Thursday, October 31, 2019



पदवीधर मतदारांची नोंदणी अधिक प्रमाणात करा
कोणताही पात्र पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहू  नये
                                                  - विभागीय आयुक्त  सुनिल  केंद्रेकर
औरंगाबाद, दि-31:  05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत सहा नोंव्हेंबर आहे. त्यामुळे  कोणताही पात्र पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विभागातील प्रत्येक पदनिर्देशित  निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनिल  केंद्रेकर यांनी  संबंधीतांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनिल  केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचेसाठी "पदवीधर मतदारसंघ निवडणूक" प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी उदय चौधरी ,उपायूक्त वर्षा ठाकूर, पराग सोमण,अप्पर जिल्हाधिकारी भानूदास पालवे, अविनाश पाठक यांनी  पदवीधर मतदारांची नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. तर उपजिल्हाधिकारी श्री.अरगुंडे आणि शिवाजी शिंदे यांनी पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रमासंबंधी सादरीकरणाव्दारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपजिल्हाधिकारी पी.आर.कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाचा समारोप केला.
यावेळी, मतदारांच्या नोंदणीसाठी प्राप्त अर्जांवर तात्काळ अचुक व गतीने निर्णय घेऊन त्याची संगणक प्रणालीवर नोंद घ्यावी. त्याबाबतचा अहवाल वेळेवर सादर करण्याची सूचना यावेळी केंद्रेकर यांनी केली.
जिल्हाधिकारी श्री. चौधरी  यांनी पदवीधर मतदारांची यादी अद्ययावत करून नवीन पात्र मतदारांची अचुकपणे नोंदणी करण्याच्या कामास गती देण्याची सुचना केली. सर्व अधिकाऱ्यांनी नमुना नं. 18 नुसार दाखल अर्जाची कसून तपासणी करावी व मुळ अभिलेख्यांशी ती माहिती पडताळून घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच श्रीमती ठाकूर यांनीही सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील  सर्व शासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे येथील पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य द्यावे व अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करुन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सुचना केली.
       मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ () अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम  ०१ ऑक्टोबरपासून जाहीर झाला आहे. मतदार नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना नं.१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणा-या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिका-याकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी , पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित झाले असले पाहिजे.
शासकीय कार्यालयात सामाजिक उपक्रमामध्ये काम करणा-या व्यक्तीच्या अर्हताबद्दल संस्थेकडील अभिलेख पाहून कार्यालय प्रमुखांना मतदार नोंदणीसाठी विहित नमुन्यात प्रमाणपत्र देता येईल. तसेच विद्यापीठांकडील पदवीधारकांची नोंदणी, अभियंत्यांची नोंदणी, विधी अभिकर्त्याची नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी , सनदी लेखापालांची नोंदणी आदी नोंदणीबाबतचा दाखला अर्जासोबत अर्हतेबाबत पुरावा म्हणून देता येईल. तसेच राजकीय पक्ष संघटना अथवा कोणत्याही व्यक्तीस एका गठ्ठा अर्ज मिळणार नाहीत, तसेच एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारलेही जाणार नाहीत. मात्र, एका कुटुंबासाठी अथवा कार्यालय प्रमुख अथवा संस्थेस त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांसाठी अर्जाची एकत्रित मागणी करता येईल व एकत्रित अर्ज सादर करता येतील.
                           प्राप्त मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येऊन २३ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत संबंधितांना दावे, हरकती नोंदविता येतील. दिनांक ३० डिसेंबर रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.यावेळी  उपस्थित उपजिल्हाधिकारी,तहसीलदार यांच्या शंकाचे निरसन करण्यात  आले.
                                           000000000000

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या
 मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 31 :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समावेश करण्याबाबत सर्व पदवीधरांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी मतदार यादीत नाव असेल ती यादी सदर निवडणुकीत वैध नाही. कुठलाही शाखेचा पदवीधर किंवा डिप्लोमा 1 नोव्हेंबर 2016 पूर्वीचा असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधीत तहसिल कार्यालयात संपर्क साधावा.  
अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 6 नोव्हेंबर 2019 असून अर्जासोबत कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती पदवी किंवा डिप्लोमा, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र / आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज नि:शुल्क उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.    
0000


उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2019 या वर्षासाठी शनिवार 30 नोव्हेंबर 2019 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळी,  उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापुर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.  
नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी शनिवार 30 नोव्हेंबर 2019 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा,  असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ,नांदेड यांनी केले आहे.
000000



लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 4 नोव्हेंबर 2019 दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000

Wednesday, October 30, 2019


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौडमध्ये विविध घटकांचा सहभाग ;
सरदार पटेल यांना अभिवादन
नांदेड दि. 31 :- विविधतेतील एकतेचा मंत्र घेवून लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज शहरात एकता दौड संपन्न झाली. या दौडमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उत्साहात सहभागी झाले. महात्मा गांधी पुतळा परिसर वजिराबाद ते जुना मोंढा टॉवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत एकता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये सुरेख वेशभूषेतील विद्यार्थी, अग्निशमन व पोलीस दलाच्या पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.   
एकता दौडच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर एकता दौडचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. 
दौडमध्ये महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, गुरुदिपसिंघ संधू, स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंघ परिहार, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, नेहरु युवा केंद्राचे कुलदिपसिंघ, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सुमित डोडल, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आदि सहभागी होते.   
तसेच पोलीस दलाच्या पथकाने वाद्य वृदांसह संचलन करत या दौडमध्ये सहभाग घेतला. महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टॉवर या ठिकाणाहून एकता दौड मार्गक्रमण झाली. या दौडमध्ये सहभागी घटकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीपर फलक घेवून दौडमध्ये सहभागी झाले.  
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात दौडमध्ये सहभागी पथके, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी  एकतेच्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची प्रतिज्ञा व दक्षता जनजागृती दिनानिमित्त शपथ दिली. पोलीस दलाच्यावतीने सलामी देऊन एकता दौडचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या दौडमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  
00000


पदवीधर मतदारसंघ यादीत
नाव नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 30 :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समावेश करण्याबाबत सर्व पदवीधरांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी मतदार यादीत नाव असेल ती यादी सदर निवडणुकीत वैध नाही. कुठलाही शाखेचा पदवीधर किंवा डिप्लोमा 1 नोव्हेंबर 2016 पूर्वीचा असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधीत तहसिल कार्यालयात संपर्क साधावा. 
अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 6 नोव्हेंबर 2019 असून अर्जासोबत कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती पदवी किंवा डिप्लोमा, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र / आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज नि:शुल्क उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.   
0000


प्रेस नोट
सन 2019-20 साठी IDMI SPQEM या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन
SPEMM ही नवी योजना सुरु होणार
नांदेड, दि. 30 :- अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी क्षेत्रिय सघन कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक दृष्टया मागास असलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण संस्थांना पायाभुत सुविधा तसेच मदरसा मधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत योजना एकत्रित करुन नवीन योजना SPEMM (Scheme for Providing Quality Education in Madarsas / Minorties) सुरु करण्यात आली आहे. SPEMM योजनेंतर्गत IDMI SPQEM या योजनांबाबत मार्गदर्शक बाबी व संस्था / शाळा/ मतदरसा यांना प्रस्तावासोबत सादर करावयाची विहित नमुन्यातील प्रपत्रे शिक्षणाधिकारी (नि.शि.) कार्यालय जिल्हा परिषद नांदेड व गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती येथे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
या योजनेचा लाभ संस्था, शाळा, मदरसा यांनी घ्यावा. या योजनेविषयी अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (नि.शि.) कार्यालय जिल्हा परिषद नांदेड व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी (नि.शि.) कार्यालय, जिल्हा परिषद नांदेड व दिलीपकुमार बनसोडे उपशिक्षणाधिकारी (नि.शि.) कार्यालय जि. प. नांदेड यांनी केले आहे.
00000


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी
जमात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव
समिती कार्यालयात सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 30 :- सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद कार्यालयामार्फत या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अंतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता वैद्यकीय, अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) राखीव जागेवर प्रवेश घेणाऱ्या किंवा प्रवेश घेण्यास इच्छूक विद्यार्थ्यांना त्यांचे अनुसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी प्रस्ताव 7 ऑक्टोंबर 2019 ते 31 एप्रिल 2020 पर्यंत या समिती कार्यालयात सादर करण्याकरिता जाहिर आवाहन करण्यात आले आहे.
तसेच विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होऊन त्यांचे प्रवेशाची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण व्हावी, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या समिती कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आपले जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रकरणासंदर्भात समिती कार्यालयाशी संपर्क साधून सदर प्रकरणाचा पाठपुरावा करावा. विद्यार्थ्यांना त्यांनी दाखल केलेल्या जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रस्तावात कोणत्याही प्रकारची त्रुटी, चुक किंवा अपुर्णता राहू नये याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सहआयुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद यांनी केले आहे.
000000


