी मतदार कमी 4 मतदार  उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात होते. एकुण मतदानाच्‍या 72.51 टक्‍के एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. संपुर्ण मतदार क्षेत्रामध्‍ये एकुण 9 हजार 220 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला, त्‍यामध्‍ये 4 हजार 888 पुरुष मतदार होते तर 4 हजार 332 स्‍त्री मतदार होते.
संपुर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी व प्राधिकृत अधिकारी म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी हाताळली. नांदेड जिल्‍ह्यातील सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्‍ताच्‍या उपाययोजना नांदेड जिल्‍हा पोलीस अधिक्षक संजय जाधव यांनी व अतिरीक्‍त जिल्‍हा पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे  यांनी केल्‍या.  
नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्‍ह्यातील जिल्‍हाधिकारी, अपर जिल्‍हाधिकारी, पोलीस आयुक्‍त, जिल्‍हा पोलीस अधिक्षक, अतिरीक्‍त पोलीस अधिक्षक, समन्‍वय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी यांनी काम केले. संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी क्षेत्रिय अधिकारी म्‍हणून काम पाहिले. उपरोक्‍त सर्व अधिकारी व त्‍यांच्‍या अधिनस्‍थ कर्मचारी यांनी निवडणूकीच्‍या कामांचे सुव्‍यवस्थित नियोजन व प्रत्‍यक्षात अंमलबजावणी करुन  मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्‍यात योगदान दिले.
या निवडणूकीची मतमोजणी सर्व तहसिल कार्यालयांच्‍या ठिकाणी व नांदेड तालुक्‍यात बहुउद्देशीय सभागृह, शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे शनिवार 29 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 वाजेपासून होणार आहे. तसेच सोमवार 31 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मतमोजणी संकलन व तीन सदस्‍यांच्‍या निवडणूकीचा निकाल घोषित होणार आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍यावतीने कळविले आहे.
000000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू

नांदेड, दि. 28 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 डिसेंबर 2018 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 जानेवारी 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.  
00000


नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्‍पांतर्गत
नांदेड जिल्‍हयात दुसऱ्या टप्‍यात 215 गावांची निवड
सोमवार 31 डिसेंबर रोजी एकदिवसीय प्रशिक्षण
नांदेड, दि. 28 :-  गावातील लहान शेतकऱ्यांना बदलत्‍या हवामानाला जुळवुन घेण्‍यास सक्षम करणे व शेती व्‍यवसाय किफायतशिर करण्‍यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. या अतंर्गत नांदेड जिल्‍हयात दुसऱ्या टप्‍यात 215 गावांची निवड करण्‍यात आली आहे.
प्रथम टप्‍यात निवडण्‍यात आलेल्‍या 70 गावात प्रकल्‍प राबविण्‍यास सुरवात झाली आहे. दुसऱ्या टप्‍यात निवडण्यात आलेल्‍या गावात अमंलबजावणीसाठी सोमवार 31 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सरपंच, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व ग्रामसेवक यांचे जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे  एकदिवसीय प्रशिक्षण आयोजीत करण्‍यात आले आहे. या प्रशिणास सर्व संबधित गावाचे  सरपंच, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे, असे अवाहन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे  यांनी केले.
या प्रकल्‍पातंर्गत   वैयक्‍तीक लाभार्थीसाठी फळबाग, शेडनेट, बंदिस्‍त शेळीपालन, कुकूटपालन, मधुमक्षीका पालन, शेततळे, शेततळे अस्‍तरीकरण इत्‍यादी बाबींचा समावेश असून सामुदाईक क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची कामे, शेतकरी गट व शेतकरी उत्‍पादक कंपनी यांचेसाठी प्रकल्‍प आधारीत अनुदान देण्‍यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी गावस्‍तरावर ग्रामस्‍तरीय समितीची स्‍थापना करण्‍यात येणार असुन समितीने गावातील योजना राबवावयाची आहे.
            सोमवार 31 डिसेंबर रोजी होणाऱ्या एक दिवशीय प्रशिक्षणास जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे  तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्‍पाचे मार्गदर्शक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
000000


पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात
27 उमेदवाराची प्राथमिक निवड

नांदेड, दि. 28 :-  जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड महात्मा फूले मंगल कार्यालय फुले मार्केट आय.टी.आय. जवळ नांदेड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.  या मेळाव्यात 27 उमेदवाराची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्यास प्रमूख पाहूणे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जी. पी. दुम्पलवार तर अध्यक्षस्थानी रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान उपस्थित होते.
 आयटीआय उत्तीर्ण असलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यास ओळखले पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वत:चा विकास रु घेतला पाहिजे. स्थानीक नोकरीच्या मागे लागता बाहेर गावी जावून नोकरी करावे असे प्रमुख पाहुण्याने आवाहन केले. सध्या शासकीय नोकरीचे प्रमाण कमी झाल्यामुळे खाजगी क्षेत्रात नोकरीस मोठया प्रमाणात वाव आहे. बेरोजगारानी आलेल्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. खाजगी उद्योगात काम करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आसल्यामुळे बेरोजगाराला आपल्या उदरनिर्रवाहासाठी उत्तम उपाय आहे. असे श्री. सकवान यांनी  उपस्थित बेरोजगारांना सुचविले.
यावेळी कंपनीचे अधिकारी आपआपल्या कंपनीतील भरावयाच्या पदासंबधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. टेनि, ऑपरेटर, एटियम ऑपरेटर, सिटीबायकर, ऑफीसर रिपोर्टस, ऑफीसर कॉल सेंटर,ड्रायव्हर,या पदाची भरती करण्यात आली असून 27 उमेदवाराची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुप्रिया पाटील यांनी केले. मेळाव्यास कार्यालयातील अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.
00000



पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात
27 उमेदवाराची प्राथमिक निवड

नांदेड, दि. 28 :-  जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड महात्मा फूले मंगल कार्यालय फुले मार्केट आय.टी.आय. जवळ नांदेड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.  या मेळाव्यात 27 उमेदवाराची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या मेळाव्यास प्रमूख पाहूणे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जी. पी. दुम्पलवार तर अध्यक्षस्थानी रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक उल्हास सकवान उपस्थित होते.
 आयटीआय उत्तीर्ण असलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्यास ओळखले पाहिजे आणि त्याप्रमाणे स्वत:चा विकास रु घेतला पाहिजे. स्थानीक नोकरीच्या मागे लागता बाहेर गावी जावून नोकरी करावे असे प्रमुख पाहुण्याने आवाहन केले. सध्या शासकीय नोकरीचे प्रमाण कमी झाल्यामुळे खाजगी क्षेत्रात नोकरीस मोठया प्रमाणात वाव आहे. बेरोजगारानी आलेल्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. खाजगी उद्योगात काम करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आसल्यामुळे बेरोजगाराला आपल्या उदरनिर्रवाहासाठी उत्तम उपाय आहे. असे श्री. सकवान यांनी  उपस्थित बेरोजगारांना सुचविले.
यावेळी कंपनीचे अधिकारी आपआपल्या कंपनीतील भरावयाच्या पदासंबधी तसेच कंपनी विषयी माहिती दिली. टेनि, ऑपरेटर, एटियम ऑपरेटर, सिटीबायकर, ऑफीसर रिपोर्टस, ऑफीसर कॉल सेंटर,ड्रायव्हर,या पदाची भरती करण्यात आली असून 27 उमेदवाराची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सुप्रिया पाटील यांनी केले. मेळाव्यास कार्यालयातील अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.
00000


वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...