Monday, October 1, 2018


हवामानावर आधारित पीक विमा

योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

नांदेड, दि. 1:-  शासन निर्णय दि. 28 सप्टेंबर 2018 अन्वये नांदेड जिल्ह्यातील सन 2018-19 मध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना अंबिया बहाराकरीता लागु करण्यात आली आहे. योजना कार्यन्वयीत करणारी यंत्रणा / कंपनी ही भारतीय कृषि पिक विमा कंपनी, मुंबई आहे. सदरची योजना अधिसुचित पीकांसाठी कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची राहील आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  एैच्छिक राहिल. दि. 28 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार सदरच्या पिक विमा भरण्याची अंतिम मुदत द्राक्ष पिकासाठी 15 ऑक्टोंबर 2018, केळी, मोसंबी पिकासाठी 31 ऑक्टोंबर2018,  आंबा पिकासाठी 31 डिसेंबर 2018  पर्यंत आहे.

विमा हप्ता दर

अ. क्र.
फळपिक
विमा संरक्षित
रक्कम (नियमित) रुपये
गारपीट विमा
संरक्षित रक्कम
रुपये
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु.
नियमित
गारपीट
1
द्राक्ष
3,08,000/-
1,02,667/-
15400
5133
2
मोसंबी
77,000/-
25,667/-
7315
1283
3
केळी
1,32,000/-
44,000/-
19,000
2200
4
आंबा
1,21,000/-
40,333/-
26,620
2017

 

योजना अंमलबजावणी वेळापत्रक अधिसुचित मंडळे

            सदरची योजना जिल्ह्यामध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल.

अ.क्र.
अधिसुचित फळपिक
तालुके
अधिसुचित महसुल मंडळे
 
1
द्राक्ष
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगां, विष्णुपूरी.
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
2
मोसंबी
नांदेड
लिंबगाव, विष्णूपूरी
मुदखेड
बारड
अर्धापूर
मालेगाव
3
केळी
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपूरी
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
किनवट
किनवट, बोधडी
4
आंबा
अर्धापूर
मालेगाव, दाभड
5
 
मुखेड
मुक्रमाबाद

 

प्रधानमंत्री फसल बिमा योजना हवामनावर आधारित फळपिक विमा आंबीया बहारामध्ये उपरोक्त अंतिम दिनांकापुर्वी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी व नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

****



दुर्गादेवी मंडळांना वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने परवानगी देणे चालु


 

नांदेड दि. 1 :- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत दुर्गादेवी मंडळांना वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाईन व ऑलाईन या दोन्ही पध्दतीने परवानगी देणे चालु आहे. दुर्गा देवी मंडळांना परवानगी मिळण्यासाठी सर्व सभासदांचे आधार कार्ड  व पॅन कार्ड, सर्व सभासदांचे ई-मेल आयडी, सर्व सभासदांचे मोबाईल क्रमांक , जागामालकाचे संमतीपत्र, पोलीस स्टेशनचे नाहरकत पत्र, दुर्गादेवी मंडळाच्या स्थापनेबाबतचा ठराव, मागील वर्षाचा हिशोब पत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

तरी सर्व दुर्गा देवी मंडळांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेवूनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्त, नांदेड यांनी केले आहे.

****

जिल्ह्यात राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही सर्वेक्षण सुरु  

नांदेड दि. 1 :-  राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही तयार करण्याबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यात या सर्वेक्षणाचे काम सुरु झाले आहे.  या सर्वेक्षणात कंपनी ॲक्ट 1956 , फॅक्ट्री ॲक्ट 1948 , शॉप ॲन्ड कमर्शीयल इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1948, सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1960 , को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960, खादी अँन्ड व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड, डायरेक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीज (डीआयसी) या सात कायद्यातंर्गत दि. 31 मार्च, 2015 पुर्वी नोंदणी झालेल्या आस्थापनांची माहिती संकलीत केली जाणार आहेत. यामध्ये आस्थापनाचालक, परवानाधारकांकडून त्यांचा पॅन क्रमांक , टॅन क्रमांक , आस्थापना क्रमांक , कर्मचारी संख्या याबाबतची माहिती सर्वेक्षण करणाऱ्या संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना देण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी जी. जी. चितळे यांनी केले आहे.

****

अल्पसंख्यांक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे

ऑनलाईन अर्ज भरण्यास 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड दि. 1 :- अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार सन 2018-2019 साठी अल्पसंख्यांक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर, 2018 पर्यंत होती. पंरतु, आता 15 ऑक्टोंबर, 2018 ऑनलाईन अर्ज भरता येतील.

सन 2018-2019 या वर्षासाठी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचे केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन 2018-2019 या वर्षी नुतणीकरण व नवीन विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता यावी व जास्तीत - जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (मा) बालासाहेब कुंडगीर यांनी केले आहे.

