Friday, March 16, 2018


मराठवाड्यात गारपिट आणि अवकाळी पावसाची शक्यता असल्याने
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी   

नांदेड, दि. 16:- येत्या 48 तासात मराठवाड्यात गारपिट आणि अवकाळी पावसाची दाट शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा संदेश भारतीय हवामान खाते यांच्याद्वारे कळविण्यात आलेले आहे. जिल्हा उपविभाग व तालुका ठिकाणी गारपिट / अवकाळी पाऊसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी आपल्या कापलेल्या व इतर पिकांची काळजी घ्यावी. नागरिकांनी / विद्यार्थ्यांनी विजा चमकत असतांना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. स्थानिय प्रशासनास सतर्क राहण्याचे तथा याबाबत वेळोवेळी कुठल्याही प्रकारची गरज पडल्यास जिल्हा प्रशासनाच्या वरीष्ठ कार्यालयांना विनाविलंब कळविण्याच्या सुचना आहेत. यासाठी दुरध्वनी क्रमांक 02462-235077 , फॅक्स क्रमांक 238500 टोल फ्री क्रमांक 1077 असा आहे.
0000000

जागतिक ग्राहक हक्क दिन

नांदेड, दि. 16:-  येथील जिल्हा पुरवठा कार्यालय व तहसील कार्यालय , नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागति‍क ग्राहक दिन तहसील कार्यालयात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष किशोरकुमार रं. देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासन , प्रादेशिक परिवहन विभाग, वजने व मापे विभाग, नांदेड गॅस व पेट्रोलपंप आदी विविध विभागाचे स्टॉलचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातील स्वामी विवेकानंद व बिंदू माधव जोशी यांचे प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी केले . यावेळी ग्राहक पंचायतचे ॲङ एस.आर. कमटलवार, बा. दा. जोशी, किशोर देवसरकर , श्री. बिलोलीकर , पुरुषोत्तम अतिलकंठवार यांनी आपले मनोगत व्यक्त या प्रसंगी ग्राहक पंचायतचे अरविंद बिडवई , बालाजी लांडगे , हर्षद शहा, येजगे लक्ष्मीकांत मुळे, श्रीमती सुषमा माढेकर , श्री. पांचाळ, गोवंदे कोत्तावार , दिगंबर शिंदे, अशोक पांपटवार , माधव अटकोरे , हुंडेगकरी पंढरीनाथ , गोविंद कोलम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे,  जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी राम बोरगावकर, नायब तहसीलदार विजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार जिल्हा पुरवठा तपासणी निरीक्षण अधिकारी राम बारगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीमती एम. डी. वांगीकर व प्रेमानंद लाठकर यांनी केले. यावेळी विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक बहुसंख्येने उपस्थित होते.
000000

पाण्याचे काटेकोर नियोजन करुन
योग्य पिकाची लागवड करणे गरजेचे
  --- पोपटराव पवार
  • जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
       
नांदेड, दि. 16:-   आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष मार्गदर्शक श्री. पोपटराव पवार यांनी विस्तृत मार्गदर्शन करताना भविष्यातील पाणी व पाण्याचे महत्व विशद केले. त्यांनी आपल्या भाषणात अनेक वैज्ञानिक व पोराणीक संदर्भ देत गावाचा कसा कायापालट केला व गांव दुष्काळ मुक्त करुन आर्थीक सुबत्ता आणली याबाबत मार्गदर्शन केले. जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत विविध कामे हाती घेऊन अनेक गावे दुष्काळमुक्त होत आहेत. परंतु सदरिल गावात पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे परत दुष्काळग्रस्त होत आहेत. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन करुन योग्य पिकाची लागवड करणे गरजेचे असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.
           
जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असुन या कार्यक्रमातन ग्रामीण भागाचा व शेतीचा कायापालट होणार असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी गावांनी पुढे येऊन गुणवत्तापुर्ण कामे करुन घेतली पाहिजे. अडवलेल्या, जिरवलेल्या पाण्याचा पुरेपुर वापर होण्यासाठी पिकाची रचना गावांने ठरवली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
            या कार्यशाळेत कृषि व पशुसंवर्धन सभापती तसेच मा.माधवराव पाटील शेळगावकर यांनीही विचार मांडले.   
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कुसूमताई चव्हाण सभागृह नांदेड येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यांत आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन हिवरेबाजारचे सरपंच तथा कार्यध्यक्ष आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे श्री. पोपटराव पवार हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख उपस्थित अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण, माधवराव पाटील शेळगावकर उपस्थित होते.   
            अध्यक्षीय समारोप जिल्हाधिकारी श्री. अरुण डोंगरे यांनी केला व जलयुक्त शिवार अभियानाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल व जिल्ह्यात हेअभियान चळवळीच्या स्वरुपात पुढे येऊन जिल्हा दुष्काळमुक्त होईल असेही त्यांनी सांगितले.
            किनवट येथील प्रकल्प अधिकारी श्री. कुंभारे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, लघुसिंचन जलसंधारण, पाटबंधारे, वनविभाग, सामाजिक वनिकरण, सरपंच, प्रगतशिल शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोट यांनी प्रास्तावीक केले. तर कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार प्रदर्शन भोकर तालुका कृषि अधिकारी  रमेश देशमुख यांनी केले.
****  


कौशल्य विकास व उद्योजकता
मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचा दौरा
नांदेड, दि. 16 :- राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 17 मार्च 2018 रोजी मुंबई येथून टुजेटच्या विमानाने दुपारी 2.20 वा. श्री गुरु गोविंदसिंघ विमानतळ नांदेड येथे आगनम व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.
00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...