Sunday, March 8, 2020


महिला दिन उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात साजरा   
  
नांदेड,दि. 8 :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे जागतिक महिला दिन आज साजरा करण्यात आला. या कार्यालयामार्फत सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी ग्रंथालय योजनेतंर्गत मोफत पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध असुन त्या संधीचा फायदा घेऊन शासकीय नोकरीस यशस्वी झालेल्या महिलांचा या कार्यालयामार्फत सन्मानचिन्ह पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच यापुढेही या ग्रंथालयाचा लाभ घेऊन मोठया पदावरील नोकरी प्राप्त करुन घेण्याचे आवाहन या कार्यालयाचे  प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, नांदेड यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सु.प्र.पाटील यांनी केली तर समारोप समारंभ अ.गो.कदम यांनी केले.
00000



महिलांनी आरोग्य सांभाळून नोकरी करा
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन  
नांदेड,दि. 8 :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात महिला दिन च्या ध्वजाचे ध्वजारोहण उपजिल्हाधिकारी श्रीमती संतोषी देवकुळे यांच्या हस्ते करण्यांत आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सर्व महिलांना महिला दिनाची शपथ वचनबध्द करवून घेतली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या अमोल सरोदो व इतर कलाकार यांनी मन हेलावून टाकणारे बेटी बचाओ बेटी पढाओ हे पथनाट्य सादर केले. या महिला दिनानिमित्त  डॉ. विपीन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात Sanitary Vending Machine बसवून महिलांना आरोग्य विषयक जागरूकतेची भेट दिली.
           
