Thursday, July 11, 2019

मराठवाड्यात 113 मि.मी. पावसाची नोंद सर्वाधिक औरंगाबादमध्ये तर सर्वात कमी बीडला



औरंगाबाद,दि. 11 (विमाका) :- औरंगाबाद विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात 10.53 मिलीमीटर पडल्याची नोंद झाली आहे. तर लातूर, जिल्ह्यात सर्वात कमी 0.03 मि.मी. नोंद झाली आहे. विभागात आज पर्यंतची पावसाची सरासरी 113.65 मि.मी. आहे. आजपर्यंत विभागात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 145.16 मि.मी. तर सर्वात कमी बीड जिल्ह्यात 89.37 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झली आहे.
विभागात आज नोंदला गेलेला जिल्हानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी दि.1 जून पासून आजवर पडलेल्या पावसाची सरासरी आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 27.10 (144.20), फुलंब्री 5.00 (205.75), पैठण 13.87 (67.97), सिल्लोड 0.00 (212.19), सोयगाव 10.67 (182.67), वैजापूर 10.00 (141.40), गंगापूर 24.89 (120.56), कन्नड 0.25 (129.75), खुलताबाद 3.00 (102.00). जिल्ह्यात एकूण 145.16 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 9.38 (100.44), बदनापूर 16.80 (140.80), भोकरदन 0.75 (235.88), जाफ्राबाद 0.00 (152.80), परतूर 11.50 (107.70), मंठा 6.25 (121.25), अंबड 15.57 (90.14), घनसावंगी 11.71 (96.00),. जिल्ह्यात एकूण 130.63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 4.38 (91.23), पालम 2.33 (88.33), पूर्णा 2.20 (102.40), गंगाखेड 1.25 (125.75), सोनपेठ 0.50 (118.00), सेलू 1.60 (64.80), पाथरी 6.00 (91.00), जिंतूर 0.00 (108.00), मानवत 9.00 (132.33), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 102.43 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 0.43 (123.29), कळमनुरी 0.17 (160.75), सेनगाव 0.67 (107.00), वसमत 2.57 (66.86), औंढा नागनाथ 0.00 (151.50). जिल्ह्यात एकूण 121.88 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 6.63 (88.30), मुदखेड 0.00 (116.00), अर्धापूर 3.67 (98.99), भोकर 1.00 (102.00), उमरी 1.67 (101.79), कंधार 0.00 (88.50), लोहा 0.68 (78.78), किनवट 4.00 (133.62), माहूर 0.00 (201.69), हदगाव 0.43 (117.71), हिमायत नगर 0.00 (100.33), देगलूर 0.00 (54.66), बिलोली 0.00 (97.40), धर्माबाद 0.00 (84.33), नायगाव 1.60 (96.00), मुखेड 0.00 (97.57), जिल्ह्यात एकूण 103.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 7.00 (99.18), पाटोदा 16.00 (128.75), आष्टी 5.43 (102.43), गेवराई 4.70 (66.20), शिरुर कासार 1.33 (68.67), वडवणी 3.50 (78.50), अंबाजोगाई 1.40 (66.60), माजलगाव 5.33 (114.67), केज 2.57 (95.71), धारुर 4.33 (95.00), परळी 2.60 (67.40), जिल्ह्यात एकूण 89.37 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 0.00 (99.50), औसा 0.00 (56.14), रेणापूर 0.00 (101.75), उदगीर 0.00 (93.29), अहमदपूर 0.33 (152.33), चाकुर 0.00 (85.60), जळकोट 0.00 (125.00), निलंगा 0.00 (101.00), देवणी 0.00 (134.33), शिरुर अनंतपाळ 0.00 (103.67), जिल्ह्यात एकूण 105.26 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 0.25 (100.25), तुळजापूर 1.14 (115.43), उमरगा 0.00 (142.60), लोहारा 2.00 (101.00), कळंब 0.33 (108.67), भूम 8.40 (112.20), वाशी 5.67 (136.00), परंडा 1.00 (70.80), जिल्ह्यात एकूण 110.87 मि.मी. पाऊस झाला आहे.
******

आदर्श ग्राम स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 20 जुलै



नांदेड दि. 11 :- नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियानांतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीना आदर्श ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासंदर्भात आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आदर्श ग्रामनिर्मितीसाठी महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन मिशनची स्थापना करण्यात आली होती. यातून राज्यात एक हजार गावे आदर्श करता यावी यासाठी या अभियानाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली होती. ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देऊन आदर्श ग्रामनिश्चितीचे ध्येय गाठण्यासाठी आदर्श ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
      या अभियानात समाविष्ठ असणाऱ्या ग्राम पंचायतींनी 20 जुलै 2019 पर्यंत ग्रामप्रस्ताव तालुका गट विकास अधिकारी यांना सादर करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या ग्रामपंचायतींनी परीशिष्ठ अ मध्ये नमूद निकषाप्रमाणे स्व: मुल्याकन करून सदर प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयास सादर करायचे आहेत. प्राप्त प्रस्तावापैकी सर्वात जास्त गुण मिळालेल्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींचे मुल्यांकन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हा मुल्यांकन समिती मार्फत होईल. सर्वाधिक गुण मिळालेल्या ग्रामपंचायतींना राज्यस्तरावर पाठविण्यात येईल. राज्यस्तरावर ग्रामपंचायतींचे अंतिम तपासणी व गुणांक  करून राज्यस्तरीय समारंभात रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. आदर्श ग्राम स्पर्धेत ग्राम सामजिक परिवर्तन अभियानात शासकीय योजनाचा कृतीसंगम करणारे अधिकारी कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद यांनी दिली आहे.  
000000

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांचा दौरा



नांदेड दि. 11 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 13 जुलै 2019 रोजी सिंदेवाही जि. चंद्रपूर येथून वाहनाने रात्री 11 वा. नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
रविवार 14 जुलै 2019 रोजी सकाळी 9 वा. नांदेड येथे आयोजित स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. नांदेड येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...