Monday, March 6, 2017

     वंचिताना अन्नसुरक्षा देणाऱ्या नांदेडच्या
         उपक्रमास राष्ट्रपती भवनात कौतुकाची दाद
नांदेड दि. 6 :- वंचितांना जगण्याची उमेद देणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या अन्न सुरक्षा प्रयत्नाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा विभागातर्फे समाजातील वंचित घटकांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये या घटकांना दोन रास्त भाव धान्य दुकानासह शिधापत्रिकांचेही वाटप करण्यात आले होते. या जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या संवेदनशील उपक्रमाबाबत सादरीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निमंत्रीत करण्यात आले होते.
त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर , सहाय्यक पुरवठा अधिकारी मुगाजी काकडे यांनी आज राष्ट्रपती भवन येथे सादरीकरण केले. त्याला उपस्थित मान्यवरांनी कौतुकभरली दाद दिली.
जिल्हा पुरवठा विभागाने पुरवठा अधिकारी श्री. वेणीकर यांच्या कल्पकतेतून वंचितांना अन्न धान्य पुरवठ्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार समाजातील अपंग, विधवा, निराधार, कचरा वेचणारे आदींसह अनेक असे घटक ज्यांच्याकडे शिधापत्रिका व शासकीय लाभ घेण्यासाठीची आवश्यक कागदपत्रेही नाहीत त्यांना विशेष बाब म्हणून या योजनेत समाविष्ट करण्यात आले. यामुळे सुमारे 10 हजाराहून अधिक वंचितांना आता स्वस्त धान्याचा नियमित पुरवठा सुरु झाला आहे. ऑगस्ट 2016 मध्ये या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला होता. या उपक्रमाची प्रधानमंत्री कार्यालयाने नोंद घेतली होती व त्याबाबत आवश्यक तपशीलही मागविले होते. देशभरातून मागविण्यात आलेल्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये नांदेडच्या वंचितांसाठीच्या या संवेदनशील उपक्रमाने स्थान पटकाविले. या साठहून अधिक प्रकल्प-उपक्रमांचे आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात विविध मान्यवर-तज्ज्ञांसमोर सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्यासह श्री. वेणीकर व श्री. काकडे यांनी प्रभावी सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या हा संवेदनशील उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण आणि कौतुकास्पद ठरला. राष्ट्रीयस्तरावर शासकीय यंत्रणेतील मानवी आस्थेचा चेहरा असणारा उपक्रम म्हणून महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्याया एकमेव उपक्रमास सादरीकरणातही दाद मिळाली. सादरीकरणासाठी उपस्थित शास्त्रज्ज्ञांनी ज्यामध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो)चे अध्यक्ष ए. एस. किरणकूमार, ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॅा. रघुनाथ माशेलकर यांच्यासह इंडोनेशिया, आस्ट्रेलिया देशातील शास्त्रज्ज्ञांचा आदींचा समावेश होता. या सर्वांनीच नांदेडच्या या उपक्रमाचा मानवी आस्थेशी निगडीत महत्त्वपुर्ण उपक्रम असल्याचे नमूद केले. या सादरीकरणात महामहिम राष्ट्रपतीं समवेत रात्रीभोजसाठीही सन्मानपुर्वक निमंत्रीत करण्यात आले. त्यावेळी सादरीकरणासाठी उपस्थित मान्यवरांनी नांदेडच्या संवेदनशील उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढले. शासकीय यंत्रणेकडून लोकाभिमुखतेचा आणि प्रशासकीय कार्यवाहीत मानवी आस्था जपण्याचा हा उपक्रम स्त्युत्य असल्याचा आणि त्यामध्ये पुढेही अशीच वाटचाल करता येईल, असे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्याची माहिती, प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिली.

