Wednesday, July 18, 2018


लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
नागपूर, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या ‘आषाढी वारी’ विशेषांकाचे आज विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री तथा या विशेषांकाचे अतिथी संपादक चंद्रकांत पाटील, विभागीय आयुक्त अनुप कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आदी उपस्थित होते.
आषाढी वारीचा संग्राह्य विशेषांक
पंढरपुरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादवारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले.
या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री श्री. पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’ असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी  वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.
0000





सहस्त्रकुंडाचा मनमोहक धबधबा....
मराठवाडा-विदर्भ सिमेवरील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील पैनगंगा नदीवरील मनमोहक सहस्त्रकुंड धबधबा नुकत्याच झालेल्या पावसामुळे भरुन वाहत आहे. अन् शेकडो वर्षापासून जनतेच्या मनाचा ठाव घेणारा प्रचंड आकर्षक असलेला हा धबधबा पर्यटकांचे आकर्षन ठरत आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांसाठी नांदेड ते किनवट मार्गावर इस्लापूर पासून अवघ्या 3 कि.मी. अंतरावर असणारा या धबधब्याच्या दोन्ही धारेतून सततधार पाणी वाहत असून लागणाऱ्या खोलीच्या तळाचा अंदाज घेत  साठलेल्या कुंडातून पाणी पुढे जात आहे. निसर्गरम्य अल्हादायक या सहस्त्रकुंडाच्या धबधब्यास पर्यटन प्रेमींनी भेट देण्याची संधी दवडू नये.  ( प्रकाशचित्रे : विजय होकर्णे, नांदेड )   



सहस्त्रकुंडाचा मनमोहक धबधबा....
नांदेड-किनवट मार्गावर इस्लापूर पाटी पासून 3 कि.मी. तर किनवटपासून सुमारे 50 कि.मी. अंतरावर असणारा सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पैनगंगा नदीचा प्रवाह एका मोठ्या खडकामुळे विभागला आहे. त्यामुळे पाणी खाली कोसळतांना वेगवेगळ्या धारा पडतात. नदीच्या अलीकडील पात्रात कोसळणाऱ्या धारेचा हा सर्वांत मोठा धबधबा असून मराठवाडा आणि विदर्भाचे सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील हा धबधबा खरोखरच नयनरम्य आहे. अंदाजे 30 ते 40 फूट उंची वरून कोसळणारा हा धबधबा आपले खरे रौद्र रुप धारण करतो, ते पावसाळ्यात डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपले वेगळे रुप दाखवतो. पैनगंगेच्या मराठवाड्याच्या बाजूकडून दुधाचा महापूर भासणारा एकच धबधबा दिसतो. हा धबधबा अगदी 15 ते 20 फुटावरुन पाहता येतो. खडकावरील शेवाळ्यामुळे खूप जवळ जाणे धोक्याचे आहे. नदीच्या विदर्भाच्या बाजूकडून मात्र 4 ते 5 अप्रतिम धबधब्याच्या धारा पहावयास मिळतात. त्या बाजूला जाण्यासाठी उमरखेड ते किनवट मार्गावरील बिटरगावहून आत जावे लागते. धबधब्याजवळ इस्लापूर वन विभागाच्यावतीने छोटी नर्सरी बगीचा उभारला असून पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करुन दिल्या आहेत. सध्या येथे पर्यटकांनी सेल्फी काढण्याचा मोह टाळला पाहिजे, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 




  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...