Friday, June 30, 2017

शासकीय योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना
बँकांनी अर्थसहाय्य करावे - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 30 :- स्वयंरोजगाराच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना बँकांनी पुढे येवून प्राधान्यक्रमांने अर्थसहाय्य दिले पाहिजे, असा सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या. बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समिती आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात काल (ता. 29) बैठक संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक विजय उशीर, नाबार्डचे व्यवस्थापक राजेश धुर्वे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. पी. घुले, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक एम. जी. केसराळीकर, आरबीआयचे सहायक व्यवस्थापक संजय बुऱ्हाडे, तसेच विविध बँकांचे अधिकारी, प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की,  बेरोजगारी दुर करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी बँकांनी सहकार्य करावे. महिला बचतगटाच्या व्यवसायातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. महिला बचतगटाच्या व्यवसायांना कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांनी सकारात्मक भुमिका घेवून अर्थ सहाय्य मंजूर करावे. पशुसंवर्धन क्षेत्राच्या विकासासाठी बँकांनी पुढे आले पाहिजे. चांगल्या सेवेमुळे बँकांनाही मोठा लाभ मिळतो. बचतगटांना सन्मानपुर्वक वागणुक देऊन बँकांनी त्यांचे बचत खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिले.  
यावेळी विविध बँकेतील कर्ज प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. बँकांनी त्यांच्या सेवा व ग्रामीण भागातील अडचणींबाबत माहिती दिली.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...