Tuesday, May 31, 2022

 खऱ्या गरजू लाभार्थ्यांना उच्च तंत्रज्ञानाने

योजनांचा लाभ तात्काळ देणे झाले सुलभ

-        पंतप्रधान नरेंद्र मोदी  

 

राज्यातील लोककल्याणासाठी केंद्र-राज्य शासनाच्या

योजना प्रभावीपणे राबविल्याचे हे द्योतक

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवाद कार्यक्रमात

लाभार्थ्यांनी जाणून घेतली योजनेमागील तळमळ

 

नांदेड, दि. 31  (जिमाका) :- विकासापासून वंचित असलेल्या समाजातील सर्व घटकांपर्यंत सरकारच्या विविध योजना उच्च तंत्रज्ञानामुळे पोहचविणे आता सुलभ झाले आहे. याचबरोबर ज्यांच्या कल्याणासाठी योजना आखल्या गेल्या आहेत त्या वर्गाला त्याचा लाभ मिळणे शक्य झाले असून यातूनच नवीन भारत घडेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  आज देशभरातील विविध लाभार्थ्यांशी त्यांनी ऑनलाईन संवाद साधला.

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे नांदेड जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांना या संवादात भाग घेता यावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व सुविधा उपलब्ध केल्या होत्या. जिल्ह्यातील तीनशे पेक्षा अधिक लाभधारक या संवादात सहभागी झाले. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) रेखा काळम व मान्यवर उपस्थित होते.

 

महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य आहे. तळागाळातील लोकांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्राने केलेली आहे. कोणत्याही विकास योजनेमध्ये सर्वसामान्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून त्यांना अधिका अधिक न्याय कसा देता येईल ही भूमिका महाराष्ट्राने जपली असल्याच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी लाभधारकांशी संवाद साधला. राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याप परतावाबाबत अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या निदर्शनास आणून दिले.

 

उपस्थित लाभार्थ्यांमध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, आणि अमृत, स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा योजनांचा समावेश होता.

0000









 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त रॅली संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-   संपूर्ण जगात जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून 31 मे रोजी साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रॅली आयोजित करण्यात आले होते. सर्व शासकीय रुग्णालयात तंबाखू व्यसन मुक्ती केंद्र असून तेथे तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. व्यसन करणाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त होण्यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले.

 

या रॅलीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनमंत पाटील, डॉ. एच. टी. साखरे, प्राचार्य रेणुकादास मैड, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक गजानन गोरे, नागेश अटकोरे तसेच शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक श्रीमती अपर्णा जाधव, श्रीमती राजेश्वरी देशमुख, विद्यार्थिनी आणि इंडियन डेंटल असोसिएशन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

तंबाखू व्यसन हे मृत्युच्या प्रमुख कारणांपैकी एक असून त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यापैकी तोंडात सर्वप्रथम लक्षणे दिसून येतात. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या मार्फत आज 31 मे रोजी सर्व नोंदणीकृत डेंटल दवाखान्यात मोफत तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते. पुढील 15 दिवस कर्करोग किंवा त्याआधीचे लक्षणाबाबत तपासणी सर्व डेंटल दवाखान्यात मोफत राहील असे इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पांडूर्णीकर यांनी सांगितले.  

 0000



 विमा सल्लागार पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- नांदेड डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आर पीएल आय) योजनेअंतर्गत डायरेक्ट एजंट (विमा सल्लागार) भरतीसाठी मुलाखती घेण्यात येत आहेत. सदरील अर्ज अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड येथे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात भरलेल्या अर्जासह मंगळवार 14 जून 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 9:30 ते सायं 6 वाजेपर्यंत अधिक्षक डाकघर कार्यालय नांदेड विभाग नांदेड- 431601 येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. सोबत बायोडाटामूळ कागदपत्रेप्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन नांदेड विभाग डाकघरचे अधिक्षक यांनी केले आहे.

  

 विमा सल्लागार पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्रता व मापदंड

उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत-कमी 18 वर्षं व जास्तीत-जास्त 50 वर्ष दरम्यान असावे.अर्जदार हा दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ज्यात केंद्रीय / राज्य मान्यता प्राप्त केलेली असावी. बेरोजगार/ स्वयंबेरोजगारमाजी विमा सल्लागारकोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंटमाजी सैनिकसेवानिवृत्त शिक्षकअंगणवाडी कार्यकर्तेमहिला मंडळ कार्यकर्तेग्रामप्रधानग्रामपंचायत सदस्य आदी टपाल जीवन विमासाठी थेट असे अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्यव्यक्तिमत्वजीवन विमा बाबतचे ज्ञानसंगणकाचे ज्ञानस्थानिक भागाची माहिती आदी बाबी अपेक्षित आहेत. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी / केव्हीपीच्या स्वरूपात असेल.

