Monday, June 3, 2019


नांदेड शहराचे अन् माझे जुने ऋणानुबंध
                                 - महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव
नांदेड, दि. 3 :- माझे महाविद्यालयीन शिक्षण नांदेडमध्ये झाले असून या शहराचे अन्‍ माझे जुने ऋणानुबंध आहेत, या शहराने मला खूप काही दिले आहे, या शहराचा मी कायम ऋणी आहे, असे भावनिक उद्गगार महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे काढले.
अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित खासदार प्रताप पाटील-चिखलीकर, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, संचालक के.एम. जोशी,  माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,  संचालक कैलास काला हे उपस्थित होते.
महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव पुढे म्हणाले,  अभिनव भारत शिक्षण संस्था एक संस्कारमय, शिस्तप्रिय शिक्षण संस्था असून या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांचे आयुष्य घडले आहे. अशा संस्थेचा इतर शिक्षण संस्था आदर्श घेऊन शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब अभिनंदनीय आहे.

शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांवर मात करण्यासाठी,  त्यावरील उपाययोजना शोधण्यासाठी या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शिक्षण द्यायलाच हवे. वृक्षारोपण, स्वच्छ भारत अभियान या अभियानांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष कृतीशील सहभाग वाढायला हवा, असे सांगून राज्यपाल श्री. राव यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो-करोडो युवकांना आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग दाखविला आहे. याच माध्यमातून या संस्थेनेही त्यांच्या संस्थेत कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी पुढे यावे, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत या संस्थेने त्यांच्याच आवारात विविध प्रशिक्षण पाठ्यक्रम सुरू करावेत जेणेकरून येथील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पुढील भविष्यासाठी उद्योग क्षेत्राकडे वळता येईल, आत्मनिर्भर होता येईल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी तसेच उपक्रमांविषयी माहिती दिली. आभार प्रा. शिवणीकर यांनी मानले.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
00000



आपत्ती व्यवस्थापनात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची
                                - महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव

नांदेड, दि. 3 :- प्रगत देशांमध्ये सामाजिक शिस्त, देशाप्रतीचे प्रेम, आदर नागरी कर्तव्यांचे काटेकोर पालन आणि आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण तयारी या तीन गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले जाते आणि त्याला अनुसरूनच आपली जीवनशैलीही पाळली जाते. प्रगत देश या सर्व गोष्टींसाठी अत्यंत जागरुक असतात आणि आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन याविषयीची जनजागृती यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते, असे प्रतिपादन महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत मंच येथे दि. 3 जून ते 12 जून या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर, आव्हान-2019 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख तसेच विशेष कार्य अधिकारी डॉ. अतुल साळुंके, महामहीम राज्यपाल महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बी. वेणूगोपाल रेड्डी, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी हे उपस्थित होते.  

राज्यपाल चे. विद्यासागर राव पुढे म्हणाले ,सध्याच्या काळात प्रत्येक राष्ट्राने आपत्ती व्यवस्थापनाकरिता नेहमीच सज्ज राहायला हवे. खरे तर आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक धडे शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच देणे,  ही काळाची गरज आहे.  भारत देश हा विकसनशील देशांमधील अग्रेसर देश आहे.  एकविसाव्या शतकातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे सबंध जग पहात आहे.  अशा या टप्प्यावर भारताकडे असलेल्या युवा शक्तीचा वापर राष्ट्रहितासाठी प्रगतीसाठी योग्य मार्गाने होणे गरजेचे आहे.  
महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष कौतुक करताना म्हणाले की,  राष्ट्रउभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका अत्यंत आवश्यक व मोलाची आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन अभियानामध्ये या विद्यार्थ्यांचा खूप चांगला उपयोग होणार आहे. हेच युवक - युवती उद्याचे देशाचे भविष्य आहे. या विद्यार्थ्यांना या वयात दिले जाणारे प्रशिक्षण त्यांच्या पुढील आयुष्यभरासाठी उपयुक्त व दिशादर्शक ठरणार आहे. त्यामुळे दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथका तर्फे अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात यावीत, मात्र त्याचबरोबरीने दरवर्षी सुरक्षा कवायतही (Security Drill) आयोजित करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिरात राज्याच्या विविध महाविद्यालयांमधून आलेल्या 800 मुले व 600 मुलींचे राज्यपाल श्री. राव यांनी विशेष अभिनंदन केले आणि त्यांना आवाहनही केले की,  या प्रशिक्षणाचा सर्वार्थाने लाभ घ्या आणि समाजाला उपयोगी पडेल असे काम करा. जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांची निश्चितच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमापूजनाने व तद्नंतर दीपप्रज्वलनाने या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली.  त्याचबरोबर एनएसएसच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत गाऊन येथील वातावरण अधिक उत्साही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. अतुल साळुंखे यांनी केले. या प्रास्ताविकात त्यांनी राज्यभरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या विविध कामगिरीबाबतचा विस्तृत अहवाल महामहीम राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव , उपस्थित मान्यवर तसेच विद्यार्थ्यांना सादर केला.
शेवटी आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यापीठातील संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी केले.
विद्यापीठ परिसरात महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते
विविध कार्यक्रम संपन्न
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या भेटीदरम्यान महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसही भेट दिली. त्याचप्रमाणे त्यांनी एनडीआरएफच्या आपत्ती व्यवस्थापन प्रदर्शनास भेट दिली. त्यानंतर त्यांच्या हस्ते श्री. गुरू गोविंद सिंघजी अध्यासन संकुलाच्या इमारतीचे भूमीपूजन संपन्न झाले. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर व प्राणी संग्रहालयाच्या नूतन इमारतीचेही उद्घाटन महामहीम राज्यपाल श्री. चे . विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे ,विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. दीपक शिंदे, तसेच श्री. गुरू गोविंदसिंघजी अध्यासन व संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष लड्डू सिंघजी महाजन प्रा. भगवंत सिंघजी गुलाटी,  निरंजन रवींद्र सिंघजी, सरदार रणवीर सिंग, प्रा. गुरुबच्चन सिंग विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता अरुण पाटील, अभियंता कनिष्ठ अभियंता हिरामण वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.
00000




श्री गुरु गोविंदसिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र इमारतीचे
भूमीपूजन व कोनशिला अनावरण महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते संपन्न  

नांदेड, दि. 3 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिसरातील श्री गुरू गोविंदसिंघजी अध्यासन  संकुल व संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल  चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले.  तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिसरात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.  
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे ,विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, अध्यासन केंद्राचे समन्वयक  डॉ. दीपक शिंदे, तसेच श्री. गुरू गोविंदसिंघजी अध्यासन व संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष लड्डू सिंघजी महाजन प्रा. भगवंत सिंघजी गुलाटी,  निरंजन रवींद्र सिंघजी, सरदार रणवीर सिंग, प्रा. गुरुबच्चन सिंग विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता अरुण पाटील, अभियंता कनिष्ठ अभियंता हिरामण वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती.
000000





महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे स्वागत

नांदेड, दि. 3 :- महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे  आज सकाळी येथील  श्री. गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले.  जिल्हा प्रशासनाच्यावतीने महामहीम राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  
यावेळी त्यांच्या समवेत नांदेड  महापौर श्रीमती  दीक्षा धबाले,  विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, महानगरपालिका आयुक्त लहूराज माळी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांची उपस्थिती होती.
00000

  वृत्‍त क्र.   36 6 एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड , दि.   19   : - एमएच-सीईटी परीक्षा-2024     ही 2...