Friday, June 3, 2022

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष लेख

संकल्प करू या पर्यावरण रक्षणाचा !

संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 1972 साली पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानुसार 1973 मध्ये 5 जून रोजी पहिल्यांदा पर्यावरण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जागतिक तापमान वाढीची समस्या लक्षात घेत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणामुळे मानवी जीवन अस्तित्वात आहे. वातावरण आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. निर्सग आपल्याला श्वासोच्छवासासाठी हवेपासून खाण्या-पिण्यापर्यंत सर्व काही पुरवते आणि पृथ्वीवर राहण्यासाठी अनुकूल वातावरण देते. ही सर्व निसर्गाची देणगी आहे. निसर्ग आणि पर्यावरणामुळेच हे जग सुरळीतपणे सुरू आहे. निसर्ग आपल्याला जगण्यासाठी खूप काही देतो पण त्या बदल्यात मानवाने फक्त निसर्गाचे शोषण केले मानवाच्या या कृत्यामुळे निसर्गाची हानी होत असूनजीवसृष्टीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

 

अशा परिस्थितीत पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. ग्लोबल वार्मिंगसागरी प्रदूषण आणि वाढती लोकसंख्या यांचा वाढता धोका नियंत्रित करणे हे एक आव्हान आहे. जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण करता येईल. यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.या निमित्ताने आपण सर्व जण पर्यावरण संवर्धनासाठी पुढील संकल्प करू शकतो.


पर्यावरण दिनाचा पहिला संकल्प

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घरातून निर्माण होणारा कचरा योग्य ठिकाणी पोहचवण्याचा पहिला संकल्प घ्या. आपल्या घरातून दररोज खूप कचरा बाहेर पडतो.काही लोक कचरा इकडे तिकडे फेकतात. तो फेकलेला कचरा एकतर जनावरांच्या पोटात जातो किंवा नद्यांमध्ये वाहून जातो. त्यामुळे आपल्या नद्याही प्रदुषित झाल्या आहेत. कचरा इकडे-तिकडे न टाकता तो डस्टबीनमध्ये टाकावा. सुका व ओला कचरा वेगळा करून फेकून द्या जेणेकरून त्याचा योग्य वापर करता येईल.


पर्यावरण दिनाचा दुसरा संकल्प

माणसाचे जीवन श्वासोच्छवासाने चालते आणि श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा लागते.त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनी श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्नकरूत्यासाठी पेट्रोल-डिझेलऐवजी ई-वाहन वापरू. अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.


पर्यावरण दिनाचा तिसरा संकल्प

निसर्ग हा झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. मात्र आजकाल कोणीही कधीही झाडे तोडत आहे. झाडे तोडल्याने ऑक्सिजनच्या कमतरता बरोबर हवामानाचे चक्रही बिघडत आहे. त्यामुळे अनेकदा भीषण नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत वृक्षतोड थांबवून आपण अधिकाधिक रोपे लावूजेणेकरून निसर्गाची आतापर्यंत झालेली हानी भरून काढता येईलअशी प्रतिज्ञा घ्या.

 
पर्यावरण संरक्षणाचा चौथा संकल्प

झाडेरोपेमाती, , प्राणीपाणी इत्यादींचा पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरणाचा समतोल सदैव राखला जावाअशी प्रार्थना करा आणि पर्यावरणाचा समतोल व सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल. ते सर्व काही आम्ही करू अशी शपथ घ्या.


पर्यावरण संरक्षणाचा पाचवा संकल्प

पर्यावरण दिनीपाचवा आणि शेवटचा संकल्प घ्या की आम्ही पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न करू. पॉलिथिन आणि प्लास्टिक हे निसर्गाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः त्यांचा वापर करणार नाहीत्याचप्रमाणे तुम्ही इतर कोणी पॉलिथिन किंवा प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांनाही पर्यावरणाबाबत जागरूक करेल अशी प्रतिज्ञा घ्या. कारण पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

 

-         श्वेता पोटुडे

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000

2.6.2022

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 3 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 17 जून 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शुक्रवार 3 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 17 जून 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 महात्मा फुले लिखीत तृतीय रत्नचा

कुसूम सभागृहात 4 जून रोजी प्रयोग


·  सर्वांसाठी नि:शुल्क प्रवेश

·  महाज्योती तर्फे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- नांदेड येथील कुसुम नाट्यगृहात शनिवार 4 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा जोतिबा फुले लिखीत ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावात्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवारसंचालक डॉ. बबनराव तायवाडेप्रा. दिवाकर गमेलक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग करण्याचे योजिले आहे.

 

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रीएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकुण 30 कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. या आधी विविध जिल्ह्यात 26 प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रबोधनात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदिपकुमार डांगे यांनी केले आहे.

00000




 उद्योजकता विकास अंतर्गत

महिलांसाठी मोफत टेलरिंग प्रशिक्षण


 · आरसेडी व उमेदचा उपक्रम

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी महिला टेलरिंग प्रशिक्षणाचे आयोजन ते 30 जुन 2022 पर्यंत आरसेडी नांदेड येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा प्रशिक्षक गजानन पातेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमेद अभियानाचे राम भलावीअतिष गायकवाडकौशल्य समन्वयक प्रियंका चव्हाणबालाजी गिरीआशिष राऊतविश्वास हटृटेकर यांची उपस्थिती होती.

 

या प्रशिक्षणात नांदेड जिल्ह्यातील 18 ते 40 वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात. आतापर्यत 35 महिलांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणात उद्योजकता विकासकौशल्य विकास अंतर्गत उद्योजकता सक्षमता कार्य दृष्टिकोनसंभाषनकौशल्यवेळेचे नियोजनबँकिंगप्रकल्प अहवालमार्केटिंग सर्व्हेआर्थिक साक्षरताइंग्रजी ज्ञानबेसिक संगणक ज्ञानशासकीय योजनासामाजिक सुरक्षा योजनातसेच शिवणकला अंतर्गत विविध विषयांचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षक ज्योती वांगजे या महिलांना मोफत प्रशिक्षण देवून त्यांना कार्यकुशल करण्याचे काम करीत आहेत. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थ्यांची निवासी आणि जेवणाची मोफत सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रूनिता अर्ध्यापुरकरअभिजित पाथरीकरमारोती कांबळे यांनी परीश्रम घेतले.

00000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...