Tuesday, March 8, 2022

 पक्क्या लायसन्ससाठी

सुट्टीच्या दिवशी अनुज्ञप्ती चाचणी

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- Faceless लायसन्सच्या सुविधेमुळे पक्क्या लायसन्सची चाचणी देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पक्क्या लायसन्ससाठी Appointment मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी 12 26 मार्च 2022 रोजी सुट्टीच्या दिवशी अनुज्ञप्ती चाचणीसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता Appointment बुधवार 9 मार्च 2022 रोजी कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येईल. इच्छुक अर्जदारांनी उपलब्ध Appointment घेऊन कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह पक्के अनुज्ञप्ती चाचणी देण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 विभागीय कृषि सहसंचालक यांनी

घेतला कृषि विभागाचा आढावा  

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक लातूरचे विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी नांदेड येथील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात नुकतीच घेतली. या बैठकीत एमआयडीएच, आर.के.व्ही.वाय, कृषि यांत्रिकीकरण, ठिबक-तुषार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य, गळीतधान्य या विविध योजनांचा खर्चाबाबतचा आढावा त्यांनी घेतला. शेतकऱ्यांना / लाभार्थ्यांना वेळीच अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा, उपविभाग तालुका व मंडळ स्तरावर जी मोकातपासणी, खर्च प्रकरणे निकाली काढावयाचे प्रलंबित आहेत ती प्रकरणे तातडीने निकाली काढावेत, असे निर्देश विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी दिले.

 

या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि उपसंचालक श्रीमती माधुरी सोनवणे,   उपविभागीय कृषि अधिकारी रविकुमार सुखदेव, उपविभागीय कृषि अधिकारी डी. एम. तपासकर, एस. बी. शितोळे, तंत्र अधिकारी उल्हास रक्षे, जिल्ह्यातील सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.

 

तसेच खत वितरक कंपनीचे प्रतिनिधी, संघटनेचे प्रतिनिधींची बैठक श्री. दिवेकर यांनी घेतली. खरीप हंगामासाठी खते व बियाण्यांच्या नियोजनाच्या पूर्व तयारीचा आढावा घेऊन त्यांनी उपयुक्त सूचना केल्या. या बैठकीस कृषि विभागातील अधिकाऱ्यांसह, विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक श्री. भोर, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक बी. बी. गिरी, खत वितरक कंपनीचे नामदेव भुदाडे, सचीन घाडगे, केदार काचावार,स्वप्नील संसारे, घोडके तसेच सीडस फर्टीलायझर, किटक असोसीएशन नांदेडचे अध्यक्ष मधुकर मामडे व इतर प्रतिनीधी शिवा मुरगवार, संजय सारडा हे उपस्थित होते.

000000



 जागतिक महिला दिनानिमित्त

भूमि अभिलेख कार्यालयातील महिलांचा गौरव 


·         स्वामीत्व योजनेअंतर्गत महिलांच्या नावे असलेल्या मिळकतीच्या सनदचे वितरण 


नांदेड (जिमाका) दि. 8 :- महिला सक्षमीकरण कार्यक्रम व प्रशिक्षणाचे (स्वामीत्व कामाचे प्रशिक्षण व सनद वाटप) आयोजन भूमि अभिलेख विभागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनानिमित्त आज जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामीत्व योजनेअंतंर्गत मौजे पोखर्णी, वाणेगाव, दर्यापुर व थुगाव या गावातील तयार झालेल्या महिलांच्या नावे असलेल्या मिळकतीच्या सनदचे वितरीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया, उपअधीक्षक भूमि अभिलेख एन. आर. उंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

महिलांचे आरोग्य, महिला विषयक कायदे व अर्थिक बचत याबाबत डॉ. निलेश बास्टेवाड, ॲड. छाया कुलकर्णी, प्रवीण पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात भूमि अभिलेख विभागातील महिला कर्मचाऱ्यांना विभागातील विविध विषयांचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात भूमि अभिलेख कार्यालयातील   एन. एच. पिंपळगावकर, मो. जाकीर, यु. जे. गुंडाळे, ऐ. के. ढाके, एस. जी. सुर्यवंशी, के. एस. कांबळे, ए. क. झरकर, श्रीमती एस. व्हि. तोटावार यांनी मार्गदर्शन केले. जिल्हयातील भूमि अभिलेख कार्यालयातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील श्री. नलमेलवार, श्री. दळवे, श्री. इंगळे आदींनी सहभाग घेतला. यावेळी जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार  श्रीमती के. जी. कुलकर्णी यांनी मानले.

