Friday, April 27, 2018


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शुक्रवार 27 एप्रिल 2018 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा शुक्रवार 27 एप्रिल 2018 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 26 मे 2018 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 
00000


प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजना
लाभासाठी ग्रामसभेत उपस्थित राहून
माहिती संकलीत करण्यास सहाय्य करावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 27 :- प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभासाठी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेत उपस्थित राहून माहिती संकलीत करण्यास सहाय्य करावे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
जिल्ह्यात प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन राबविण्यात येत आहे. देशातील 10 कोटी कुंटुंबाना (50 कोटी लाभार्थी ) आरोग्य संरक्षण पुरविण्याचा भारत सरकारच्या नियोजनांतर्गत आरोग्य हे देशातील धोरण व राजकीय परिसंवादाचा मुख्य टप्पा बनला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी लाभार्थ्यापर्यंत परिणामकारकरितीने पोहचणे आणि त्यांना योजनेचा तपशीलाविषयी माहिती देणे अत्यावश्यक आहे. याशिवाय योजना परिणामकारक राबविण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांची काही अतिरिक्त माहिती जमा करणे आवश्यक आहे.  त्याकरीता पहिली पायरी म्हणून आयुष्यमान भारत दिवस देशभरात 30 एप्रिल 2018 रोजी आयोजित होत असलेल्या ग्राम स्वराज्य अभियानादरम्यान लाभार्थी पडताळणी, अतिरिक्त माहिती जमा मोहिम सुरु करण्यात येत आहे.
या मोहिमेची दोन उद्दीष्टे असून पहिले उद्दीष्टे कार्यक्रमाविषयी त्याच्या लाभाबद्दल पात्र लाभार्थ्यांना माहिती देणे, दुसरे उद्दीष्टे विद्यमान लाभार्थ्यांच्या यादीचे प्रमाणीकरण आणि जेथे ग्रामसेवक, आशा आणि एएनएम यांच्या माध्यमातून अतिरिक्त माहिती जमा करणे. या योजनेंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम 15 एप्रिल ते 21 मे 2018 या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
अतिरिक्त माहिती संकलन मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची पुढील बाबीवरील माहिती घेण्यात येणार आहे. मोबाईल व शिधापत्रिका क्रमांक, कुटुंबाच्या सदस्य स्थितीमधील बदल. या ग्रामसभेमध्ये याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यात येणार आहे. ग्रामसभेमध्ये उपस्थित न राहणाऱ्या कुटुंबाची माहिती आशा, आरोग्य सेविकाद्वारे गृहभेटी देऊन 1 ते 8 मे 2018 या कालावधीत संकलीत केली जाणार आहे. ही माहिती संकलीत करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती यांची प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
संकलित केलेली माहिती 8 ते 21 मे 2018 या कालावधीत वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे. लाभार्थी यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रती वर्षे 5 लाख रुपये इतके आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. नागरिकांनी सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी ग्रामसभेला उपस्थित राहून माहिती संकलित करण्यास सहाय्य करावे. त्यामुळे जास्तीतजास्त कुटुंबाना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशन योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना देशभरात कोणत्याही अंगिकृत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत विनामुल्य शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे, असेही आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
00000



पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा 
नांदेड, दि. 27 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 30 एप्रिल 2018 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. खरीप हंगाम आढावा बैठक स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.  रात्री नांदेड येथे राखीव व मुक्काम.
मंगळवार 1 मे 2018 रोजी सकाळी 8 वा. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.45 वा. नांदेड येथुन परभणीकडे प्रयाण करतील.
00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...