Monday, September 4, 2017

गणेश मंडळ, नागरीकांनी गोदावरी नदीसह
जलसाठ्यांच्या ठिकाणी दक्षता घ्यावी
नांदेड, दि. 4 :- श्री गणेश मुर्तीं विसर्जन दरम्‍यान जिल्ह्यातील गणेश मंडळ व नागरीकांनी गोदावरी नदीसह सर्व जलसाठ्यांच्‍या ठिकाणी सावधगिरीची दक्षता घ्‍यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  
      मंगळवार 5 सप्‍टेंबर 2017 रोजी नांदेड शहर व जिल्‍हयातील श्रीमुर्तींचे विसर्जन होत आहे. या दरम्‍यान सर्व गणेश मंडळ व सहभागी भाविकांनी विसर्जन स्‍थळी गोदावरी नदीसह इतर सर्व जलसाठ्यांच्‍या ठिकाणी कुठल्‍याही प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सावधगिरी बाळगावी.  
सध्‍या हवामान खात्‍याने राज्‍यासह मराठवाड्यात पर्जन्‍यमानाचा इशारा वर्तविला आहे. जिल्‍हयातील गोदावरी नदीची पाणी पातळी उंचावलेली आहे. जायकवाडी प्रकल्‍प 78  टक्‍के व शंकरराव चव्‍हाण विष्‍णुपुरी प्रकल्‍प जवळपास शंभर टक्‍के भरला आहे. पाण्‍याचा येवा सुरु झाल्‍यास अतिरिक्‍त जलसाठा या प्रकल्‍पांद्वारे केंव्‍हाही विसर्जित करण्‍यात येऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व गणेश भक्‍तांनी श्री मुर्तीचे विसर्जन सुरक्षितपणे करावे. याबाबत भाविक, गणेश मंडळ व स्‍थानीक प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले आहे.   
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   402   लातूर लोकसभेसाठी ड्युटी लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 5 मे रोजीची बस व्यवस्था    88-लोहा विधानसभा क्षेत्रासाठी सुविधा उपलब्...