00000



 स्वतःच्या जिद्दीने कष्टातून आपली ओळख निर्माण करा

-         जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  महिलांनी आपल्या अंगी असलेल्या क्षमता ओळखून स्वतःच्या जिद्दीने कष्टातून आपली ओळख निर्माण करावी. कामातले आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले तर आपण सहज यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. 

येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे आयोजित महिला दिनाच्या  कार्यक्रमात त्या प्रमुख व्याख्याता म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे होते. यावेळी संस्थेचे उपप्राचार्य पी. डी. पोफळे, संस्थेतील महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष्या डॉ. ए.  ए. जोशी,  प्रबंधक श्रीमती ए. व्ही. कदम, जिमखाना उपाध्यक्ष डी. एम. लोकमनवार आदींची उपस्थिती होती. 

जिद्द व चिकाटी असल्यास सामान्य घरातील मुलीही प्रगतीचे शिखरे सहज प्राप्त करू शकतात. तंत्रशिक्षण घेऊन भविष्यात घरी न बसता आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.   

महिला दिनाला एक समारंभ म्हणून न बघता भरीव कार्य महिला  दिनाच्या अनुषंगाने महिलांकडून होणे आवश्यक आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त कार्यक्षम असतात. आपली शक्ती महिलांनी ओळखावी असे सांगून यावर्षीच्या जागतिक महिला दिनाचे यूएनओच्या थिमचे स्पष्टीकरण संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी सांगितले. 

महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष डॉ. ए. ए. जोशी यांनी हेमंत परिहार यांची  कविता सादर केली. श्रीमती एस एस भोकरे यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे महत्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन श्रीमती आर. के. देवशी यांनी केले  तर आभार प्रबंधक श्रीमती कदम यांनी मानले.यावेळी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा  तसेच संस्था स्तरावरील भारतीय प्रतिभावंत महिला यांच्यावरील प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम क्रमांक तानीया मोतिवाल व अक्षदा झींझुरडे तर द्वितीय क्रमांक वैभवी कोच्रे यांना देण्यात आला. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. आर. मुधोळकर, एस. ए. नरवाडे, ए. एन. यादव, के. एस. कळसकर, श्रीमती एस. जी. दूटाळ, श्रीमती व्ही. एम. नागलवार, डॉ. एस. व्ही. बिट्टेगिरी, श्रीमती ए. ए. सायर, श्रीमती पी. बी. खेडकर, श्रीमती एस. एस. गाडे, श्रीमती ए. जी. रामपुरे, श्रीमती एस. एच. भोकरे, श्रीमती ए. रा. साळुंके, श्रीमती एस. बी. मेहत्रे, श्रीमती बी. आर. कोळी, श्रीमती जे. जी. मुंढे, श्रीमती ए. ए. वाघमारे, श्री. पोहरे, श्री. बोडेवर, श्री. पावडे, श्रीमती ए. ब. रत्नपारखी, श्री हुरडुके यांनी प्रयत्न केले.

00000




 कृषि क्षेत्रात महिलांचा सहभाग महत्वाचा

-         जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  कृषिक्षेत्रामध्ये महिलांचे वाढते प्रमाण तसेच शेतीकामातील त्यांचा सहभाग हा महत्वाचा आहे. त्यांच्या कष्टाशिवाय शेतीची कामे अपूर्ण आहेत. महिलांनी कोणतीही मनात भिती न बाळगता पुढे येऊन हिरीरीने कामे करावेत. यातूनच महिलांचे अस्तित्व टिकवून ठेवता येते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. 

जागतिक महिला दिन व भारतीय स्वतंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कृषि विभागामार्फत विशेष उल्लेखनिय कामगिरी केलेल्या शेतकरी महिला, शेतमजूर, उद्योजक व कृषि विभागातील महिला अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम हॉटेल तुलसी कंम्फर्ट नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विपीन इटनकर, शास्त्रज्ञ  श्रीमती नादरे  डॉ. देविकांत देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर .बी. चलवदे, प्रगतीशील महिला शेतकरी, शेत मजूर, महिला शेतकरीगटाचे प्रतिनिधी, महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदींची उपस्थिती होती. 