****

जागतिक जेष्ठ नागरिक दिन व सप्ताहानिमित्त

तपासणी व उपचार शिबीर

नांदेड दि. 1 :- श्री. गुरु गोबिंद सिंघाजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जेष्ठ नागरिकांसाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ६० वर्ष वयोगटावरील सर्व स्त्री पुरुष जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले.

या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड शहर शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, तसेच उत्तर मराठवाडा जेष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष अशोक तेरकर, महासंघाचे सचिव भागीरथी बच्चेवार, कोषाध्यक्ष जयवंतराव सोमवाड, सामाजिक कार्यकर्ते डॉ. तेलंग  हे उपस्थित होते.

सदरील शिबिरात एकूण २१२ जेष्ठ नागरिकांचे महुमेह, उच्चरक्तदाब, मोतीबिंदू, व मौखिक आरोग्य, यासाठी तपासणी करण्यात आली त्यापैकी ६९ जेष्ठ नागरिकांची ईसीजी काढण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, एनसीडी कार्यक्रमाचे नोडल ऑफीसर एच. आर. गुंटूरकर, डॉ हनुमंत पाटील तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   या कार्यक्रमाच प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी.एन. हजारी व आभार प्रदर्शन                डॉ. एच. के. साखरे, यांनी केले.

****

लेख
चला करु या कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र...  
आता वाटचाल कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्राकडे