 

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे नांदेड विभाग डाकघरचे अधीक्षक यांनी कळविले आहे.

0000

Monday, May 30, 2022

 नांदेड जिल्ह्यातील त्या 9 बालकांमध्ये

शासनाने जागविला नवा आत्मविश्वास

 

·       पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन संवादानंतर

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सुर्पूद केले मदतीची किट   

नांदेड, दि. 30  (जिमाका) :- आपल्या माणसाला गमावल्याचे दु:ख हे न सांगता येण्यासारखे असते. कोविडच्या महामारीत ज्या मुलांनी आपले पालक गमावले त्यांना आत्मविश्वासने उभे करण्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन हा एक थोटाचा प्रयत्न आहे. या प्रयत्नातून येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला धैर्य मिळेल. अवघा देश तुमच्या सोबत आहे या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालक गमावलेल्या मुलांच्या मनावर हळूवार फुंकर घालीत नवा आत्मविश्वास दिला. 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पंतप्रधानांचा संवाद ऐकता यावा यादृष्टिने तयारी करून 9 बालकांना निमंत्रीत केले होते. यातील 6 बालक हे 18 वर्षे पूर्ण केलेले आहेत तर 3 बालके हे 18 वर्षापेक्षा लहान आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या मुलांशी संवाद साधत जिल्हा प्रशासन तुमच्या पाठिशी खंबीर असल्याचा धीर दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. अब्दुल रशीद शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, बालकल्याण समितीचे सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते.     

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत या 9 मुलांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पंतप्रधानांनी दिलेले प्रमाणपत्र, पीएम केअर्स फॉर चिलड्रन योजनेचे पासबूक, पीएम हेल्थ कार्ड / आयुष्यमान कार्ड याचा समावेश असलेले किट बहाल केले. नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्ह्यातील कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या बालकांचा शोध घेऊन त्यातील पात्र ठरलेल्या 9 मुलांना आज नवा आत्मविश्वास दिला.

00000



 

 

 जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्री 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- नांदेड जिल्हा माहिती कार्यालयातील जुन्या वर्तमानपत्राची रद्दी, कालबाह्य अन्य नियतकालिके इत्यादींची आहे त्या परिस्थितीत विक्री करावयाची आहे. त्यासाठी खरेदीदार संस्थाकडून प्रति किलो प्रमाणे खरेदी दरपत्रकाची निविदा बुधवार दिनांक 8 जून 2022 पर्यत मागविण्यात येत आहे. इच्छुकांनी आपले लिफाफा बंद दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, विसावानगर , माउली निवास श्री राजेंद्र मनमोहन सिंगी यांचे घर, सिध्दीविनायक मंदिराच्या बाजूला, नांदेड 431602 या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. या संदर्भातील अटी / शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा माहिती अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत

लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांची बँक खाते आधार संलग्न करून सुरळीत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेअंतर्गत देय लाभ एप्रिल 2022 पासून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात आधार आधारीत अदा करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी लाभार्थ्यांची पी.एम. किसान योजनेची बँक खाती असलेल्या सर्व बँकांमध्ये सर्व पी. एम. किसान लाभार्थी खातेदारांची बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी मोहिम राबविण्याबाबत नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार महसूल विजय अवधाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  

0000

 स्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र

नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन


नांदेड, (जिमाका) दि. 30 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे मे 2022 पासून स्कूल बस संवर्गातील वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी विशेष ऑनलाईन अपॉईंमेंट कोटा चालू करण्यात आला आहे. या सुविधेस जिल्हयातील स्कूलबस चालक / मालक यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही. सर्वांनी उपलब्ध सुविधेचा जास्तीत-जास्त लाभ घेऊन स्कूलबस योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीसाठी अपॉईंमेंट घेऊन उपस्थिती रहावे. लवकरच जिल्हयातील शाळा सुरु होणार असल्याने त्यापूर्वीच आपल्या स्कूलबसचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण नसलेल्या स्कूलबस विद्यार्थ्यी व स्कूलसाठी वापरु नयेअसे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

रोजगार मेळाव्याचे बुधवारी आयोजन

 

·         नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 30:-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार 1 जुन 2022 रोजी सकाळी 11 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे करण्यात आले आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यामध्ये वेळेवर उपस्थित राहुन संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास 02462-251674 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावीअसे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

या मेळाव्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना व अण्णासाहेब पाटील व्याज परतावा योजना विषयक मार्गदर्शन होणार आहे. उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. तसेच जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी या रोजगार मेळाव्याचे प्रसिद्धीपत्रक प्रदर्शनीय भागावर अथवा सूचना फलकावर लावावेत असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000000

आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीसाठी भरती मेळाव्याचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने जून 2022 रोजी सकाळी 10 वा. रोजगार / शिकाऊ उमेदवार भरती मेळावा आणि स्वयंरोजगारासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यास आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित रहावेअसे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अंशकालीन प्राचार्य बिरादार एम. एस. यांनी केले आहे.