त्यानंतर बचत भवन येथे जिल्हाधिकारी डॉ. विपीन, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रम घेण्यांत आला. सुरूवातीस डॉ.सारिका धोंडे यांचे महिलांच्या आरोग्य विषयक जागरूकते बाबत व्याख्यान झाले. त्यानंतर डॉ.लेमिना बिरगाळे पाटील यांचे योग व आहार या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर महसूल विभागातील लिपिक, अव्वल कारकून, तलाठी, मंडळ अधिकारी, शिपाई, कोतवाल या संवर्गातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले. नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अश्विनी केंद्रे, मंजूषा रापतवार, कल्पना क्षिरसागर, ज्योती बाऱ्हाळीकर, माधुरी शेळके, डॉ.स्वाती अलोणे,  स्वाती पेद्देवाड, विद्या सुरूंगवाड, अनुराधा नरवाडे, वंदना गवळी, माधुरी ठाकूर, कल्पना नगराळे, पायल कदम, रूपाली बंगाळे, मनिषा मोहिते, मीना सोलापूरे, भाग्यश्री आणेराव, शिल्पा बोकन तसेच उपविभाग नांदेड मधून आर.एस.वाठोरे, एस.एन.बेती, पी.एम.आठवले, एस.एस.गंगातीटे, शितल यरगलवाड, आरती सारंग उपविभाग किनवट मधून भाग्यश्री तेलंग, दिपाली पिंजरकर, शिवकांता होणवडजकर, उपविभाग कंधार मधून वंदना शिंदे, राजश्री जोंधळे, सुरेखा सुरूंगवाड, जहरूनीसा बेगम, जिलानी खान, उपविभाग धर्माबाद मधून गोपीनवार, सईदा फीरदोस, अनुपमा मुधोळकर, सुजाता बेंद्रीकर, उपविभाग भोकर मधून एस.एस.कुसळे, आशामती राऊत, प्रियंका कापसे, ज्योती हुंडेकर, भंडारे ललीता,वनिता औसेकर,उपविभाग देगलूर मधून मुंडे, पुजा इंगळे, यशोदा बेळगे, के.स.जुरावाड,उपविभाग बिलोली मधून जे.एम.जिगळे, व्ही.जी.मकरंद, एस.बी.पांपटवार, विशाखा रायबोले, उपविभाग हदगांव मधून जी.एस.सूर्यवंशी, के.वाय.पोपलवार, के.एल.कावळे, एस.यु.कल्याणकर या महिलांचा समावेश होता. नांदेड तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना EPIC (मतदान ओळखपत्र) वाटप करण्यांत आले. राष्ट्रीय कुटूंब अर्थ सहाय्य योजनेंतर्गत लता रजनीकांत सदावर्ते, लिंबगांव व शिला गणेश श्रीमंगले सुगांव बु. यांना मा.डॉ.विपीन यांच्या हस्ते धनादेश देण्यांत आला.
            त्यानंतर महिलांचे उद्बोधकपूर्ण गीत मीना सोलापूरे, ज्योती बार्‍हाळीकर, मंजूषा रापतवार, अश्विनी केंद्रे यांनी गायन केले. माधुरी शेळके, स्वाती पेद्देवा़ड, डॉ.स्वाती अलोणे, यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.
             अपर जिल्हाधिकारी परदेशी यांनी महिलां बाबत पुरूषांना आदर करणे त्यांना समानतेची वागणूक देणे याबाबतचे संस्कार घराघरातून केले पाहिजेत. महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मानवतेचा असला पाहिजे असे प्रतिपादन केले.तसेच वाढत्या गुन्हेगारीच्या समाजात वावरतांना महिलांनी स्व संरक्षण करणे त्यासाठी रणरागिणी होणे, स्वावलंबी होणे गरजेचे आहे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांनी केले.
            शेवटी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी अध्यक्षीय भाषणात महिला या खरोखरच समानतेच्या, मानवतेच्या दावेदार आहेत. महिलांनी समाजात वावरतांना निर्भिडपणे राहिले पाहिजे यासाठी स्वत:चे आरोग्य सांभाळले पाहिजे प्रचंड उर्मी ठेवून काम केले पाहिजे, जेणे करून कुटूंबांचे अर्थाजन व नोकरी करणे सुखकर होईल. महिला ह्या नव्यान्नव टक्के कुटूंबांची जबाबदारी स्वत: हून स्विकारतात, पार पाडतात तेंव्हा त्यांच्या ह्या कर्तृत्वाला, ममतेला सलाम सांगून सर्व महिलांना सन्मानित केले.
            सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन तहसीलदार उज्वला पांगरकर व तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले. तर आभार नायब तहसीलदार संजीवनी मुपडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिला कर्मचार्‍यांनी उस्त्फुर्त सहभाग घेतला व मीना सोलापूरे, अव्वल कारकून यांनी विशेष परिश्रम घेतले. 
00000


महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील 
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड,दि.8:-  महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सबलीकरण, गोर-गरिब, ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून महिलांना मदत मिळत असून महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.    
            जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने बेटी बचाओ,बेटी पढाओ कार्यक्रम तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत सन 2018-2019 या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यशोदामाता पुरस्कार-2020 वितरण सोहळा येथील भक्ती लॉन्स येथे आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यावेळी पालकमंत्री  श्री. चव्हाण बोलत होते.  

यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती दिक्षाताई धबाले, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती सुशिलाताई बेटमोगरकर, सभापती सती देशमुख तरोडेकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, बांधकाम सभापती संजय देवके तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, पत्रकार, महिला बचत गटाच्या सदस्या, अधिकारी - कर्मचारी आदिंची उपस्थिती होती.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले व कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा देवून पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील या होत्या. तर सावित्रीबाई फुले, झाशीची राणी,                         डॉ. बाबासाहेब  आंबेडकर या समाज सुधारकांची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली आहे.  
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे  महिला व बालविकासासाठी मोलाचे काम आहे. महिलांची चळवळ राज्यभर मोठ्या ताकदीने उभी असून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे, त्यासाठी शासन कटिबध्द आहे.
राज्यात महर्षी महादेव गोविंद रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले,                   डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक समाज सुधारकांचे शिक्षणामध्ये महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज महिला शिक्षणात अग्रेसर आहेत.  
स्त्रीभृण हत्या मानवतेला कलंक असून स्त्रीचा सन्मान प्रत्येकानी ठेवला पाहिजे. अंगणवाडी सेविकांच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखड्याचे नियोजन करावे. सुविधा उपलब्ध नाहीत अशा अतिदुर्गम भागातील इमारतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच शेतकरी आत्महत्या, समाजातील गरीब वर्गाला न्याय देण्याचे काम करावे लागणार आहे. महिला आपल्या क्षेत्रात आत्मियतेने काम करीत असतात, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी नमुद केले. 
जिल्हा परिषदेच्या  योजनेचा निधी सर्वच खर्ची करण्यात यावा. जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करावेत त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी महिलांनी आपल्या क्षेत्रात सक्षम होवून स्वत:च्या पायावर राहिले पाहिजे. महिलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, असे सांगितले.  
महिला व बाल विकास समितीच्या सभापती सुशिला पाटील बेटमोगरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. शिंगणे यांनी केले.  
            एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत यशोदामाता पुरस्कारासाठी पात्र 80 कर्मचाऱ्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.    यावेळी उपस्थितांना जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबतची शपथ देण्यात आली.
0000


महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील 
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड,दि.8:-  महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सबलीकरण, गोर-गरिब, ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून महिलांना मदत मिळत असून महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.    
            जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने बेटी बचाओ,बेटी पढाओ कार्यक्रम तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत सन 2018-2019 या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यशोदामाता पुरस्कार-2020 वितरण सोहळा येथील भक्ती लॉन्स येथे आज आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून यावेळी पालकमंत्री  श्री. चव्हाण बोलत होते.  

यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती दिक्षाताई धबाले, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती सुशिलाताई बेटमोगरकर, सभापती सती देशमुख तरोडेकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, बांधकाम सभापती संजय देवके तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, पत्रकार, महिला बचत गटाच्या सदस्या, अधिकारी - कर्मचारी आदिंची उपस्थिती होती.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले व कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा देवून पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील या होत्या. तर सावित्रीबाई फुले, झाशीची राणी,                         डॉ. बाबासाहेब  आंबेडकर या समाज सुधारकांची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली आहे.  
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे  महिला व बालविकासासाठी मोलाचे काम आहे. महिलांची चळवळ राज्यभर मोठ्या ताकदीने उभी असून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे, त्यासाठी शासन कटिबध्द आहे.
राज्यात महर्षी महादेव गोविंद रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले,                   डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक समाज सुधारकांचे शिक्षणामध्ये महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज महिला शिक्षणात अग्रेसर आहेत.  
स्त्रीभृण हत्या मानवतेला कलंक असून स्त्रीचा सन्मान प्रत्येकानी ठेवला पाहिजे. अंगणवाडी सेविकांच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखड्याचे नियोजन करावे. सुविधा उपलब्ध नाहीत अशा अतिदुर्गम भागातील इमारतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच शेतकरी आत्महत्या, समाजातील गरीब वर्गाला न्याय देण्याचे काम करावे लागणार आहे. महिला आपल्या क्षेत्रात आत्मियतेने काम करीत असतात, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी नमुद केले. 
जिल्हा परिषदेच्या  योजनेचा निधी सर्वच खर्ची करण्यात यावा. जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करावेत त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी महिलांनी आपल्या क्षेत्रात सक्षम होवून स्वत:च्या पायावर राहिले पाहिजे. महिलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, असे सांगितले.  
महिला व बाल विकास समितीच्या सभापती सुशिला पाटील बेटमोगरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. शिंगणे यांनी केले.  
            एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत यशोदामाता पुरस्कारासाठी पात्र 80 कर्मचाऱ्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.    यावेळी उपस्थितांना जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबतची शपथ देण्यात आली.
0000

  वृत्त क्र.   391 रामतीर्थ येथे ईव्हीएम फोडण्याच्या  प्रयत्नानंतरही मतदान सुरळीत  प्रकरणाची तपासणी पोलिसांकडून सुरू नांदेड दि. २६ : लोकसभा ...