दरवर्षी आपण सर्व  2 ऑक्टोंबर हा दिवस परम पूज्य महात्मा गांधी यांची जयंती म्हणून  साजरा करतो  कुष्ठरुग्णांची सेवा हे  परम पूज्य  महात्मा गांधी यांचे अपूर्ण राहिले काम आहे.
        कुष्ठरोग हा अति प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला रोग आहे या रोगाची माहिती अनेक पाठ्यपुस्तकातून आपणास मिळते.  फार पूर्वी या रोगास महारोग म्हणत होते व हाच शब्द पुढे असाच प्रचलित झाला आहे. या रोगाची विद्रुपता पाहूनच या रुग्णाला समाजाने  महारोगी असे नाव दिले व ते नाव आजही प्रचलित आहे. कुष्ठरोग झालेल्या रुग्णास फार वर्षापूर्वी वाळीत टाकले जायचं त्याला हीन दर्जाची वागणूक दिली जायची. यामुळे रुग्णास उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध रहात नव्हते. यामुळे नाईलाजाने तो कुष्ठरुग्ण दारोदारी भिक मागत असे. या रुग्णांकडे सर्वप्रथम कोणी पहिले असेल तर ते ख्रिशनमिशनऱ्यांनी. भारतात यांनीच या रुग्णांसाठी मोठी मोठी दवाखाने उभारली व याची सेवा ते करू लागले.
       भारतात डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, विनोबा भावे,व महात्मा गांधीजी यांनी या रुग्णांची सेवा केली व अलीकडील काळात बाबा आमटे यांना आपण कधीही विसरणार नाही कारण त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी खूप कार्य केले आहे .
     सन १८७३ मध्ये या कुष्ठजंतूचा शोध डॉ आरमार हन्सन या नॉर्वे देशाच्या शात्रज्ञाने लावला वं याला मायाकोबाक्टेरीम लेप्री हे नाव दिले .कुष्ठरोग हा रोग याच जिवाणूमुळे होतो .हा जीवाणू फ़क़्त माणसाच्या शरीरातच राहतो व हा रोग मानवापासून मानवास होतो. हा अल्पसासंर्गीक असून आज मितीला यावर प्रतिबंधात्मक लस तयार झाली आहे पण ती अद्याप प्रयोग अवस्थेत आहे मात्र याचा नायनाट करता येईल अशी खात्री जागतिक आरोग्य संघटनेला आली आहे. गदी लवकरात लवकर रोगाचे निदान करून औषधोपचाराखली  आणल्यास कुष्ठरोग पुर्णपणे बरा  होतो या रोगाचे जंतु मानवी शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याचा पेशीजालाशी संघर्ष होतो यात जंतु व पेशीजाल याचा नाश होतो या प्रकाराला असांसेर्गिक रोग असे महणतात, दुसर्‍या प्रकारात मात्र जंतूची वाढ ही अमर्याद असते यात रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी असते महणून रोगाची वाढ लवकर होते. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे  होत नाही मात्र विकोपाला गेल्यावर ढोबळ चिन्हे मात्र दिसू लागतात.सततच्या घनिष्ठ संपर्काने एकमेकांपासून दुसऱ्यास होतो . यात सुरुवातीची लक्षणे व नंतरची लक्षणे ही प्रगत असलेली असतात व हीच लक्षणे समाजासमोर येतात. यासाठी या रोगाची भीती व तिरस्कार अनेक शतके घट्ट गैरसमजुती समाजात निर्माण करत आहे .
       शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगपेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग  समोर येतो  कोडाप्रमाणे याचे डाग  पांढरे नसतात त्वचेवरील डाग समजण्यास वेळ लागतो मात्र महत्वाचीगोष्ट महणजे या जागची  त्वचा स्पर्शहीन होते ,उष्णता व वेदना पूर्ण पणे नाहीश्या  होतात तसेच हे जंतू खोलवर कार्य करतात त्यामुळे घाम येणाऱ्या ग्रंथी आणि चेतासंस्था या पूर्ण ताकदीनिशी काम करत नाहीत  भारतात बरीच रुग्ण हे असांसर्गिक असतात व काहीप्रमाणात रुग्ण हे सांसर्गिक असतात व हेच रुग्ण अंगावर चट्टे ,चेहेर्‍यावर व कानाच्या पाळीवर  गाठी येणे ,भुवयाचे केस जाने, हातापायची बोट वाकडी होणे क्षती पडणे, जखमा चिघळणे,कधी कधी डोळे,कान,नाक व घश्यामध्ये गाठी दिसू लागतात तसेच चेहऱ्यावरील गाठी मुळे चेहरा सिहासारखा दिसू लागतो ,कधी कधी नाकाच्या आकारात बदल होतो  अशी लक्षणे रुग्णाच्या शरीरावर दिसू लागतात
       १९४७ साली या रोगावर DAPSON नावाचे औषध निर्माण झाले या औषधाचा वापर सर्व जुन्या व नवीन कुष्ठरुग्णांना करण्यात येऊ लागला .या औषधाचा प्रभावामुळे सन १९५५ साली महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाची सुरुवात केली या काळात सर्व नवीन व जुन्या विकृती कुष्ठरुग्णांना  या औषधाखाली आणले या नंतर नवीन औषधाचा शोध चालू होता व याला सन १९८१-१९८२ साली १००% यश प्राप्त झाले या औषधाचे नाव MDT हे होय. कुष्ठरोगवर हे रामबाण औषध आहे व हि औषधी आजही चालू आहे. या औषधामुळे रोगाची तीव्रता कमी झाली आहे म्हणजेच पूर्वी (M.D.T.) येणायापुर्वी दर दहा हजारलोकसंख्या मध्ये १०० ते ११८ रुग्ण सापडत असे पण (M.D.T.) मुळे आज मितीला हे प्रमाण १ किवा १ पेक्षा कमी झाले आहे म्हणजेच  आपण या रोगाचे दूरीकरण केले आहे . या यशाचे भागीदार जनता जनार्धनच आहे.
     कुष्ठरोगाची लक्षणे – फिक्कट किवा लालसर उभारी आलेला बधीर चट्टा , जंतू परीक्षणात जंतू सापडणे ,चटयावरील केस हळूहळू नाहेसे होतात, त्वचा तेलकट व चकाकणारी असते, रुग्णाच्या नसा जंतूमुळे रोगग्रस्त होतात त्या मुळे त्या जाड व दुखऱ्या होतात.भूवायाची केस गळून पडतात,कानाच्या पाळ्या जाड होतात  वरील लक्षणे आपल्या शरीरावर आढल्यास लवकरात लवकर नजीकच्या सरकारी दवाखाण्यात दाखून घ्यावे.
