Wednesday, November 6, 2019


कर्करोगाबद्दलचे अज्ञान दूर करुन
आरोग्याची वेळेत तपासणी करा
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
       
नांदेड दि. 6 :- कर्करोगाला आळा घालण्यासाठी कर्करोग आजाराबद्दलचे अज्ञान दूर करुन प्रत्येक व्यक्तींनी वेळेत आरोग्याची तपासणी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.   
           नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत नागरिकांमध्ये कर्करोगाबद्दल जनजागृती व्हावी, नागरिकांच्या मनात कर्करोगाबद्दल असणारी भिती दूर होऊन नांदेड जिल्हा कर्करोग मुक्त व्हावा या उद्देशाने कर्करोग जनजागृती व नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कर्करोग निदान शिबीर व सर्वेक्षणात उत्कृष्ट काम केलेल्या आशा, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी यांचा सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते जिल्हा नियोजन भवन येथे आज सत्कार करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉ. नंदकुमार पानशे, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुरेश थोरात, श्री रेणुका देवी संस्थेचे चंद्रकांत भोपी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, कर्करोगाबद्दल मनातील भिती दूर करुन दुर्देवाने ज्या लोकांना कर्करोग झाला त्यांना त्वरीत प्राथमिक स्तरावर कर्करोगाचे निदान करुन त्यांच्यावर उपचार करण्यामध्ये जिल्ह्यातील सर्व आरोग्य आशाताईचा, आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. या उपक्रमात केलेले उत्कृष्ट काम जिल्हा कर्करोग मुक्त करण्यासाठी कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले.    
           
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे यांनी कर्करोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात 30 एप्रिल 2018 मध्ये संकल्प केला तो दिवस कर्करोग नियंत्रण दिवस म्हणून साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. जनजागृती व अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे कर्करोगावर मात केली जात आहे. वेळेत आरोग्य उपचार केल्यास कर्करोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा, कर्करोग प्रकल्पाचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात 30 आशा, 3 वैद्यकीय अधिकारी, 10 विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्यातील 12 तालुक्यात 25 कर्करोग निदान शिबीरे घेण्यात आली. त्यात 39 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 15 लाख 99 हजार 732 लोकसंख्या असलेल्या 3 लाख 61 हजार 22 घरांमध्ये आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. एकुण 25 कर्करोग निदान शिबिरात 9 हजार 634 रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 273 रुग्णांची पॅप स्मिअर चाचणी घेण्यात आली. असे एकुण 1 हजार 744 रुग्णांना नांदेड येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. कर्करोगाची संभावणा असलेल्या 950 रुग्णांना प्रतिबंधात्मक औषधोपचार करुन आरोग्य शिक्षण देण्यात आले. बारा तालुक्यात तोंडाचा कर्करोगाचे 23, स्थनाचे कर्करोग 6 व गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचे कर्करोग 11 असे 40 कर्करोग रुग्ण आढळून आले असून त्यांचा उपचार मोनार्क कॅन्सर हॉस्पिटल येथे चालू आहे. यापैकी बरेच रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. कर्करोग नसलेल्या स्तनाच्या गाठीचे 196 रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. माहुरे व श्रीमती दुलंगे यांनी केले. कर्करोग जिल्हा समन्वयक डॉ. जी. एच. वाडेकर यांनी शेवटी आभार मानले.
00000


नरसी येथील भूखंडांची सोडत संपन्न
म्हाडाच्या माध्यमातून सामान्यांना
स्वस्तात दर्जेदार घरे देणार
- सभापती संजय केणेकर
       
नांदेड दि. 6 :- बेघरांना घराची स्वप्नपूर्ती करुन देण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) माध्यमातून मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात सामान्यांना स्वस्तात दर्जेदार घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती औरंगाबाद म्हाडा विभागाचे सभापती संजय केणेकर यांनी दिली.
नायगाव तालुक्यातील नरसी येथील विकसीत भूंखडाची सोडत नांदेड शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आज पार पडली. जाहिरातीनुसार विविध उत्पन्न गटातील प्राप्त 55 अर्जापैकी 47 अर्जदार या सोडतीत यशस्वी झाले. याप्रसंगी सभापती संजय केणेकर बोलत होते.    
            यावेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, समाजकल्याणचे बापू दासरी, म्हाडाचे उपमुख्य अधिकारी श्री. नामेवार, मिळकत व्यवस्थापक श्री. गायकवाड, शाखा अभियंता दत्तात्रय लांबतुरे, नायब तहसिलदार श्री. वघवाड, नायब तहसिलदार मुगाजी काकडे, माध्यम प्रतिनिधी अभयकुमार दांडगे, शिवराज बिच्चेवार तसेच सोडतीस अर्ज केलेले बहूसंख्य अर्जदार उपस्थित होते.
म्हाडामार्फत राबविण्यात येत असलेल्या व राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन सभापती संजय केणेकर म्हणाले की, म्हाडा गरजू गरीबातील गरीब लोकांसाठी विविध योजनेतून दर्जेदार मुलभुत सुविधांसह स्वस्तात घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ना नफा ना तोटा या अर्थाने गरीबांच्या घरांची स्वप्नपूर्ती कशी होईल यासाठी प्रयत्न आहे. नांदेड शहरात जमीन उपलब्ध झाल्यास म्हाडाच्यावतीने विविध घटकातील नागरिकांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्यात येईल. महानगरपालिका, नगरपालिका व म्हाडा यांनी संयुक्तपणे घरकुलासाठी काम केल्यास नागरी भागात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. म्हाडामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन अधिकृत घरे निर्माण केली जात आहे. हे काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न असून पुढील काळात नागरी भागात यामुळे अनाधिकृत वस्त्या वाढणार नाहीत, असेही ते म्हणाले.
यावेळी सभापती संजय केणेकर यांनी पत्रकारांसाठी म्हाडाच्या योजनेविषयी सविस्तर माहिती देवून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली व म्हाडा जास्तीतजास्त घरे बांधण्यासाठी कटिबध्द असल्याचे नमुद केले.
औरंगाबाद म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी मंडळामार्फत राबविण्यात आलेल्या व भूसंपादनाबाबत संक्षिप्त माहिती देवून अर्जदारांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले.  
            सोडत यशस्वितेसाठी सर्वश्री. ढोले, ढगे, अरशद शेख, बाबळसुरे, ठोबंरे, दुडकीकर, ताटे, पी.एन. शेख आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन श्री. रावळे यांनी केले. 
00000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...