Wednesday, February 14, 2018


अल्पसंख्यांक योजनांची
माहिती देण्यासाठी कार्यशाळा  
नांदेड, दि. 14 :- अल्‍पसंख्‍यांक समाजासाठी राबवयेत असलेल्‍या शासनाच्या योजनांची माहिती व्‍हावी व त्‍यांना योजनांचा लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शनिवार 24 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11 वा. कार्यशाळा आयोजित करण्‍यात आली आहे.
अल्‍पसंख्‍यांकांच्या सर्वंकष विकासासाठी अल्‍पसंख्‍यांक विकास विभागामार्फत राबविण्‍यात येत असलेल्‍या योजनांचा प्रसार करण्‍याचे शासनाचे धोरण आहे. अल्पसंख्याक विभागामार्फत राबविण्‍यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्‍तीतजास्‍त जनतेपर्यंत पोहचविण्‍याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, संबंधितांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.    
00000


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव
मुधकरराव कांबळे यांचा दौरा   
नांदेड, दि. 14 :-  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकरराव कांबळे (राज्यमंत्री दर्जा) हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 18 फेब्रुवारी 2018 रोजी हिंगोली येथुन शासकीय वाहनाने दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2.15 वा. साई दत्त मंगल कार्यालय सिडको नांदेड येथे विवाह कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वा. गुणवंत काळे यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 3 वा. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथील दलित मित्र धनाजीराव घोडजकर, समाज भुषण पुरस्कार 2018 या सोहळ्यास उपस्थिती. रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव व मुक्काम.
सोमवार 19 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन शासकीय वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.
00000


गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे
200 कोटींची केंद्राकडे मागणी करणार
शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत
                                                -- कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

            मुंबई, दि. 14: राज्यात गेल्या चार दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. कालपर्यंत झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे आतापर्यंत साधारणता एक लाख 90 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सुमारे 1800 गावांचा त्यात समावेश आहे. पुढील दोन दिवसात पंचनाम्याबाबत अंतिम अहवाल अपेक्षित आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्यात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाकडे 200 कोटी रुपयांची मदत देण्याबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार उपस्थित होते.
            कृषिमंत्री यावेळी म्हणाले, शनिवार व रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे 16 जिल्ह्यातील 61 तालुक्यातील 1 हजार 279 गावांमधील 1 लाख 27  हजार 322 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. मात्र दि. 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे 6 जिल्ह्यांमधील 20 तालुक्यातील 595 गावांतील 61 हजार 361 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. बुलढाणा, नांदेड, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागात काल झालेल्या अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानाचा पंचनाम्याबाबत अंतिम अहवाल पुढील दोन दिवसात प्राप्त होईल.
            आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चा झाली. फळ व शेती पिकांच्या नुकसानासाठी भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा अंतर्गत गारपिटीचा विकल्प दिला आहे अशा शेतकऱ्यांसाठी विमा योजनेतून रक्कम देण्यात येईल. मोसंबी व संत्रा पिकासाठी 23 हजार 300 रुपये प्रती हेक्टरी,  केळीसाठी 40 हजार रुपये प्रती हेक्टरी, आंब्यासाठी 36 हजार 700 रुपये तर लिंबूसाठी 20 हजार रुपये प्रती हेक्टरी मदत देण्यात येणार आहे.
            ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा काढला नाही परंतु गारपिटीने त्यांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार प्रती हेक्टरी 18 हजार रुपयांच्या मर्यादेत मदत देण्यात येईल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
            मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या जिरायत पिकांसाठी (ज्वारी, मका, गहू, हरभरा,सूर्यफूल) प्रती हेक्टरी 6 हजार 800 रुपये तर सिंचनाखालील जमीनीबाबत 13 हजार 500 रुपये मदत देण्यात येईल. नुकसानीबाबत पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल.
            सोमवारी झालेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील 232 गावांमधील 20 हजार 177 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे त्यात 7 तालुक्याचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील 3 तालुके, 103 गावे , 10 हजार 260 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 3 तालुक्यात 40 गावांमधील 2 हजार 150 हेक्टरचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 82 गावामध्ये 1 हजार 725 हेक्टरचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील 2 तालुक्यांमधील 10 गावातील 140 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील 96 गावांमधील 21 हजार 925 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील 32 गावांमधील 4 हजार 984 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
शनिवारी व रविवारी झालेल्या पावसांमुळे नुकसानाबाबत माहिती
      बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, शिरुर या 3 तालुक्यातील  42 गावातील 10 हजार 632 हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामध्ये प्रामुख्याने रब्बी, ज्वारी, हरभरा, फळपीके, भाजीपाला यांचा समावेश आहे.
      जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, आंबड या 5 तालुक्यातील  175 गावांमधील 32 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे.
            परभणी जिल्ह्यातील सेलू व जिंतूर तालुक्यामधील 23 गावातील 3 हजार 595 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे.
            उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 26 गावांमधील 583 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
      जळगांव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या 3 तालुक्यातील 38 गावांचा समावेश असून 2 हजार 495 हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, गहू, कांदा व हरभऱ्यांचे नुकसान झाले आहे.
            अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलढाणा जिल्ह्याला बसला असून चिखली, खामगाव, शेगांव, जळगांव-जामूद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या 10 तालुक्यातील 286 गावांमधील 32 हजार 700 हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, कांदा, फळ व भाजीपाला यांचे नुकसान झाले आहे.
            अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजनगाव सुरजी व चिखलदरा या 8 तालुक्यातील  270 गावातील 26 हजार 598 हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचे नुकसांन झाले आहे.
            अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर, बार्शी, टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर, तेल्हार या 7 तालुक्यातील 101 गावामधील 4 हजार 360 हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा या पिकाचे नुकसान झाले आहे.
            वाशिम जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्यातील 36 गावांमधींल 8 हजार 509 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे.
            लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाखूर या 5 तालुक्यातील 59 गावांतील 2 हजार 679 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, गहू, हरभरा पीकाचे नूकसान झाले आहे.
            हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा या 2 तालुक्यातील 30 गावांमधील 143 हेक्टर क्षेत्रावरील पीकाचे नुकसान झाले आहे.
000