जास्तीत जास्त महिलांनी एकत्र येऊन गट व कंपनी स्थापन करून कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. कृषि पुरक उद्योगांत देखील महिलांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा याबाबत शासन तत्पर आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.  

सद्यस्थितीत कृषि विभागाने विविध योजनांद्वारे शेतकरी महिलांना लाभ देऊन त्यांना प्रोत्साहित केल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी सांगितले. महिला सशक्तीकरणाबाबत श्रीमती नादरे यांनी मार्गदर्शन केले. महिला गट तयार करुन शासकीय योजनेचा लाभ घेण्याबाबत प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्रीमती एम.आर. सोनवणे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित प्रगतीशील महिला व शेतकरी गट प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रगतीशील महिला, शेतकरी, शेत मजूर व कृषि विभागातील कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करुन त्यांचा सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन कृषि सहाय्यक शिवकुमारी देशमुख यांनी केले.  

00000



 कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासमवेत

महिलांनी  आरोग्याची काळजी घेणे गरजेचे

 - डॉ. प्रणद जोशी 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रीला अनेक जबाबदारीला सामोरे जावे  लागत आहे. घर आणि ऑफिस साभाळतांना  स्त्रीला तारेवरची कसरत करावी  लागते. पण हे करीत असतांना स्त्री स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत नाही. कामाच्या जबाबदारी समवेत महिलांनी आता आरोग्याचीही तेवढीच काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. प्रणद जोशी  यांनी केले. 

महसूल आणि वन विभाग यांच्यावतीने आज जागतिक महिला दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी स्त्री आणि मानसिक ताणतणाव याविषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे तसेच महसूल विभागातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

आज सर्वांना कोणत्या ना कोणत्या कामातून मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. याचा परिणाम माणसाच्या शरीरावर आणि मनावरसुद्ध वेगाने होताना दिसत आहेत. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, लठ्ठपणा याचबरोबरच डिप्रेशन, अँक्झायटी यासारखे मानसिक आजार वाढीला लागले आहेत. हा मानसिक ताणतणाव कमी करण्याची गरज असून त्यासाठी आपण वेळात वेळ काढुन छंदाची जोपासणा करावी. शाश्वत बदल होत असतांना महिलांना कुटुंबाला वेळ देणे कठिण झाले आहे. स्त्रीयांनी येणाऱ्या  मानसिक ताण तणावाला दूर करून रोज स्वत:साठी वेळ काढणे खूप गरजेचे आहे. यासाठी नियमित व्यायामासह मोबाईलचा कमीतकमी वापर करून आवश्यक तेवढा स्वत: वेळ देऊन आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रणद जोशी  यांनी सांगितले.  

प्रत्येक दिवस हा महिला दिवस राहिला पाहिजे. महिला सबलीकरणासोबत त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन येथे हिरकणी कक्ष आणि अंगणवाडी कक्ष लवकरच तयार केला जाईल. ज्या महिलांचे मुल लहान असेल त्यांना हिरकणी कक्षात दिवसभर ठेवण्याची व्यवस्था असेल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.    

महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी समाजात अनेक चळवळी राबविल्या गेल्या आहेत. महिलांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. आपल्या हक्काप्रती महिलांनी सदैव जागृत असणे गरजेचे आहे, असे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. ज्या घरात स्त्रीचा आदर आणि सन्मान होतो, तो राष्ट्र आणि देश सुध्दा विकसित होते. स्त्री भृणहत्या  हुंडाबळी, लैगिंक हत्याचार, सायबर क्राईम यासारख्या घटनांना महिलांना सामोरे जाऊ लागू नये यासाठी महिलांनी सतत जागृत असणे गरजेचे आहे. स्त्रीयांना कायदेविषयक ज्ञान असणेही तेवढेच गरजेचे आहे, असे मत उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे त्यांनी व्यक्त केले.

यावेळी महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेकडून सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या सत्कार करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांवर अधारित प्रश्नावली, एक मिनिट खेळ, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजूषा भगत यांनी केले तर आभार मिना सोलापुरे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

000000




  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...