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुरुवारी
एकता दौडीत सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड, दि. 30 :- जिल्हा प्रशासनाच्यावतीने सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त गुरुवार 31 ऑक्टोंबर 2019 रोजी राष्ट्रीय एकता दिवस तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस आणि राष्ट्रीय एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दौड महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राष्ट्रीय एकता दौडीचे गुरुवार 31 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे. या दौडीचा समारोप जुना मोंढा टावर परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. राष्ट्रीय एकता दौडीमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  
000000


Tuesday, October 29, 2019

उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2019 या वर्षासाठी शनिवार 30 नोव्हेंबर 2019 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळीउद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापुर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.  
नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी शनिवार 30 नोव्हेंबर 2019 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावाअसे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ,नांदेड यांनी केले आहे.
000000

Sunday, October 27, 2019


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ
 मतदार यादीसाठी पात्र व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 :- मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31 (4) चे अनुरोधाने मतदार नोंदणी अधिकारी, 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी पात्र असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नमुना 18 अन्वये अर्ज मागविण्याबाबत 1 ऑक्टोंबर 2019 रोजी वर्तमानपत्रात मतदार नोंदणी नियम 1960 ला जोडलेला नमुना 18 मध्ये आणि सदर नोटीसच्या दुसऱ्या अनुसूचिमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सर्व पात्र व्यक्तींनी यापूर्वी अर्ज केले नसल्यास त्यांनी 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी नमुना 18 मध्ये अर्ज सादर करु शकतील. हा तपशील विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांचे अधिकृत संकेतस्थळावर https://aurangabad.gov.in/notification-panel/ वर उपलब्ध आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000


अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे
ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 28 :- अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार सन 2019-20 साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 ऑक्टोंबर 2019 पर्यंत होती. परंतू आता 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज पर्यंत भरता येतील.
सन 2019-20 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन 2019-20 यावर्षी रीनिवल व फ्रेश विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) यांनी केले आहे.  
00000


मुग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी
ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 28 :-  केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हंगाम सन 2019-20 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्याकरीता शेतकरी नोंदणीची मुदत शासनाकडून गुरुवार 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करावी व हमीभाव खरेदी केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विक्री करुन हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.
00000


शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव खरेदी,
शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा  
नांदेड, दि. 28 :- शेतकऱ्यांनी किमान हमीभाव दरापेक्षा कमी दराने शेतमाल विक्री करता हमीभाव दराप्रमाणे शासकीय खरेदी केंद्रावर आपला शेतमाल विक्रीस आणावा. ज्या शेतकऱ्यांना सध्या शेतमाल विक्री करावयाचा नसून वाढीव बाजारभावाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. तसेच शेतमाल विक्री करताना पक्की पावती घेण्यास विसरु नये, असे आवाहन प्रवीण फडणीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात नाफेड विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत मूग, उडीद सोयाबीन शेतमाल किमान हमीभाव दराप्रमाणे खरेदी करणेसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरु झालआहेत. यात अर्धापूर (नांदेड), मुखेड, हदगाव किनवट येथे नाफेडचे शासकीय खरेदी केंद्र सुरु असून नायगाव, भोकर धर्माबाद येथे विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांचे शासकीय खरेदी केंद्र सुरु आहेत. या शासकीय खरेदी केंद्रावर मूग उडीद यांची ऑनलाईन नोंदणी 31 ऑक्टोंबर 2019 पर्यंत होणार आहे. तर सोयाबीन पिकांची नोंदणी 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर शेतमाल विक्रीस आणताना शेतमाल वाळवून, काडीकचरा विरहीत चाळणी करुन आर्द्रता 12 टक्के पेक्षाकमी असलेला स्वच्छ शेतमाल आणावा.
 शेतमालाचा काढणी हंगाम सुरु झाल्याबरोबर शेतमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत असतो. परिणामी जास्त आवकमुळे बाजारभाव खाली येतात. शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक निकडीमुळे मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतू शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर विक्री केल्यास वाढीव बाजारभावाचा फायदा शेतकऱ्यांस निश्चित होऊन शेतमालास योग्य भाव मिळू मिळतो. यादृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे, असेही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
00000

वृत्‍त क्र.   384   देगलूर तहसील कार्यालयासमोरील वाहतूक वळण रस्यात बदल   नांदेड दि. 24 एप्रिल- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने...