Saturday, January 4, 2020


दि. 5जानेवारी2020
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. 5 :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंहकोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे.
मंत्र्यांची खातेनिहाय यादी

मंत्री


1.      
श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री
सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती


2.     
श्री.अजित अनंतराव पवार,उप मुख्यमंत्री

वित्त, नियोजन


3.     
श्री.सुभाष राजाराम देसाई
उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा


4.    
श्री.अशोक शंकरराव चव्हाण
सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)


5.     
श्री.छगन चंद्रकांत भुजबळ
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण


6.     
श्री. दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील
कामगार, राज्य उत्पादन शुल्क



7.    
श्री.जयंत राजाराम पाटील

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास

8.     
श्री. नवाब  मोहम्मद इस्लाम मलिक
अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता


9.      
श्री.अनिल वसंतराव देशमुख

गृह

10. 
श्री.विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
महसूल

11.  
श्री.राजेंद्र भास्करराव शिंगणे

अन्न व औषध प्रशासन

12.                         
श्री. राजेश अंकुशराव टोपे
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण


13.                         
श्री. हसन मियालाल मुश्रीफ

ग्राम विकास

14.                       
डॉ.नितीन काशिनाथ राऊत

ऊर्जा

15.                        
श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

शालेय शिक्षण

16.                         
डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड
गृहनिर्माण


17.                        
श्री.एकनाथ संभाजी शिंदे
नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)


18.                        
श्री. सुनिल छत्रपाल केदार
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण


19. 
श्री. विजय वडेट्टीवार
इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन

20.                        
श्री. अमित विलासराव देशमुख

वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

21.                         
श्री.उदय रविंद्र सामंत
उच्च व तंत्र शिक्षण


22.                        
श्री.दादाजी दगडू भुसे
कृषि, माजी सैनिक कल्याण


23.                        
श्री.संजय दुलिचंद राठोड
वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन


24.                      
श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील

पाणी पुरवठा व स्वच्छता

25.                       
ॲड. के.सी. पाडवी
आदिवासी विकास


26.                        
श्री. संदिपानराव आसाराम भुमरे

रोजगार हमी, फलोत्पादन

27.                       
श्री. बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील

सहकार, पणन

28.                       
ॲड. अनिल दत्तात्रय परब
परिवहन, संसदीय कार्य


29.                        
श्री. अस्लम रमजान अली शेख
वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास


30.                        
ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने)

महिला व बालविकास

31.                         
श्री.शंकराराव यशवंतराव गडाख


मृद व जलसंधारण

32.                        
श्री.धनंजन पंडितराव मुंडे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य


33.                        
श्री. आदित्य उद्धव ठाकरे
पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार




राज्यमंत्री


1.      
श्री. अब्दुल नबी सत्तार
महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

2.     
श्री. सतेज उर्फ बंटी डी. पाटील
गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

3.     
श्री. शंभुराज शिवाजीराव  देसाई
गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

4.    
श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

5.     
श्री. दत्तात्रय विठोबा भरणे
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

6.     
डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

7.    
श्री. राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

8.     
श्री. संजय बाबुराव बनसोडे
पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

9.      
श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे
नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

10. 
श्रीमती आदिती सुनिल तटकरे
उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजनेसाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे  
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
कर्जमुक्ती योजने संदर्भात तांत्रीक मार्गदर्शन संपन्न
नांदेड, दि. 4 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जखात्यातील 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा दिलासा देण्यासाठी बँकांसह जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन सभागृहात आज महसुल, कृषी, सहकार व बॅंकांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांची बैठक आयोजीत केली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री डोंगरे बोलत होते.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा अग्रणी बॅंकेच व्यवस्थापक दिपक चव्हाण यांच्यासह सर्व उपविभागीय अधीकारी, तहसीलदार, तालुका सहनिबंधक, तालुका कृषी अधिकारी, सर्व बॅंकांचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री डोंगरे म्हणाले, राज्य शासनाची महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कालबध्द पद्धतीने राबवुन पात्र लाभार्थ्यांना मुदतीत लाभ देण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अडचणी न ठेवता सुटसुटीतपणा ठेवला आहे. येत्या 7 जानेवारी रोजी आधारलिंक नसलेले बॅंक खाते निवडुन ते आधारला जोडण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रीया 31 मे पर्यंत पूर्ण करायची आहे. यानंतर जुनमध्ये शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटप होईल. तालुकास्तरावर तहसीलदार, कृषी अधिकारी, सहायक निबंधक व गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वयातुन कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करावी, असे ते म्हणाले.
जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी कर्जमुक्ती योजनेविषयी तांत्रीक मुद्यांची माहिती पीपीटीच्या माध्यमातुन सविस्तर दिली. श्री. फडणीस म्हणाले, ही कर्जमुक्ती योजना वेळेत पुर्ण करायची आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्यांकडील 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांचे अल्प / अत्यल्प भूधारक याप्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्जखात्यात 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे, पुनर्गठन / फेरपुनर्गठनकरुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात 30 सप्टेंबर 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. अपात्रतेचे निकषाची माहिती सांगुन या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांची सहमती आवश्यक
कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांची सहमती यावेळी घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा आधार क्रमांक चुकला किंवा त्यांच्या खात्याची रक्कम चुकीची आली तर ते शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणुन देण्यात येणार आहे. यात पात्र शेतकऱ्यांची काही हरकत नसल्यास त्यांच्या हाताच्या बोटाचा ठसा घेवून त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. तसेच हरकत असलेल्या खात्याबाबत तालुका तसेच जिल्हा स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.
बॅंकांनी शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे
शासनानचे धोरण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आहे. दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती मिळणार असल्याने बॅंकांचीही वसुली होणार आहे. यामुळे बॅंकांनी थोड्या-थोडक्या रक्कमेचा विचार न करता बॅंकांनी कर्जमुक्तीबाबत व्यवसायीक धोरण ठेवून याकडे पाहावे. बॅंकांच्या सहकार्याशिवाय कर्जमाफी योजना यशस्वी होणार नाही, असे सांगत बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे. तसेच त्यांचे मत जाणुन त्यांचे समाधान करावे, असा सल्ला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बॅंक अधिकाऱ्यांना दिला.  
000000

  वृत्त क्र.   389   लोकसभा निवडणुकीसाठी आज नांदेड जिल् ‍ ह्यात मतदान   प्रशासन सज् ‍ ज ; मोठ्या संख् ‍ येने मतदान करण् ‍ याचे ...