000000

 जिल्ह्यातील गरजू व होतकरू उमेदवारांसाठी

उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

·  उमेदवारांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन


नांदेड (जिमाका) दि. 30 :- कौशल्य विकास विभागाच्यावतीने राज्यभर उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गरजू व होतकरु उमेदवारांनी सहभाग नोंदवण्यासाठी संपर्क साधावाअसे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रकैलाशनगरनांदेड येथील जिल्हा समन्वयक इरफान खानशुभम शेवनकर यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 02462- 251674 वर संपर्क साधावा. कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. काहीच्या नोकऱ्या गेल्या तर लघु आणि मध्यम व्यवसाय बंद झाले. यावर मात करण्यासाठी गरजु व होतकरु उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग व जिल्हा प्रशासन आणि युथ एड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ते जून (जिल्हा नांदेड) या कालावधीत उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

समाज कल्याण कार्यालयआंबेडकर भवन कामठा रोड नांदेड येथे सकाळी 10 ते दुपारी वाजेपर्यंत होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात महिला व युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊन तज्ज्ञ मंडळीकडुन उद्योगाबाबत मार्गदर्शन होणार आहे. यात व्यवसायाचे नियोजन करणे. योजनाची माहिती देणे. राज्य शासनांची ओळख करून देणे. त्यासाठी लागणाऱ्या अटींची पुर्तता करण्यासाठी मार्गदर्शन करणे. अर्थिक तसेच डिजिटल साक्षर करणे. व्यवसायाचे पर्याय सुचवणे. व्यवसायासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या संधीबाबत माहिती देणे. तसेच नवीन व्यावसायिकांना बीज भांडवल योजनेबाबत मार्गदर्शन करणे आदींचा समावेश आहे.

00000

 दारिद्रयरेषेखालील रेषेखालील वर्गाच्या विकासासाठी

मानव विकास कार्यक्रमाला पुरेसा निधी उपलब्ध

-  आयुक्त नितीन पाटील 

 

·        शेळीपालन, कोंबडीपालन, मत्स्यपालन यावर द्यावा भर

·        आठवी ते बारावीत शिकणाऱ्या दारिद्रयरेषेखालील मुलींसाठी सायकल

 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्रयरेषखालील लोकांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मानव विकास कार्यक्रम राबविला जात आहे. यात नांदेड जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहचवणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. पात्र लाभार्थ्यांच्या विकास कार्यक्रमासाठी कुठलीही निधीची कमतरता नसून या 9 तालुक्यात बचतगटांच्या माध्यमातून शेळीपालन, कोंबडी पालन, मत्स्यपालन यावर संबंधित विभाग प्रमुखांनी अधिकाधिक भर द्यावा, अशी सूचना मानव विकास आयुक्त नितीन पाटील यांनी दिल्या.   

 

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आज नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रम अंतर्गत हाती घेतलेल्या विविध योजनांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा नियोजन अधिकारी सु. आ. थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद बोधनकर, नाबार्डचे वरिष्‍ठ अधिकारी व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. कृषि, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, माविम, राज्य परिवहन महामंडळ यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मुलींच्या शिक्षणावर विशेष भर मानव विकास कार्यक्रमात देण्यात आलेला आहे. आठवी ते बारावी पर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती व दारिद्रयरेषेखालील मुलीला 5 किमी पर्यंत शाळेत पोहचण्यासाठी सायकल दिली जाते. या मुलीसह तिच्या घरच्यांनाही ही सायकल शाळेव्यतिरिक्तच्या वेळात वापरता येऊ शकते. इतर व्यवसाय जर असेल तर त्यालाही ही सायकल सहाय्यभूत होऊ शकते, असे नितीन पाटील यांनी स्पष्ट करून योजनांकडे पाहतांना व्यापकदृष्टिकोन बाळगला पाहिजे, असे सांगितले. पात्र मुलींनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे अगोदर अर्ज दिला पाहिजे. हा अर्ज शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांना सादर झाल्यानंतर त्याला मंजुरी दिल्या जाते, असे त्यांनी सांगितले.

