Saturday, May 19, 2018


मुदखेड, धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार
समितीच्या निवडणूक गणाचे आरक्षण जाहिर  
नांदेड, दि. 19 :- राज्‍य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांचे आदेशान्वये मुदखेड व धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक गणाची आरक्षण सोडत लॉटरी पद्धतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन येथे काढण्यात आली.  
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या 15 गणापैकी 5 गणाचे आरक्षण लॉटरी पद्धतीने निश्चित करण्यात आले. महिलांसाठी- 2 गण, इतर मागासवर्गीय- 1, विमुक्त जाती / भटक्या जमाती- 1 , अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती- 1 गण. यानुसार पंधरा गणाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्याचा गणनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समिती : गणाचे नाव- ( कंसात आरक्षण ) पुढील प्रमाणे आहे. राजापूर (इतर मागासवर्गीय), धानोरा बु (सर्वसाधारण), सालेगाव (महिला), आटाळा (महिलांसाठी), जारीकोट (विमुक्त जाती / भटक्या जमाती), चिकना (सर्वसाधारण), कारखेली (सर्वसाधारण), येवती (सर्वसाधारण), येताळा (सर्वसाधारण), पाटोदा बु (सर्वसाधारण), अतकुर (सर्वसाधारण), रत्नाळी (सर्वसाधारण), बाळापूर (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती), नायगाव ध. (सर्वसाधारण), आलूर (सर्वसाधारण).
मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समिती : गणाचे नाव- ( कंसात आरक्षण ) पुढील प्रमाणे आहे. पांढरवाडी  (सर्वसाधारण), शेंबोली (सर्वसाधारण), पार्डी वैजापूर (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती), निवघा (सर्वसाधारण), निवघा (विमुक्त जाती / भटक्या जमाती), खांबाळा (सर्वसाधारण), मुदखेड, (सर्वसाधारण), मुदखेड (सर्वसाधारण), मुदखेड (महिला), इजळी (सर्वसाधारण), चिकाळा (सर्वसाधारण), डोणगाव (इतर मागासवर्गीय), डोणगाव (सर्वसाधारण), पांगरगाव (महिला), पिंपळकौठा चोर (सर्वसाधारण). याप्रमाणे धर्माबाद व मुदखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गणाचे आरक्षण करण्यात आले.
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 चे (सुधारणा) नियम 2017 मधील तरतुदी तसेच अधिनियम, 1963 चे कलम 13, 14 व 14-अ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्राचे गणांमध्ये विभाजन करुन प्रत्येक गणात साधारणत: समान खातेदार संख्या विभागण्यात येणार असल्याने गणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांची माहिती यावेळी देण्यात आली.   
000000


उभारी उपक्रमांतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता रोजगाराभिमुख प्रशिक्षण
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी
तांत्रिक प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 19 :- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांनी प्रशिक्षण संस्थेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन तांत्रिक प्रशिक्षण घ्यावे व स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारी उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात 1 जानेवारी 2012 ते 31 मार्च 2018 या कालावधीतील आत्महत्याग्रस्त 751 कुटुंबांचा 15 नोव्हेंबर 2017 व 4 एप्रिल 2018 या दिवशी सर्व्हे करण्यात आला. त्यात शासनाच्या विविध योजनांची मागणी करणाऱ्या कुटुंबांची निश्चिती करुन त्यांना लाभ देण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणुन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील सभागृहात जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या झालेल्या सर्वेक्षणात उभारी उपक्रमांतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता रोजगाराभिमुख प्रशिक्षणासाठी मागणी केलेल्या 306 कुटुंबातील किमान आठवी ते बारावी उत्तीर्ण असणाऱ्या पाल्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  
               
