Saturday, July 20, 2019

कृषि विभागाच्यावतीने अनुदानावर गोदाम बांधकाम



            नांदेड दि. 20 :- कृषि विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये गोदाम बांधकामासाठी लक्षांक प्राप्त आहे. प्राप्त लक्षांकाच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. इच्छूक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकंडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझान / स्पेसिफीकेशन खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 10 ऑगस्ट  2019 पर्यंत सादर करावा.
या योजनेतर्गत ज्या ठिकाणी गोदामांची व्यवस्था नाही ज्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येतो अशा परिसरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य  अंतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजनेअंतर्गत कमाल 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लक्ष रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे.
             अटी शर्तीच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव बँक कर्जाशी निगडीत असून च्छू शेतकरी उत्पादक संघ / कंपनी, केंद्र शासनाची ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे असावा.  लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड करण्यात येईल. वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यांनी जागेची निवड करावी त्याची खात्री  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी हे करतील.
या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम चालु आर्थिक वर्षात पुर्ण करणे बंधनकारक आहे. अपुर्ण बांधकाम, मंजूर डिझाईन, स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषि माल साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना योग्य माफक दरात करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे रविवारी उद्घाटन


            नांदेड, दि. 20 :- अर्धापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांचे हस्ते रविवार 21 जुलै 2019 रोजी सकाळी 10.30 वा. संपन्न होणार आहे.
            मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती किशोर सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया राहणार आहे. अर्धापूर अभिवक्ता संघाचे किशोर देशमुख, अर्धापूर येथील दिवाणी न्यायाधीश क स्तर मयूरा यादव यांची उपस्थिती राहील, अशी माहिती प्रबंधक जिल्हा न्यायालय नांदेड यांनी दिली आहे.
000000

माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन



             नांदेड, दि. 20 :- सैनिक कल्याण विभागाच्यावतीने माजी सैनिक / विधवा त्यांच्या पाल्यांसाठी असलेल्या विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज 15 सप्टेंबर 2019 पर्यंत  मागविण्यात येत आहे.  
राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नर्तन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच देश / राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य  आदींना विशेष गौरव पुरस्कार आर्थिक स्वरूपात देण्यात येतो. 
राष्ट्रीय पातळीवर कामगीरीसाठी 10 हजार रुपये   आंतरराष्ट्रीय पातळीसाठी 25 हजार रुपयाचा पुरस्कार, शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद माजी सैनिकांसाठी असलेल्या कल्याणकारी  निधीमध्ये आहे. 
         दहावी व बारावी परीक्षे 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून विभागात पहिल्या पाच मुलांमध्ये येणाऱ्या पाल्यासांठी,  पदवी पदव्यूत्तरमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम येणाऱ्या माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्याना एक रक्कमी  गौरव पुरस्कार 10 हजार रुपये देण्यात येतो. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.   जिल्हयातील सर्व पात्र माजी सैनिकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे  संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
00000

मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड, दि. 20 :- एअर मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी जिल्हयातील पात्र माजी सैनिक / विधवा यांची पाल्य दहावी व बारावीमध्ये सर्वाधिक गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज 15 सप्टेंबर 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
एअर मार्शल व्ही ए पाटकर विशेष गौरव पुरस्कार हा शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यामधून दहावी व बारावी बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी एका पाल्यास दिला जातो.  या पुरस्काराची रक्कम 5 हजार रुपये आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.  
000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...