Friday, June 30, 2017

"न्याय आपल्या दारी" योजनेतर्गत
जिल्ह्यात फिरते लोकन्यायालयाचे आयोजन
नांदेड दि. 30 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सविता बारणे यांच्या मार्गदर्शनानुसार "न्याय आपल्या दारी" या योजनेतर्गत नांदेड जिल्हयात 5 ते 30 जुलै 2017 या दरम्यान फिरते लोकन्यायालय  फिरते कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरत्या न्यायरथाची सुरवात जिल्हा न्यायालय नांदेड येथे 5 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वा. होणार अस या उद्घाटसोहळयानंतर हे फिरते न्यायालय पुढे मार्गस्थ होणार आहे.
यावेळी आपसातील वाद असलेली दाखल पुर्व प्रकरणे तसेच प्रलंबित असलेली दिवाणी तडजोडपात्र असे फौजदारी प्रकरणांमध्ये आपसात तडजोड करून कायमची निकाली काढणार आहेत. याचा एक मुख्य फायदा म्हणजे निकाली निघालेल्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजुंच्या पक्षकरांना कुठल्याही प्रकारचे अप करता येत नाही. सर्व पक्षकार बांधवांनआपले आपसातील वाद कायमचे मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयामध्ये जावून आपले प्रकरण फिरत्या लोकन्यायालयामध्ये ठेवण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सविता बारणे, सचिव डी. टी. वसावे तसेच सर्व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा सर्व न्यायाधीश यांनी केले आहे.
            या फिरत्या न्याय रथामध्ये न्यायाधिश म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश बी. टी. नरवाडे पाटील हे पॅनल प्रमुख म्हणून न्याय निवाडा करणार आहेत. त्यांना पॅनल सदस्य म्हणून अॅड. प्रविण अयाचित संबंधित तालुक्यातील पॅनलवरील  वक काम पाहणार आहेत. या फिरत्या लोकन्यायालयाचे आयोजन 5 जुलै 2017 पासून होणार असून अनुक्रमे माळेगाव (यात्रा) ता. लोहा, कलंबर ता.लोहा , पानभोसी ता. कंधार, सावरगाव (पीर) ता. मुखेड, बाऱ्हाळी ता. मुखेड, वन्नाळी ता. देगलूर, करडखेड ता. देगलूर, कहाळा ता. नायगाव, होटाळा ता. नायगाव, शंकरनगर ता. बिलोली, कासराळी ता. बिलोली, सिरजखोड ता. धर्माबाद, मौ.थेरबन ता.भोकर, मौ.सावरगाव ता. भोकर, कांडली ता. भोकर, घोटी ता. किनवट, मौ. सिंधी ता.उमरी, गुंडेगाव ता.नांदेड अशाप्रकारे नांदेड जिल्हयातील या गावांमध्ये फिरत्या लोकन्यायालयाचा रथ येणार आहे नांदेड येथील जिल्हा कारागृह वर्ग-2 येथे 30 जुलै 2017 रोजी या फिरत्या रथाची सांगता होणार आहे.
आपसातील वाद कायमचे मिटविण्याची संधी आपल्या दारी आली आहे म्हणून या योजनेला "न्याय आपल्या दारी" असे संबोधले आहे. सर्वांनी या फिरत्या लोकन्यायालयाचा, फिरत्या कायदेविषयक शिबीराचा लाभ जास्तीत जास्त पक्षकारांनी रु घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. हे फिरते लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी सर्व विधिज्ञ, संबंधित पक्षकार यांचे सहकार्य लाभाणार आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   401 लोकसभा निवडणुकीतील सहभागी कर्मचाऱ्यांचे यावर्षी विक्रमी मतदान   10 हजारावर  कर्मचाऱ्यांनी बजावला मताधिकार   नांदेड दि. 2 ...