0000000
  नांदेड तहसिल येथे आज
ग्राहक मार्गदर्शन मेगा शिबीर
नांदेड दि. 6 :- जिल्हा ग्राहक संरक्षण अंतर्गत भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था मुंबई यांच्या मार्फत ग्राहकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवार 7 मार्च 2017 रोजी तहसिल कार्यालय नांदेड येथे सकाळी 10 वा. करण्यात आले आहे.
या शिबिरास ग्राहकांना दुध, अन्नपदार्थ यामध्ये असलेली भेसळ, वजनमापातील फरक, ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रारींचे निराकरण, हुशार गुंतवणुकदार कसे बनावे, दुरसंचार सेवा, बांधकाम, व्यावसायिकांविरुद्धच्या तक्रारी इत्यादी बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमास भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेचे सहसचिव दिनेश भंडारे व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत.
नागरिक व ग्राहकांनी मंगळवार 7 मार्च रोजी साजरा होणाऱ्या मार्गदर्शन शिबिराच्या कार्यक्रमास तहसिल कार्यालय नांदेड येथील बैठक हॉल येथे सकाळी 10 वा. उपस्थित रहावे , असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000000
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण
पुरस्कारासाठी अर्ज मागविले
नांदेड दि. 6 :-  दलित समाजाच्या उद्धारासाठी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांसाठी शासनाने सन 2017-18 करीता नांदेड जिल्हयातील होतकरू व नामवंत समाज सेवक आणि समाज कार्य करणा-या  स्वयंसेवी संस्था यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारांसाठी अर्ज मागविले आहेत. त्यासाठी इच्छुकांनी बुधवार 15 मार्च 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत तीन प्रतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन नांदेड समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
प्रस्ताव दाखल करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता करिता-  या योजनेनुसार दलित समाज इत्यादीचे सामाजिक, दुर्बल घटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाज सेवक असावेत. हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र या गोष्टीचा विचार केला जाणार नाही. सामाजिक क्षेत्रात किमान 15 वर्ष कार्य केलेले असावे. पुरुष कार्यकर्त्याचे वय किमान 50 वर्ष आणि महिला करिता 40 वर्षा पेक्षा वय कमी नसावे. कोणत्याही व्यक्तीचे आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजल्या जाणार नाहीत. हा पुरस्कार मिळण्यासाठी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा कोणताही पदाधिकारी पात्र असणार नाहीत. सक्षम अधिकारी, पोलीस अधीक्षक नांदेड यांचेकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. समाज कार्य बाबतचा संक्षिप्त अहवाल स्वतंत्र  जोडण्यात यावा.
स्वयंसेवी संस्थेसाठी - समाज कल्याण क्षेत्रात दलित समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण,आरोग्य,अन्याय अत्याचार व अस्पृश्यता निर्मुलन, अंधश्रद्धा रुढी निर्मुलन जनजागरण इत्यादी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल.तसेच सामाजिक कार्याचा संक्षिप्त अहवाल स्वतंत्र जोडावा. संस्था पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 सोसायटी रजिस्ट्रेशन नुसार पंजीबद्ध असावी. समाज कल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य दहा वर्षापेक्षा अधिक असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणा-या संस्थाच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल. संस्थेचे कार्य राजकारण व पक्षा पासून अलिप्त व स्वतंत्र असावे. पाच वर्षाचा अहवाल जोडणे आवश्यक आहे. संस्थेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसल्या बाबतचे सक्षम अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,नांदेड यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
इच्छुक सामाजिक कार्यकर्ता व संचालक स्वयंसेवी संस्था यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौक रोड, ग्यानमाता शाळे समोर नांदेड.यांचे कार्यालयात विहित नमुना व आवश्यक माहिती प्राप्त करून घेवून आपला प्रस्ताव बुधवार 15 मार्च 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत तीन प्रतीत सादर करावा, असे सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण नांदेड यांनी कळवले आहे. विलंबाने व चुकीचे, अपूर्ण प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असेही म्हटले आहे. 

000000
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत
मनरेगा सप्ताह ; 8 व 9 मार्च रोजी ग्रामसभा
नांदेड दि. 6 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व त्याअंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना औरंगाबाद विभागात प्रभावी व परिणामकारकरित्या राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 12 मार्च 2017 पर्यंत मनरेगा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
या सप्ताहात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार 8 मार्च रोजी महिलांची विशेष ग्रामसभा व त्यानंतर गुरुवार 9 मार्च रोजी सर्वसाधारण विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभाद्वारे समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या सर्व लाभार्थ्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारीही सुरु केल्याची माहिती मग्रारोहयो जिल्‍हा कार्यक्रम समन्‍वय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी दिली आहे.
प्रत्‍येक ग्रामपंचायतीच्‍या ग्रामसभेसाठी तालुक्‍यातील वर्ग एक, दोन व तीन ( उपअभियंता, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, लागवड अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्‍ठ अभियंता, मंडळ अधिकारी, कक्ष अधिकारी, विस्‍तार अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, वनपाल, सहाय्यक लागवड अधिकारी, कृषी अधिकारी इत्यादी ) कर्मचाऱ्यांची संपर्क अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात येत आहे.  हे संबधीत संपर्क अधिकारी 8 व 9 मार्च 2017 रोजी होणा-या ग्रामसभेस उपस्थित राहणार आहेत.
या ग्रामसभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती देणे. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंतर्गत 11 कामांची माहिती देणे. ग्रामपंचायत अंतर्गत जॉब कार्ड मिळण्यापासून वंचित राहिलेल्या कुटुंबांना जॉब कार्ड देणे. उपलब्ध जॉब कार्डचे नुतनीकरण करणे. योजनेअंतर्गत सन 2016-17 व सन 2017-18 मध्ये घ्यावयाच्या कामांची निवड करणे. या दोन्ही वर्षांकरीता वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी लाभार्थी निवड करणे ज्यामध्ये सिंचन विहीर , वैयक्तिक शौचालय, शेततळे, फळबाग लागवड, शेळी-गुरे-कुक्कुटपालन शेड, शौषखड्डे, व्हर्मी / नाडेप कंपोस्टींग, वृक्ष लागवड आणि सार्वजनिक स्वरुपाच्या ग्रामसभलीकरण अंतर्गत कामांची निवड करणे. निवडलेल्या लाभार्थी कामे व या दोन्ही वर्षांकरीता वार्षिक कृती आराखड्यास मान्यता घेणे. आवश्यकता असल्यास शासन नियमानुसार अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेतून निवड करणे असे विषय ग्रामसभेसमोर ठेवले जाणार आहेत.
ग्रामसभेत समृध्‍द महाराष्‍ट्र जनकल्‍याण योजनेच्‍या लाभार्थ्‍यांची नियमानुसार निवड होईल. यासाठी  तलाठी, ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी, कृषी सहाय्यक यांना सूचना देण्यात आल्या. ग्रामसभांचा विहित नमुन्यातील अहवाल गट विकास अधिकारी यांच्याकडे एकत्रित केला जाणार आहे. 

0000000

  वृत्त क्र.   252   शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही   जिल्हयात 144 कलम लागू ; आचारसंहितेचा कडक अवलंब     नांदेड ...