Saturday, March 21, 2020

मा. उच्च न्यायालयाच्या परिपत्रकानुसार व मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या आदेशानुसार कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालय येथे दिनांक २३.०३.२०२० ते दिनांक ३१.०३.२०२० पर्यंत आळीपाळीने  न्यायीक वर्ग व  कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहे. कोरोना हा साथीचा रोग संसर्गजन्य असून त्याचा फैलाव टाळण्यासाठी न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत सुध्दा बदल करण्यात आला आहे.सध्या न्यायादानाची वेळ ही सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० अशी करण्यात आली आहे. या वेळेत फक्त रिमांड जामीन बाबतचे व अत्यावश्यक दावे ज्या मध्ये ०७ दिवसांच्या आत चौकशी साठी ठेवणे आवश्यक आहे. अशीच प्रकरणे ठेवण्याचे निर्देश मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दिपक अ. धोळकिया यांनी सर्व न्यायाधीशांना दिले आहेत.  पक्षकारांनी आपआपल्या प्रकरणांच्या तारखा घेण्यासाठी न्यायालयात येऊ नये व गर्दी करू नये असे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे. वकीलांनी व पक्षकारांनी त्यांच्या प्रकरणांच्या तारखा या जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावरून घ्याव्यात व कोणताही पक्षकार सध्या तारखेला न्यायालयात हजर राहिला नाही तर त्या विरुद्ध कोणताही आदेश केला जाणार नाही आणि सर्व प्रकारच्या प्रकरणात चार आठवड्या  नंतरच्या तारखा देण्यात येणार आहेत तरी  पक्षकारांनी काळजी करू नये. सर्व पक्षकार आणि वकिलांनी सहकार्य करावे व लोक संपर्क टाळावा असे अवाहन मा प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी केले  आहे

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...