Tuesday, December 12, 2017


किनवट नगरपरिषद मतदान, मतमोजणी
केंद्र परिसरात 144 कलम लागू
 नांदेड दि. 12 :- जिल्ह्यातील किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक हद्दीतील मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात बुधवार 13 डिसेंबर रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत व मतमोजणीच्या दिवशी जिल्हा परिषद मुलांची शाळा साईनगर, किनवट या मतमोजणी केंद्र परिसरात गुरुवार 14 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत प्रतिबंधीत आदेश जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी काढले आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील किनवट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी बुधवार 13 डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून तसेच गुरुवार 14 डिसेंबर 2017 रोजी जिल्हा परिषद मुलांची शाळा, साईनगर किनवट या मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात नमुद केले आहे.

00000
कर्जमाफी दिल्याबद्दल पिंपळगावात   
शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता  

नांदेड दि. 12 :- राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी दिल्याबद्दल नांदेड तालुक्यातील पिंपळगाव (निमजे) येथील शेतकऱ्यांनी राज्य सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन अभिनंदन केले.
कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न राज्य सरकाने केला आहे. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजे या गावातील शेतकरी विठ्ठल गंगाराम डक, गंगाधर धर्माजी डक कर्जदाराची पत्नी श्रीमती ताराबाई गंगाधर डक, रामजी सिताराम डक (निधन) यांचा मुलगा माधव रामजी डक, मधुकर व्यंकटराव पुंड यांची पत्नी श्रीमती सुनिता मधुकर पुंड , पार्वतीबाई शंकरराव डक, दिलीप व्यंकटराव पुंड यांचे भाऊ प्रतापराव पुंड यांची मुलाखत घेण्यात आली.  
श्रीमती सुनिता पुंड यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेडून 40 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज शासनाकडून पूर्णपणे माफ झाल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त केले. सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रतापराव पुंड यांनी सेवा सहकारी सोसायटीचे 30 लाभार्थी असून  20 शेतकऱ्यांचे 25 टक्के कर्ज  माफ झाले असून तर 10 सभासदांना पूर्ण कर्ज माफी मिळाली आहे.  कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र व नवीन कर्ज मिळणार असून सावकारी, आडतीवर पैसे उचलण्याची आता गरज राहिली नाही. त्यांना कोणत्याही बँकेकडून शेतीसाठी कर्ज  मिळू शकते. ही कर्ज माफी दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
श्रीमती ताराबाई डक यांनी 40 हजार रुपयाचे तर गंगाधर डक यांनी 35 हजार रुपयाचे कर्ज सहकारी सोसायटी नवा मोंढा नांदेड यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. परंतु, शेतीच्या नापिकीमुळे हे कर्ज भरु शकलो नाही. राज्य शासनाकडून झालेल्या कर्जमाफीमुळे आम्हा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले.
विठ्ठल डक या शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून 40 हजार कर्ज घेतले होते त्यापैकी 25 हजारांचे कर्ज शासनाकडून माफ झाल्याचे सांगितले. मागील तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थती असल्याने शेतकरी अडचणीत होता. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज माफी झाल्याने शेतकरी आनंदी असल्याचेही यावेळी ते म्हणाले. रामजी डक यांनी 9 हजार रुपये कर्ज घेतेले होते. माधव रामजी डक (मुलगा) यांनी माझ्या वडिलांनी घेतलेले कर्ज शासनाने माफ केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

 0000000
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत
नांदेड जिल्ह्यातील 83 हजार 950 शेतकऱ्यांना
396 कोटी 42 लाख रुपयांची कर्जमाफी  
 नांदेड दि. 12 :- राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय घेऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजारापर्यंत तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यास शासन प्रयत्नशील आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 83 हजार  950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी 42 लाख 16 हजार 887 रुपये जमा केले आहेत. जिल्ह्यात डिसेंबर 2017 पासून प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून ती आता पुर्णत्वाच्या टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रवीण फडणीस यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 11 डिसेंबर 2017 अखेर 2 हजार 331 शेतकऱ्यांच्या खात्यात 7 कोटी 6 लाख 22 हजार 986 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर प्रोत्साहनपर लाभ स्वरुपात 24 हजार 380 शेतकऱ्यांच्या खात्यात 30 कोटी 13 लाख 93 हजार 901 रुपये जमा करण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील व्यापारी, राष्ट्रीयकृत / ग्रामीण बँकांकडून 11 डिसेंबर 2017 अखेर 57 हजार 239 शेतकऱ्यांच्या खात्यात  359 कोटी 21 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे  नांदेड जिल्ह्यात एकूण 83 हजार  950 शेतकऱ्यांच्या खात्यात 396 कोटी 42 लाख 16 हजार 887 रुपये जमा केले आहेत.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्रशासन बँक स्तरावरुन कर्जाची माहिती लेखापरीक्षण करुन माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट बँकांना देण्यात आली आहे. या यादीनुसार बँकेमार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी प्रोत्साहनपर लाभाची रक्कम हस्तांतरीत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रोत्साहनपर रकमेचा लाभ बँकेकडून प्रत्यक्ष दिला जात आहे त्यांना बँकेमार्फत शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीद्वारे एसएमएस संदेश पाठविण्यात येणार आहेत.
            ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना किंवा बँकांकडून कर्जाबाबत माहिती भरताना काही त्रुटी राहिल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या माहितीची दुरुस्ती तालुकास्तरीय समितीकडून करण्यात येत असून उर्वरीत सर्व पात्र शेतकरी या योजनेपासून वंची राहणार नाही तसेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रशासनाकडून पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे, असेही जिल्हा उपनिबंधक  श्री. फडणीस यांनी सांगितले आहे.

00000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...