     उद्देश --- १) लवकरात लवकर निवीन कुष्ठरुग्ण शोधून काढणे ,विनाविक्कृती रुग्ण शोधणे व त्याला M.D.T. औषधाखाली आणणे .२) नवीन सांसर्गिक रुग्ण सापडल्य्मुळे संसर्गाची साखळी खंडित होऊन रोगाचा प्रसार कमी करणे ३)कुष्ठरोगाचे दूरीकरण साध्य करणे ४) कुष्ठरोगाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यामधील कुष्ठरोगाचे प्रमाणाची खात्री करणे.
     पध्दती- संपूर्ण जिल्हा स्तरावर अभियानाची सुरुवात , सर्व आरोग्य कर्मचारी यांचे प्रशिक्षण , आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यात वर्तमान पत्रात लेख म्हणी लिहणे , रेडीओ संदेश हस्तपत्रिका वाटप करणे ,शाळेत माहिती देणे ,प्रभातफेरी काढणे , दवंडी देणे ,  ग्रामसभेमध्ये माहिती देणे ,मंदिर मज्जित वरील स्पीकर्स वर माहिती देणे, विशेष मोहिमेत आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत घरोघर सर्वेक्षण घेणे, एल. आर सी ( कुष्ठरोग संदभं सेवा केंद्र ) L.R.C. च्या माधमातून कुष्ठरोगबाधिताना दर्जेदार सेवा दिले जाते  तसेच इतर कुष्ठरोग आरोग्य साहित्याचा वापर करून निघालेले संशइत रुग्णांना वैद्यकीय आधिकारी  यांच्या मार्फत तपासणी करून त्यांना एम डी टी ( बहुविध औषधोपचार पद्धती ) देऊन रोगमुक्त करणे.
     कुष्ठरोगाचा प्रसार कसा होतो—उपचारघेतलेल्या सांसेर्गिक कुष्ठरुग्णाकडूनच केवळ हवेच्या माध्यमातूनच मानवास होतो
     अधिशयन काळ –याचा अधिशयन काळ हा ३ ते ५ वर्षाचा किवा या पेक्षा अधिकही असू शकतो
     कुष्ठरोग कोणाला होऊ शकतो किंवा नाही १) हा रोग कोणालाही होऊ शकतो २) कुष्ठरोग होणे किवा न होणे हे त्या मनुष्याच्या रोग प्रतिकार शक्तीवर अवलंबून असते. ३) हा रोग स्त्री / पुरुष ,जात / धर्म ,गरीब / श्रीमंत, उच्च / नीच असा भेदभाव करत नाही. ४) ९८ टक्के लोकांची रोगप्रतिकार शक्ती हि चांगलीच असते अशांनाच हा रोग होत नाही
     कुष्ठरोगाच्या लक्षनाची  ठळक वैशिट्ये -१) कुठलाही त्रास होत नाही ,खाजत  नाही ,दुखत नाही .२) शरीरावर कुठेही होऊ शकतो ,३)हा आजार हळुवारपने पसरणारा आहे ,४) याचे डाग दुधासारखे पांढरे नसतात ,५) याचे चट्टे कमीजास्त कमीजास्त होत  नाही  ,६) चटयावरील केस हळूहळू नाहीसे होतात ,७) चटयावर घाम येत नाही ई.
     थोडेसे महत्वाचे-  १) हा रोग जीवाणू मुळे होतो २) हा आजार अनुवांशिक नाही  ३) यात पाप-पुण्याचा कुठलाही संबध नाही  ४) हा आजार दैवीशापा- पापा मुळे होत नाही ५) देवाला नवस फेडल्याने हा आजार बरा होत नाही ६)  हा  आजार जडीबुटी मुळे बरा  होत नाही  ७) हा आजार पूजा अर्चा मुळे कमी होत नाही या आजारावर एकच आणि एकच औषध म्हणजे  M.D.T. असून हे सर्व सरकारी ,निमसरकारी दवाखान्यात मोफत मिळते
     कुष्ठरोग प्रकार – १) P.B ( असंर्गिक रुग्ण )- एक ते पाच बधीर चट्टे २) M.B ( अल्प सांसेर्गिक रुग्ण ) पाच पेक्षा जास्ती चट्टे ,एक किवा अनेक मज्जा बाधित होणे
     कुष्ठरोगावरील औषधी -१) एम डी टी ( बहुविध औषधोपचार पद्धती )-M.D.T असे म्हणतात .सदरील औषधी ही सरकारी,निमसरकारी दवाखान्यात मोफत मिळतात .या औषधाच्या एकाच मात्रेने ९९.९९ टक्के जंतू मारले जातात .म्हणूनच सांसेर्गिक रुग्णसुद्धा रोगप्रसार करू शकत नाहीत .२) कुठल्याही प्रकारचा कुष्ठरोग ६ ते १२ महिन्यात पूर्णपणे बेरा होतो ३) ) एम डी टी ( बहुविध औषधोपचार पद्धती )-M.D.Tहि सर्वांसाठी सुरक्षित आहे .  
       शासकीय योजना -  १) विकृती रुग्णांना संजय गांधी निराधार योजना / इंदिरा आवास योजना , बस पास , रेल्वे पास , बोटे वाकडी ( हालचाल करणारी) असतील तर अशा रुग्णांना पुनर्रचनातमक शस्त्रक्रिया  मोफत करून रुग्णाला ८००० /- दिले जातात तसेच अशा रुग्णाला SPLINT दिली जाते , तळपायाल बधिरता असलेल्या रुग्णाला M.C.R. चप्पल दिली जाते ,पायाला,हाताला जखमा असतील तर अशांना ULCER KIT दिली जाते , डोळे बंद न होणार्या रुग्णाला GOGGLE दिला जातो.
       तरी अपना सर्वाना विनंती करण्यात येते कि आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी  यांना घरातील सर्व सभासदांची तपासणी करून घेण्यास आपण सर्वांनी सहकार्य करावे  जेणे करून आपण संपूर्ण महाराष्ट्र    भारत कुष्ठरोग मुक्त करू. 
                                                                  सुनिल पाटील
                                                                अवेद्यकीय  सहायक
                                                                           सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग
                                                                                                कार्यालय नांदेड

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...