Friday, February 9, 2024

विशेष लेख

विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व

श्री.गिरीश महाजन,मंत्री, ग्रामविकास आणि पंचायतराज व पर्यटन

राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले, जनतेला आपलेसे वाटणारे आणि धडाडीचे निर्णय घेणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राला बहुआयामी नेतृत्व लाभले असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मला शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे.

कोणतेही काम पार पाडण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज असते.असे नेतृत्व सर्वांना बरोबर घेवून जाणारे सर्वांना आपलेसे वाटणारे नेतृत्व असले की ते जनमानसात लोकप्रिय होते.असे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा उत्तम संगम असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक गोष्टी शिकण्यास मिळत आहेत.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि  धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारावर  मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी नेहमीच मार्गक्रमण केले.पदापेक्षा तळागाळातील जनतेसाठी काम करताना त्यांनी नेहमी संवेदनशीलता जपली आहे.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येऊन एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला आहे आणि त्यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची आपल्या मतदारसंघात असलेली मजबूत पकड  त्यांच्या लोकप्रियतेची पोचपावती आहे. ठाणे  महापालिकेत नगरसेवक ते विधानसभेचे सदस्य या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मतदारसंघात  तसेच राज्यभरात अनेक जनहिताची कामे केली.  कोपरी - पाचपाखाडी मतदारसंघातून 2004 मध्ये विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. जनतेने सातत्याने दाखवलेल्या विश्वासानंतर आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आजपर्यंत त्यानी मागे वळून पाहिले नाही.

पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम महाराष्ट्राची जनता कधीच विसरू शकत नाही.२०१९ मध्ये कोल्हापूर,सातारा आणि सांगली महापुरामध्ये अस्मानी संकट आले असताना. त्या कालावधीत आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम सर्वांच्या लक्षात राहील, असे आहे. महापुराच्या कालावधीत आरोग्य यंत्रणे सोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सर्व काम स्वतः पाहिले. 

नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी देखील केली आहे. राज्याचा विकास व्हायचा असेल तर सर्वांना परवडणारी दळणवळण व्यवस्था, दर्जेदार सुविधा देखील असाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी  महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले.नागपूर ते शिर्डी (कोकेमठाण) या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पूर्वी हे अंतर पार करण्यासाठी तेरा तास लागत होते आता पाच तासात हे अंतर पार करणे शक्य होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कमी कालावधीत केलेले भूसंपादन, शेतकऱ्यांना त्वरित दिले ला भूसंपादनाचा मोबदला, सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन या रस्त्याचे विक्रमी वेळेत पूर्ण केलेले काम या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले आहे. एकूणच या कामामुळे प्रकल्पाची  घोषणा करून  त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यावर भर देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यशैली  आहे.

रायगड जिल्ह्यातील  ईरशाळवाडी येथे १९ जुलै २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास भूस्खलन होवून दरड कोसळली होती.  या दुर्घटनेत ८४ व्यक्ती बेपत्ता होत्या.या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाऊन या घटनेवर ती पूर्णपणे सनियंत्रण करून मदत व बचाव कार्यात केलेले काम हे वाखनण्याजोगे होते.

बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकून पडलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या सगळ्या 1050 प्रवाशांची केलेली सुखरूप सुटका,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून प्रवाशांच्या सुखरूप सुटकेसाठी त्यांनी केलेले काम मी स्वतः पहिले असून  या सर्व घटनांचा मी साक्षीदार आहे.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी पदभार घेतल्यापासून राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एक अत्यंत चांगला अनुभव मिळत आहे. कोरोना सारखे संकट, महापूर, अतिवृष्टी या कालावधीत जनतेला दिलासा देणारे निर्णय, परवडणाऱ्या घरांना चालना, लोकाभिमुख प्रशासन, पायाभूत प्रकल्पांना वेग, दुर्बल घटकांना दिलासा,शासन आपल्या दारी उपक्रम असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शिक्षण,आरोग्य,शेती-सिंचन, परिवहन,माहिती तंत्रज्ञान,ऊर्जा,पर्यटन या सर्व क्षेत्रात यापुढेही अनेक नवीन योजना राबवण्याचा मानस आहे.राज्याची शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्यासाठी, प्रगती कडे नेण्यासाठी अनेक विकास आराखडे त्याचे नियोजन केले जात आहे.

महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण करत असलेल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो,आपली सर्व स्वप्ने साकार होवो, तुम्हाला वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो ...

 

शब्दांकन : संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...