Tuesday, June 26, 2018

मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथे आयोजन
नांदेड, दि. 26:- मा. मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांच्यावतीने व नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायाधीश तथा अध्यक्ष प्रमुख जिल्हा श्री. एस. पी. कुलकर्णी यांचे आदेशान्वये दि. 26 जुन 2018 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड येथे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अध्यक्षास्थानी न्या.श्री. डी. टी. वसावे हे होते.
न्या.श्री. डी. टी. वसावे अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले की, प्रत्येकाने आपले प्रकरण मध्यस्थी व तडजोड करणे महत्वाचे आहे, कारण कोर्टामध्ये प्रकरणांसाठी वेळ व पैसा जात असतो. त्यासाठी मध्यस्थीने वाद मोकळया मनाने मिटविण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर आपले आयष्य भांडणात जाईल.
जो माणुस माफ करतो, तोच मोठा होतो. मध्यस्थीसाठी जे प्रकरण तडजोड करण्यासाठी येतात त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मदत करण्याचे आश्वासनही दिले. तसेच पक्षकारानी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या व त्यांच्या शंकाचे निरसन न्या. वसावे यांनी केले.
दिनांक 14 जुलै 2018 रोजी होणऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त तडजोड पात्र प्रकरणे
मध्यस्थीने प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच लोकअदालतीच्या पॅनलवर काम करीत असतांना नियमांचे, वेळेचे पालन करणे आवश्यक आहे. पॅनल सदस्यांनी वेळेवर हजर राहुन लोकअदालत यशस्वी करण्यात सहकार्य करणे आवश्यक आहे.
यावेळी न्यायाधीश श्री. डी. टी. वसावे यांनी सहयोग योजनेबाबत उपस्थित विधीज्ञांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण केले. तसेच विधी सेवा प्राधिकरणतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरजू घटकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपल्या हातून समाजसेवा करण्याची ही एक संधी आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी विधीज्ञ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडचे कर्मचारी उपस्थित होते.
****


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...