 

उपरोक्त निर्देशाप्रमाणे गरोदर महिलांसाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत विशेष तरतूद करण्यात आली आहे. योजनेसाठी पात्र असलेल्या गरोदर महिलांना पहिल्यावेळेस केंद्र सरकारकडून मदत दिली जाते. यानंतर महिला गरोदर राहिल्यास त्यांना प्रत्येक वेळी त्यांना मानव विकास आयुक्तालयातर्फे 4 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. यातील 2 हजार रुपये गरोदर काळात व 2 हजार रुपये नंतर दिले जातात. संबंधित महिलांपर्यंत जवळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती पोहचविली पाहिजे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी यासाठी दक्षता घेतली पाहिजे. याचबरोबर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर याबाबत ठळक अक्षरात माहिती फलकही लावले पाहिजेत, अशा सूचना आयुक्त नितीन पाटील यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

 

मानव विकास आयुक्त कार्यालयाचा उद्देश हा मानव विकासाचा निर्देशांक वाढविण्यासाठी आहे. ज्या योजनांमधून हा निर्देशांक जर वाढला जाणार नसेल तर तशा योजना स्विकारल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेळी पालन, कोंबडी पालन, मत्स्यपालन मध्ये पशूसखी / सखा, मत्स्य, कुक्कुट यासाठीही मानव विकास निधी उपलब्ध करून देऊ शकेल. यासाठी किमान 100 शेळ्यांच्या वाटपामागे एक व्यक्तीसाठी एका वर्षाकरीता महिना 5 हजार रुपये प्रमाणे निधी उपलब्ध करून देता येईल. ही पशुसखी / सखा बचतगटांना शेळीपालनासाठी आवश्यक असलेल्या बाबींसाठी व व्यवसायवृद्धीसाठी मदत करेल, असे स्पष्ट केले.

00000   






Saturday, May 28, 2022

 जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री

ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांचा दौरा

 

नांदेड, (जिमाका) दि28 :- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

 

रविवार 29 मे 2022 रोजी वाशिम येथून शासकीय वाहनाने सायं 5.15 वा. हदगाव येथे आगमन. सायं 5.30 वा. हदगाव ते तामसा मोटार सायकल रॅली कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वा. तामसा येथे बेघर बेरोजगार मेळाव्यास उपस्थिती. रात्री 9 वा. तामसा येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण करतील.

00000

 नांदेडचा कायापालट करणाऱ्या विकास कामांचे

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भू‍मिपूजन 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- नांदेड महानगरातील वाढती लोकसंख्या, अपुरे पडणारे रस्ते व इतर आवश्यक सोई-सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केल्याप्रमाणे विविध विकास कामांचे आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन समारंभास आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, संतबाबा बलविंदरसिंघजी, डॉ. मिनलताई खतगावकर, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बसवराज पांढरे, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महावीर चौक, बर्की चौक, महाराणा प्रताप चौक सिडको, छावा चौक कौठा येथे भूमिपूजन करण्यात आले. लातूर फाटा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) ते ढवळे कॉर्नर व महाराणा प्रताप चौक सिडको ते हडको पाण्याची टाकी, उस्माननगररोड लिंक रस्त्याचे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगमस्थळाची सुधारणा केली जाणार आहे. रवीनगर चौक ते लातूर रोड पोलीस चौकी ते साई कमान ते वसरणी येथे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे, रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-मुथा चौक-महावीर चौक-गुरुद्वारा चौक (देनाबॅक चौक)-जुना मोंढा-बर्की चौक-पहेलवान टी हाऊस-देगलूरनाका येथे सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ-महात्मा गांधी पुतळा-फॉरेस्ट ऑफीस चौक-गुरुद्वारा गेट नंबर 1 ते रणजीतसिंह मार्के (स.भगतसिंग चौक)-केळी मार्केट चौक-कब्रस्तानच्या घर बाजूने उर्दू घरापर्यंत सी.सी. रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक-हिंगोली गेट आरोबी-यात्री निवास पोलीस चौकी-फॉरेस्ट ऑफीस ते महावीर चौक-मल्टीपर्पज हायस्कूल ते बंदाघाट लिंक सीसी रस्ते व नाली बांधकाम दुभाजकासह संगम स्थळाची सुधारणा करणे या कामांचा विकास कामात समावेश करण्यात आलेला आहे. या कामांमुळे नांदेडकरांच्या जनजीवनास व वाहतुकीस मोठा लाभ होईल.

000000




 कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद

 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- कोविड-19 मुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा कायदेशीर पालक अथवा दत्तक पालक यांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षणासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना जाहीर करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत अशा अनाथ मुलांच्या कल्याणासाठी व सर्वोत्कृष्ट हिताच्यादृष्टिने त्यांचे 23 वर्षे पूर्ण होई पर्यंत भारत सरकार संरक्षण करणार आहे. अशा बालकांना येत्या 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील इतर लाभधारकांसह ही 9 बालके कार्यक्रमास ऑनलाईन सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील विविध लाभार्थ्यांना ऑनलाईन संवाद साधणे सोईचे व्हावे यादृष्टिने डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहात विशेष तयारी करण्यात आली आहे.  

000000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...