या कार्यशाळेत प्रमुख वक्ते नरेंद्र चव्हाण (चेअरमन, डॉ. शंकरराव चव्हाण बायो शुगर, डोंगरकडा), मल्लिकार्जुन सोपल (सेंटर हेड-ICICI Bank Academy for Skills, नरसोबावाडी, ता. शिरोळ जि. कोल्हापुर) यांचे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने बहुमोल मार्गदर्शन लाभले. नरेंद्र चव्हाण यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिला व मुलींसाठी बचत गटामार्फत विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे नमुद करुन तांत्रिक प्रशिक्षणासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
त्यासाठी ICICI Bank Academy for Skills, नरसोबावाडी, ता. शिरोळ जि. कोल्हापुर येथे मोफत रहिवासी व व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत (उदा. विद्युत व घरगुती उपकरणांची दुरुस्ती, रेफ्रिजरेशन व ए.सी. दुरुस्ती, पंपसेट व मोटर्स रिपेअर इ.) प्रशिक्षण देऊन पाल्यांना आत्मनिर्भर कसे होता येईल या दृष्टीने पुर्ण मार्गदर्शन केले जाते. तसेच सदर प्रशिक्षण संस्थेमार्फत तीन महिन्याचा रहिवासी अभ्यासक्रम, भोजन व राहण्याची व्यवस्था निःशुल्क करण्यात येत असुन त्याकरिता ICICI Bank Academy for Skills, नरसोबावाडी, ता. शिरोळ जि. कोल्हापुर-416104 (मोबाईल क्र. 08554986343, 09175043070) या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या संस्थेच्या नागपुर येथील शाखेत फक्त मुलींचे प्रशिक्षण केंद्र असुन नरसोबाची वाडी येथे मुलांसाठी निवासी प्रशिक्षणाची सोय आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच महसुल कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोपान गुंडाळे यांनी केले तर आभार तहसिलदा किरण आंबेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलु, श्रीमती जया अन्नमवार, श्रीमती शिला डाफणे, विजय चोथवे, राजीव ढवळे यांनी परिश्रम घेतले.             
000000000


संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी
सतर्कता, समन्वय, तत्परतेने प्रयत्न करावेत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 19 :-  आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी संघटीत आणि वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या.  
मान्‍सून 2018 च्‍या अनुषंगाने पुर्वतयारी आढावा बैठक डॉ. शंकरराव चव्‍हाण नियोजन भवन येथे जिल्‍हाधिकारी डोंगरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त लहूराज माळी, अप्पर जिल्‍हाधिकारी संतोष पाट, निवासी उपजिल्‍हाधिकारी जयराज कारभारी, कृषि, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, पोलीस, आरोग्य आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्‍यासाठी आणि सावधगिरीच्‍या उपाययोजनांचा आढावा संबंधत विभागकडघेऊन जिल्‍हाधिकारी श्री डोंगरे म्हणाले, पाझर तलाव,द्या आणि पाण्‍याच्‍या साठवणुकीचे मोठे, मध्‍यम आणि लघु प्रकल्‍प पावसाळयात फुटु नये अथवा ओव्‍हरफ्लो होन गावांना धोका होऊ नये यादृष्‍टीने उपाययोजना कराव्यात. पावसाळयात उत्‍पन्‍न होणाऱ्या साथीच्‍या रोगराईंना वेळीच थांबविण्‍यासाठी प्राथमिक आरोग्‍य केंद्रात मुबलकपणे औषध आणि ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवावी त्‍याच योग्‍य उपयोग व्‍हाव. महानगरपालिका व नगरपरिषदांनी नालेसफाई तसेच अतिक्रमण दकरावेत. सर्व प्रमुख यंत्रणांनी 1 जून ते 30 सप्‍टेंबर या मान्‍सून कालावधी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. हवाई मार्गाने शोध व बचाव कार्य करण्‍याची आवश्‍यकता भासल्‍यास जिल्ह्यातील स्‍थायी व अस्‍थायी हेलिपॅडची विस्‍तृत माहिती स्‍थानि पातळीवरुन तहसीलदार यांनी 25 मे पुर्वी उपलब्‍ध करुन त्‍यांचे अक्षांस व रेखांश दयावेत. पाटबंधारे विभागाने धरणनिहाय समन्‍वय अधिकारी नेमणूक करावीत. तहसीलस्‍तरावर मान्‍सुन पुर्व तयारी आढावा बैठक वेळीच आयोजित करुन पुर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्‍सून पुर्वी पुर्ण करावत आणि स्‍थानि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे चाल मोबाईल संपर्क अदयावत करावीत. दरवर्षी होणा-या विजपातामुळे होणारे मृत्‍यु कमी करण्‍यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पर्ण करण्‍याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी यावेळी दिले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबाबत व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनासंबंधी केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.                
000000


ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने
दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड, दि. 19 :- जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी 27 मे रोजी मतदान व 28 मे रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेली गावे याठिकाणी मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर सायं 6 वाजेपासून अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची तारीख व ठिकाणी 26 मे 2018 रोजी व मतदानाचा दिवस 27 मे रोजी संपुर्ण दिवस. मतमोजणी होत असलेल्या शहर / गावात मतमोजणीचा दिवस 28 मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.
000000


  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...