ईईएसएलसोबत नगर विकास विभागाचा सामंजस्य करार
ऊर्जा बचतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील
पथदिवे एलईडीवर आणणार
                                                                    -- मुख्यमंत्री
            मुंबई, दि. 14: ऊर्जा बचतीसाठी राज्यातील  सर्व महानगरपालिका,नगरपालिका व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातील पथदिवे  एलईडीवर आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
            महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरचे जुने पारंपरिक दिवे बदलून नवीन एलईडी दिवे लावण्यासाठी एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) व नगरविकास विभाग यांच्यात आज सामंजस्य करार श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,नगरविकास विभागाच्या प्रधानसचिव मनिषा म्हैसकर, ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभकुमार उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले, नगरविकास विभागातर्फे केलेल्या अमृत योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची दखलकेंद्रशासनाने घेतली. एलईडी पथदिव्यांचे  काम उत्तम दर्जाचे व्हावे. डिसेंबर 2018 पर्यत हे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी यावेळी ईईएसएल ला दिली.
            या सामंजस्य करारानुसार ईईएसएलच्या स्ट्रीट लाईटिंग नॅशनल प्रोग्रॅम अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सुमारे 20 लाख एलईडी दिवे लावले जातील. यामधुन 500 मेगावॅट वीज बचत होणार असून वीज बिलात किमान 50 टक्कयांनी घट होणार आहे.
            नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील सुमारे 394 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना टप्प्या-टप्याने या योजनेचा लाभ मिळेल. या प्रकल्प अंतर्गत सध्याचे सोडियम व्हेपर, मर्क्युरी व्हेपर दिवे बदलून तिथे एलईडी दिवे लावले जातील. तसेच या दिव्यांची पुढील सात वर्षे देखभाल केली जाईल. या योजनेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नांदेड यासारखी प्रमुख शहरे समाविष्ट असतील.
            या करारानुसार, रस्त्यावरील एलईडी दिव्यांचा पुरवठा करणे, बसविणे, सुरू करणे तसेच दिवे बसवल्यानंतरची देखभाल दुरुस्ती आणि वॉरंटी कालावधीतील अदलाबदल यासह सेवा आणि देखभाल पुरवणे अशी संपूर्ण जबाबदारी ईईएसएलने घेतली आहे.
            अमरावती महानगरपालिका क्षेत्रात ईईएसएलने यशस्वीरित्या केलेल्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.
000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...